शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांना धक्क्यामागून धक्के; शरद पवारांकडे झुकताहेत नेते, लोकसभेनंतर आता विधानसभेलाही शह!
2
Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 Live: भाजपचेच सरकार बनणार; मतमोजणीपूर्वी हरियाणाचे मुख्यमंत्री सैनी यांचा दावा
3
आजचे राशीभविष्य ८ ऑक्टोबर २०२४; प्रत्येक कार्यात यश मिळण्याची शक्यता
4
बारामतीनंतर इंदापूरमध्येही मलिदा गँग: शरद पवार; हर्षवर्धन पाटील यांचा शरद पवार गटात प्रवेश
5
जम्मू-काश्मीर, हरयाणाचा आज फैसला, विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी जय्यत तयारी
6
जम्मू-काश्मीर, हरयाणाचा कौल कुणाला? हरयाणा, काश्मीरमध्ये भाजपाचा विजयाचा दावा
7
पंतप्रधान मोदींनी लिहिले ‘गरबा’ गाणे; दुर्गादेवीच्या शक्तीचे वर्णन, सोशल मीडियावर केले शेअर
8
सहकारी संस्था निवडणुका विधानसभेमुळे पुन्हा स्थगित; ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत पुढे ढकलल्या
9
धारावी घोटाळ्यामुळे मुंबई महापालिका निवडणूक नाही; आदित्य ठाकरे यांचा सरकारवर आरोप
10
“जो बोलता है, वो करता है और जो नहीं बोलता, वो...”; देवेंद्र फडणवीसांचे विरोधकांवर शरसंधान
11
निवडणूक आयुक्तपदी कोणाची वर्णी लागणार? महायुतीतील ३ पक्षांमध्ये होईना नावावर एकमत
12
निवडणुकीचे फड रंगले, वातावरण तापले; तासगावात आजी-माजी खासदार भिडले 
13
शिंदे समितीचा अहवाल सादर, धनगड दाखले रद्द; धनगर आंदोलनाला बळकटी देणाऱ्या घटना
14
मुंबईत परवडणाऱ्या घरांची निर्मिती अशक्य, ५० टक्के रक्कम जाते सरकारी तिजोरीत!
15
भुयारी मेट्रोतून १५ हजार मुंबईकरांचा प्रवास; पहिल्याच दिवशी झाली झोकात सुरुवात
16
चेंबूरच्या जळीतग्रस्तांचे दागिने, पैसेही गायब; गुप्ता कुटुंबाच्या नातलगाची तक्रार
17
अवयवांच्या विकासाचे संशोधन ठरले ‘नोबेल’पात्र; व्हिक्टर ॲम्ब्रोस, गॅरी रुवकून यांची निवड
18
आता सर्व पवार कुटुंब तुम्हाला भेटायला लागले, ओळख दाखवायला लागले; बारामतीकरांसमोर अजितदादांची तुफान फटकेबाजी
19
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
20
ऑटोचा धक्का लागल्यावरून वाद अन् नंतर तुफान दगडफेक; अकोल्यात नेमकं काय घडलं?

शेतकरी-शास्त्रज्ञ सुसंवादातूनच शेतीची प्रगती - कुलगुरू दाणी खरीप हंगामपूर्व मेळाव्याला वर्‍हाडातील शेतकर्‍यांचा प्रतिसाद

By admin | Published: May 20, 2014 6:48 PM

शेतकरी-कृषी शास्त्रज्ञांच्या संवादातूनच शेतीच्या प्रगतीकडे वाटचाल करता येणार असून, प्रगतिशील शेतकर्‍यांनी कृषी तंत्रज्ञान व स्वत:च्या अनुभवाची सांगड घालून शेतीचे नियोजन करावे, असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर.जी.दाणी यांनी केले.

अकोला : शेतकरी-कृषी शास्त्रज्ञांच्या संवादातूनच शेतीच्या प्रगतीकडे वाटचाल करता येणार असून, प्रगतिशील शेतकर्‍यांनी कृषी तंत्रज्ञान व स्वत:च्या अनुभवाची सांगड घालून शेतीचे नियोजन करावे, असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर.जी.दाणी यांनी केले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्यावतीने डॉ. के.आर. ठाकरे सभागृहात मंगळवार २० मे रोजी आयोजित खरीप हंगामपूर्व कृषी मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. दाणी बोलते होते.मेळाव्याला संशोधन संचालक डॉ. प्रदीप इंगोले, शिक्षण विस्तार संचालक डॉ. विजय माहोरकर, डॉ. एम.व्ही. भाले, डॉ. सी.एन. गांगडे, प्रगतिशील शेतकरी पंढरी बनकर,कुलदीप राऊत, किशोर बलखंडे,शिक्षण विस्तार संचालनालयाचेप्रमुख संपादक डॉ.प्रमोद वाळके आदींची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. दाणी यांनी शेतकरीच कृषी विद्यापीठाचा मार्गदर्शक व संदेशवाहक असल्याचे सांगितले. कृषी विद्यापीठ निर्मित संशोधन तंत्रज्ञानाचा प्रसार शेतकर्‍यांनी करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. येत्या खरीप हंगामात शेतकर्‍यांनी किडीबाबत खबरदारी घ्यावी लागणार आहे. त्याकरिता पिकावर नवीन कीड दिसताच शेतकर्‍यांनी विलंब न करता, कृषी विद्यापीठांच्या कीटकशास्त्र विभागाशी संपर्क साधावा म्हणजे संभाव्य नुकसान टाळता येईल, असे आवाहनही त्यांनी केले.यावेळी शेतकर्‍यांनी शेतीत केलेले प्रयोग सादर केले. शेतकरी-शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रमात शेतकर्‍यांच्या अनेक प्रश्नाची उत्तरे कृषी शास्त्रज्ञांनी दिली. तांत्रिक सत्रात विविध पीक व पेरणीची माहिती कृषी शास्त्रज्ञांनी शेतकर्‍यांना दिली. या मेळाव्याच्या ठिकाणी कृषी विद्यापीठाचे ५० क्विंटल सोयाबीन बियाणे शेतकर्‍यांनी खरेदी केले. तारा तूर, मूग व भाजीपाले बियाणे, निविष्ठा, प्रकाशने विक्रीसाठी ठेवले होते. शेतकर्‍यांनी या सर्वच साहित्य बियाण्यांची खरेदी केली. कृषी विद्यापीठाची १० ते १२ क्विंटल तारा तूर शेतकर्‍यांनी खरेदी केली.-आंतरराष्ट्रीय शेती सुसंवाद कार्यक्रमाचे आयोजन विदर्भ व पाश्चिमात्य शेतकर्‍यांचा समन्वय घडवून आणण्यासाठी येत्या ४ ते १० डिसंेबर रोजी आंतरराष्ट्रीय शेती सुसंवाद कार्यक्रमाचे आयोजन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्यावतीने करण्यात येत असल्याची घोषणा कुलगुरू डॉ. दाणी यांनी या मेळाव्यात केली. पाश्चिमात्य शेतीतील प्रयोग विदर्भातील शेतकर्‍यांना माहिती व्हावेत, यासाठी हे प्रयत्न केले जात असल्याचे डॉ. दाणी यांनी सांगितले.