शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा?; तिसऱ्या आघाडीचे राजरत्न आंबेडकरांचं विधान
2
Maharashtra Politics : '२०२९ मध्ये भाजपाचे सरकार येणार', शाहांचं विधान; अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील काय म्हणाले?
3
संपादकीय: बिऱ्हाड गोमातेच्या पाठीवर..
4
Iran Israel संघर्षाचा भारतीयांनाही बसणार फटका! कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका 
5
पुण्यात हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू; बावधनमधील रिसॉर्टवरुन केलं होतं उड्डाण
6
"हिचं तोंड काळं करा...", तृप्ती डिमरीवर भडकल्या महिला, पोस्टरवर काळं फासलं; प्रकरण काय?
7
Post Officeची भन्नाट स्कीम, ५ वर्ष महिन्याला मिळतील ₹९,२५०; पुढेही कमाई हवी असेल तर काय कराल?
8
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडून मिळणार १४९२ कोटी निधी
9
देवानेच अद्दल घडवली! आधी मूर्ती चोरली, चार दिवसांनी पुन्हा परत केली; चिठ्ठी लिहून माफी मागितली
10
"तुम्हाला किंमत चुकवावी लागेल", नेतन्याहूंचा इशारा; इराण म्हणाले, "प्रत्युत्तर दिलं तर..."
11
यावेळी महायुतीचे अन् २९ मध्ये भाजपचे स्वबळावर सरकार; अमित शाहंच्या वक्तव्याने अजित पवार, शिंदे गटात खळबळ 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस आर्थिक व व्यावसायिक दृष्टया लाभदायक
13
मविआचे जागावाटप होणार दसऱ्याला; सलग दोन दिवस बैठका
14
बदलापूर लैंगिक अत्याचार : फरार संस्था चालकांना अद्याप अटक का नाही? उच्च न्यायालयाचे एसआयटीवर ताशेरे
15
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या अनेक उमेदवारांचे पर्याय लिफाफाबंद; कुठे कुठे मतदान
16
आयोगाच्या अल्टिमेटमनंतरही मुंबईतील १३० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीस गृहविभागाचा नकार
17
मायदेशात सलग १८वा मालिका विजय; भारताने बांगलादेशला दिला व्हाइटवॉश
18
सहलीला जाताना बस पेटली; २५ विद्यार्थी, शिक्षकांचा मृत्यू
19
बनावट सुप्रीम काेर्टात सुनावणी, उद्याेजकाला घातला सात काेटींचा गंडा 
20
गुंतवणूकदार झाले तरुण; ४०% अवघे तिशीतलेच

तिस-या राज्यस्तरीय विचार साहित्य संमेलनाचा समारोप उत्साहात

By admin | Published: December 14, 2015 2:43 AM

तीन दिवस झाले राष्ट्रसंतांच्या विचारांचे मंथन.

अकोला: डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह येथे तीन दिवसांपासून सुरू असलेल्या तिसर्‍या राज्यस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाचा रविवारी समारोप झाला. तीन दिवसांच्या विचार साहित्य संमेलनात विविध वक्त्यांनी राष्ट्रसंतांच्या विचारांवर मंथन करून उपस्थितांपर्यंंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा समितीच्या वतीने आयोजित तिसर्‍या राज्यस्तरीय विचार साहित्य संमेलनाच्या समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भास्करराव विघे गुरुजी यांची, तर प्रमुख वक्ते म्हणून आचार्य हरिभाऊ वेरूळकर गुरुजी यांची उपस्थिती होती. यावेळी आमले महाराज, अँड. रामसिंग राजपूत, श्रीकृष्ण ठोंबरे, रामेश्‍वर बरघट, महादेवराव भुईभार, नंदकिशोर पाटील, आगळे गुरुजी, अँड. वंदन कोहाळे, डॉ. प्रकाश मानकर, अँड. संतोष भोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. राष्ट्रसंतांचे विचार आजच्या युवकांपर्यंंत पोहोचविण्यासाठी आयोजित राज्यस्तरीय विचार साहित्य संमेलनात विविध वक्त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांवर मंथन केले. दरम्यान, चिमुकल्यांनी राष्ट्रसंतांच्या भजन कीर्तनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या तीन दिवसीय संमेलनाची सकाळ सामुदायिक ध्यान, योग साधनेने उजाडली. समारोपीय कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामेश्‍वर बरघट यांनी, सूत्रसंचालन श्रीकृष्ण पखाले यांनी, तर आभार गोपाल गाडगे यांनी मानले.