शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

भलेही ‘नोटा’ बटन दाबा; पण मतदान करा - जनजागृतीकरिता ‘प्रहार’चे अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 12:58 IST

अकोला: लोकसभा निवडणूक-२०१९ मध्ये मतदान करण्यासाठी मतदारांचा निरुत्साह दिसून येत आहे. अनेक मतदारांना उमेदवार पसंत नसल्यामुळे मतदान करण्यासाठी मतदान केंद्रापर्यंत जाण्याचे टाळतात; मात्र उमेदवार पसंत नसतील तर प्रसंगी ‘नोटा’ बटन दाबा; पण यंदा मतदान कराच, मतदान जनजागृतीकरिता प्रहार संघटनेने अभियान हाती घेतले आहे.

अकोला: लोकसभा निवडणूक-२०१९ मध्ये मतदान करण्यासाठी मतदारांचा निरुत्साह दिसून येत आहे. अनेक मतदारांना उमेदवार पसंत नसल्यामुळे मतदान करण्यासाठी मतदान केंद्रापर्यंत जाण्याचे टाळतात; मात्र उमेदवार पसंत नसतील तर प्रसंगी ‘नोटा’ बटन दाबा; पण यंदा मतदान कराच, मतदान जनजागृतीकरिता प्रहार संघटनेने अभियान हाती घेतले आहे. यासंदर्भात माहिती देण्याकरिता प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख तुषार पुंडकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद बोलविली होती.लोकशाहीने दिलेल्या अधिकाराचा वापर करा, जास्तीत जास्त संख्येने मतदान करा, असेदेखील मतदारांना पुंडकर यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आवाहन केले. अकोला जिल्ह्याच्या विद्यमान खासदारांनी मागील पंधरा वर्षांपासून कुठल्याच प्रकारचे विकास कार्य या जिल्ह्यामध्ये केले नाही. फक्त निवडणुकीच्या काळात जनतेसमोर येतात, तसेच मागील पंधरा वर्षांपासून प्रमुख पक्षांनी तेच ते उमेदवार दिल्यामुळे मतदारांमध्ये मतदानाविषयी कमालीचा निरुत्साह दिसून येत आहे. यामुळे जिल्ह्यात मतदान कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे पुंडकर यांनी सांगितले.मतदान न करणे हा काही पर्याय नाही. मतदान करणे हा संविधानाने दिलेला अधिकार आहे. लोकशाही वाचविण्यासाठी मतदान करणे आवश्यक आहे. यासाठी उमेदवार पसंत नसेल तर निवडणूक आयोगाने दिलेल्या ‘नोटा’ हा पर्यायी विकल्प मतदार निवडू शकतो. या विकल्पाबाबत मतदारांना जागृत करणे, जनजागृती करणे, मतदानाची टक्केवारी वाढविणे, तसेच शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार व युवकांविरोधी धोरण आखणाऱ्या सरकारविरोधात प्रचार करणे हा ‘प्रहार’चा उद्देश असल्याचेदेखील पुंडकर यांनी स्पष्ट केले.फसवी कर्जमाफी, नाफेडची तूर खरेदी, पीक विम्यात शेतकऱ्यांची फसवेगिरी व एक हजार रुपये तुरीच्या चुकाºयाबाबत शेतकºयांची दिशाभूल, अनुदानापासूनदेखील विद्यमान सरकारने शेतकºयांना वंचित ठेवले. अकोला जिल्ह्याचा विचार केला असता, मागील १५ वर्षांपासून केवळ जाती-धर्माच्या आधारावर येथे निवडणुका लढविल्या जात आहे. झेंड्याच्या रंगावरू न मतदान होत आहे, असा आरोप पुंडकर यांनी केला. ‘होय, माझे मत ‘नोटा’लाच’, हे अभियान फक्त अकोला जिल्ह्यापुरतेच प्रहार जनशक्ती पक्ष राबवित असल्याचेदेखील पुंडकर यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला युवक जिल्हाप्रमुख योगेश पाटील, नीलेश ठोकळ, अरविंद पाटील, संघटक श्याम राऊत, बिट्टू वाकोडे, बॉबी पळसपगार व उमेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. 

 

टॅग्स :AkolaअकोलाMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019akola-pcअकोला