शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
3
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
4
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
5
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
6
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
7
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
8
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
9
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
10
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
11
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
12
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
13
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
14
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
15
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
16
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
17
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
18
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
19
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

वीस वर्षापासून दूरावलेले कुटुंब पुन्हा एकत्र आले, विधी सेवा प्राधिकरणाचा पुढाकार 

By राजेश शेगोकार | Published: March 04, 2023 4:53 PM

संपत्तीच्या वादावर संवादाची गाेळी कामी आल्याने वीस वर्षांपासून दूरावलेल्या कुटुंबांने वैराची हाेळी केली.  एखाद्या चित्रपटात घडावा असा हा प्रसंग अकाेल्यात घडला आहे.

अकोला : वडिलाेपार्जित संपत्तीच्या वादात भाऊ-बहीण, आई आणि मुलगी  एकमेकांच्या विरोधात कार्टात गेले, वाद विकाेपाला गेल्याने संवाद बंद झाला, वाद संपतील अन् पुन्हा पूर्वी सारखे हाेईल ही आशा काेणालाच नव्हती उलट राग, द्वेषाची जागा वैमनस्याने घेतली हाेती अशा स्थितीत या परिवारातील एका सदस्याला विधी सेवा प्राधिकारणाच्या रूपाने एक आशेचा किरण दिसताे, ताे पुढाकार घेताे, विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश  पैठणकर हे या परिवारातील गुंता साेडविण्यासाठी पुढे येतात अन् त्यांच्या समुपदेशनाद्वारे तब्बल २० वर्षापासून विखुरलेला परिवार एकत्र येताे. 

संपत्तीच्या वादावर संवादाची गाेळी कामी आल्याने वीस वर्षांपासून दूरावलेल्या कुटुंबांने वैराची हाेळी केली.  एखाद्या चित्रपटात घडावा असा हा प्रसंग अकाेल्यात घडला आहे. अकोला जिल्ह्यातील एका गावातील प्रतिष्ठित कुटुंब असलेले भाऊ-बहीण, आई आणि मुलगी संपत्तीसाठी एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले होते. जिल्हा न्यायालय आणि कौटुंबिक न्यायालय या ठिकाणी खटले सुद्धा दाखल केले होते. गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून ते एकमेकांचे वैरी बनले होते. बहिण भावाच्या पवित्र नात्याला कधीचाच सुरुंग लागला होता तर मुलाच्या पाठीवरून मायेचा हात फिरवणारी आई आपल्या पोटच्या गोळ्यापासून कधीच दूर झाली होती. तीन भाऊ दोन बहिणी आणि आई वडील असा हा परिवार आहे. यापैकी वडीलाचे आधीच निधन झाले तर घरातील कुटुंबप्रमुख असलेल्या आईचे सुद्धा आजाराने निधन  पैठणकर एका कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी गेले असता त्यांनी घरगुती वादविवाद कसे मिटवावीत ? याबाबत मार्गदर्शन केले होते. तसेच ज्या लोकांना असे तंटे सोडवण्यासाठी मदत हवी असेल तर त्यांनी संपर्क करावा अशी आवाहन केले होते. हाच धागा पकडून या विखुरलेल्या कुटुंबातील एका सदस्याने  पैठणकर यांच्याशी संपर्क साधला व अश्रू भरल्या नयनांनी आपली कहाणी कथन केली. त्यांने सांगितले की, आम्ही तीन भाऊ आणि दोन बहिणी असून आई वडील देवा घरी गेले आहेत.

मात्र संपत्ती व कौटुंबिक करण्यासाठी आम्ही गेल्या वीस वर्षापासून एकमेकांसोबत बोलत नाही. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश  पैठणकर यांनी या कुटुंबाला जिल्हा न्यायालयातील विधी सेवा प्राधिकरण कार्यालयात बोलावले. या सर्व मंडळींना कायदेशीर मार्गदर्शन केले. वाद विवादामुळे कुटुंब कसे उध्वस्त होतात, याबाबत त्यांनी जाणीव करून दिली. तुम्ही सर्व भावंडांनी पुन्हा एकत्र गुण्यागोविंदाने नांदावे यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने अनमोल मार्गदर्शन केले आणि या भावंडांना हा सल्ला पटला. अखेर तीन भाऊ आणि दोन बहिणींनी एकमेकांना मिठी मारली आणि अश्रू भरल्या डोळ्यांनी आनंदाला वाट मोकळी करून दिली. हृदय हेलावून टाकणारा हा प्रसंग नुकताच विधी सेवा प्राधिकरण कार्यालयामध्ये अनेकांनी अनुभवला. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे या भावंडांनी आभार मानले. 

टॅग्स :AkolaअकोलाFamilyपरिवारCourtन्यायालय