शहरं
Join us  
Trending Stories
1
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
2
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
3
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
4
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार
5
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
6
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
7
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
8
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
9
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
10
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
11
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
12
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
13
'भाऊ बोलून गळा पकडायचा!' अंकिताने सूरजला केलं टार्गेट, DP चांगलाच भडकला! प्रोमो बघाच
14
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
15
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
16
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
17
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य
18
लोकलमध्ये सापडली नोटांनी भरलेली बॅग, रक्कम पाहून पोलीसही अवाक्, तपास सुरू
19
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
20
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी

परीक्षा शुल्क माफीचा लाभ १४ हजारपेक्षा जास्त गावातील विद्यार्थ्यांना!

By admin | Published: November 28, 2015 2:31 AM

१४ हजार ७0८ दुष्काळग्रस्त गावांतील विद्यार्थ्यांंचे परिक्षा शुल्क माफ होणार.

कारंजा (वाशिम): यंदा ५0 पैशांपेक्षा कमी आणेवारी असलेल्या राज्यातील १४ हजार ७0८ दुष्काळग्रस्त गावांतील विद्यार्थ्यांंचे परिक्षा शुल्क माफ होणार असून, यासंदर्भातील निर्णय २४ नोव्हेंबर रोजीच घेण्यात आला. खरीप व रब्बी हंगामात ५0 पैशांपेक्षा कमी पैसेवारी आलेल्या गावांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करून विविध उपाययोजना जाहीर करण्यात येतात. त्यानुसार २0१५-१६ च्या खरीप हंगामात पिकांची हंगामी पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी आलेल्या १४ हजार ७0८ गावांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करून या गावांमध्ये जमीन महसुलात सूट, कृषीपंपाच्या चालू वीज देयकांत ३३.५ टक्के सूट, शालेय तथा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांंना परिक्षा शुल्क माफी, आवश्यक तिथे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी टँकर्सचा वापर, शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित न करणे आदि सुविधा देण्याचा निर्णय राज्य शासनाने २0 ऑक्टोबर २0१५ रोजी घेतला होता. आता १४ हजार ७0८ गावांतील विद्यार्थ्यांंचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने २४ नोव्हेंबर रोजी घेतला आहे. विद्यार्थ्यांंचे परीक्षा शुल्क माफीसंबंधी तात्काळ कारवाई करून, आवश्यक असल्यास निधीची तरतूद करण्यासाठी उच्च शिक्षण संचालकांकडे तातडीने प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.