शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

महान येथील जलशुद्धीकरण केंद्रावरील विद्युत पुरवठा वारंवार खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 13:48 IST

अकोला: महान येथील जलशुद्धीकरण केंद्रावरील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याचा परिणाम शहराच्या पाणी पुरवठ्यावर होत आहे.

अकोला: महान येथील जलशुद्धीकरण केंद्रावरील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याचा परिणाम शहराच्या पाणी पुरवठ्यावर होत आहे. धरणात पुरेसा जलसाठा उपलब्ध असताना ऐन सणासुदीच्या दिवसांत पाणी पुरवठा विस्कळीत होत असल्याने महावितरणच्या कामकाजावर अकोलेकरांसह मनपा प्रशासनाकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात मनपाकडून महावितरण कंपनीला पत्रव्यवहार केला जाणार असल्याची माहिती आहे.यंदा पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे महान धरणात मुबलक जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे पाण्याचा सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात वापर सुरू झाला. साहजिकच, सिंचनासाठी विजेचा वापर वाढला असून, त्याचा परिणाम महान येथील जलशुद्धीकरण केंद्रावर होत असल्याचे समोर आले आहे. सिंचनासाठी विजेचा वापर वाढल्यामुळे जलशुद्धीक रण केंद्रावरील विद्युत दाब कमी होत आहे. यामुळे पाण्याचा उपसा करणारे पंप वेळोवेळी बंद करण्याची वेळ मनपा प्रशासनावर आली आहे. जलशुद्धीकरण केंद्रावर एक्स्प्रेस फिडर असतानाही वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे मागील काही दिवसांपासून शहराचा पाणी पुरवठा तात्पुरत्या काळासाठी बंद करावा लागत आहे. धरणात जलसाठा उपलब्ध असतानाही ऐन सणासुदीच्या काळात पाणी पुरवठा विस्कळीत होत असल्यामुळे अकोलेकरांमध्ये महावितरण कंपनीप्रती तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे. या प्रकाराची दखल घेत मनपा प्रशासनाकडून महावितरण पत्रव्यवहार केला जाणार असल्याची माहिती आहे.दाब कमी; उपशावर परिणामजलशुद्धीकरण केंद्रावर ६५ एमएलडी आणि २५ एमएलडीचे दोन प्लान्ट कार्यान्वित आहेत. ६५ एमएलडीच्या प्लान्टवर पाण्याचा उपसा करण्यासाठी पाच पंप असून, त्यापैकी तीन पंपांद्वारे उपसा केला जातो. २५ एमएलडीच्या प्लान्टवर दोन पंप असून, त्यापैकी एका पंपाद्वारे पाण्याचा उपसा केला जातो. सकाळी ८ ते सायंकाळी ४ हा कालावधी पाण्याच्या उपशाकरिता महत्त्वाचा आहे. नेमका याच कालावधीत जलशुद्धीकरण केंद्रावरील विद्युत दाब कमी होत असल्याने मनपाला नाइलाजाने एका पंपाद्वारे पाण्याचा उपसा करावा लागतो. त्यामुळे पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक विस्कळीत होत आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाKatepurna Damकाटेपूर्णा धरण