शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

महाविद्यालयातच होणार परीक्षा अन् प्रश्नपत्रिकांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 10:30 IST

विद्यार्थी शिकत असलेले महाविद्यालयच परीक्षा केंद्र राहणार असून, तेथेच पेपर तपासल्या जाणार आहेत.

बुलडाणा: अंतिम वर्ष आणि सत्रांच्या परीक्षा घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने या परीक्षांचे नियोजन केले आहे. याविषयी महाविद्यालयांना पत्र पाठवून परीक्षा घेण्याचे निर्देश विद्यापीठाने दिले आहेत. आॅक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या परीक्षांना सुरुवात होणार आहे. विद्यार्थी शिकत असलेले महाविद्यालयच परीक्षा केंद्र राहणार असून, तेथेच पेपर तपासल्या जाणार आहेत.अंतिम सत्राच्या अभियांत्रिकी व तांत्रिकी अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षा या आॅनलाइन पद्धतीने बहुपर्यायी स्वरूपात होणार आहेत. प्रत्येक युनिटवर १० प्रश्न अशा ६० प्रश्नांपैकी विद्यार्थांना ३० प्रश्न आॅनलाइन पद्धतीने शिकत असलेल्या महाविद्यालयांतील परीक्षा केंद्रावर द्यावी लागणार आहे. परीक्षेचा कालावधी हा ९० मिनिटांचा राहणार आहे. इतर अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षा या उन्हाळी २०२० परीक्षेसाठी तयार करण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकांचा उपयोग करून त्या प्रश्नपत्रिकेतील कोणतेही तीन प्रश्न विद्यार्थ्यांना दोन तासात सोडवून पूर्ण करायचे आहेत. सर्व परीक्षांसाठी विद्यार्थी प्रवेशित असलेले महाविद्यालयच परीक्षा केंद्र राहणार आहे. अभियांत्रिकी व तांत्रिक अभ्यासक्रम वगळून इतर अभ्यासक्रमातील अंतिम वर्ष/अंतिम सत्राच्या विद्यार्थ्यांना असलेल्या अनुशेष सत्राच्या परीक्षा विद्यापीठाकडे उन्हाळी परीक्षेसाठी तयार असलेल्या प्रश्नपत्रिका एका सत्राच्या रोज तीन प्रश्नपत्रिका व प्रत्येक प्रश्नपत्रिकेतील कोणतेही दोन प्रश्न सोडून तीन तासात तीन विषयाची परीक्षा पूर्ण करण्यात येईल. तीन विषयाच्या तीन उत्तरपत्रिका सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत, तसेच विद्यार्थी शिकत असलेले महाविद्यालयच परीक्षा केंद्र राहणार आहे. लेखी परीक्षा आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होतील. तसेच १५ सप्टेंबर ते २५ सप्टेंबरदरम्यान प्रात्याक्षिक परीक्षा घेण्यात येणार आहेत.जवळचे परीक्षा केंद्र निवडण्याची संधीकोरोना संसर्ग वाढत असल्याने अंतिम वर्ष/सत्रांच्या विद्यार्थ्यांना जवळचे महाविद्यालय परीक्षा केंद्र म्हणून निवडण्याची सुविधा देण्यात आली आहे. याविषयी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांकडे विनंती करावी, तसेच परीक्षा सुरू होण्याच्या सात दिवसाआधी याविषयी माहिती विद्यापीठाला द्यावी लागणार आहे. त्यामुळे, कोरोनामुळे परीक्षेसाठी महाविद्यालयात न पोहोचू शकणाऱ्यांना दिलासा मिळाला.

टॅग्स :AkolaअकोलाEducation Sectorशिक्षण क्षेत्र