शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्षभर वेळ मागितला, तरी दिला नाही; मातोश्रीवर गेलो तिथे ६ तास थांबवलं अन् २ मिनिटे भेटले"
2
भारत-चीन सैन्य मागे घेण्यास सुरुवात; येत्या तीन दिवसांत टेंट, शेड अन् इमारती हटवल्या जाणार
3
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील शूटरला देश सोडण्यासाठी पासपोर्ट देण्याचं दिलेलं आश्वासन
4
आदित्य ठाकरेंकडे ५३५ हिरे लगडलेले कडे, दीड किलो सोने...; प्रतिज्ञापत्रात उद्धव ठाकरेंचेही उत्पन्न केले जाहीर
5
विधानसभा निवडणुकीत महायुतीचा स्ट्राइकरेट कसा असेल? मुख्यमंत्री शिंदे यांनी एका वाक्यात सांगितलं 
6
Maharashtra Assembly Election 2024: दिनकर पाटलांमुळे भाजपला फटका? नाशिकमध्ये समीकरण बदललं!
7
"राहुल गांधींच्या विधानाची मोडतोड करून फेक नरेटिव्ह पसरवण्याचा भाजपाचा प्रयत्न’’, नाना पटोले यांचा आरोप
8
कुणीही कितीही काहीही केले तरी लाडकी बहिण योजना बंद होणार नाही, CM शिंदेंचा जनतेला विश्वास
9
सर्वाधिक मताधिक्याने जिंकलेल्या अपक्ष आमदाराला महायुती, मविआत प्रवेश बंदी, काय घडलं?
10
IND vs NZ : कॅप्टन Tom Latham ची बॅट तळपली; न्यूझीलंडनं घेतलीये ३०१ धावांची आघाडी
11
दिल्लीत जाताच मविआचा फॉर्म्युला बदलला; ठाकरे सेनेच्या जागा ९० झाल्या, थोरात म्हणाले...
12
काय सांगता? महिन्याला १ लाख रुपये कमवतात भिकारी; स्मार्टफोनसह पॅनकार्डचाही करतात वापर
13
Maharashtra Assembly 2024: मेघना बोर्डीकर विरुद्ध विजय भांबळे; जिंतूरमध्ये राजकीय गणित कसं?
14
पुण्यात पोलिसांच्या नाकाबंदीत १३८ कोटींचं सोनं पकडलं; सोनं आलं कुठून? तपास सुरु...
15
Sonu Sood : "आपला देश सुरक्षित"; बॉलिवूडवरील गँगस्टरच्या दहशतीवर सोनू सूद रोखठोक बोलला!
16
कोकणात मविआमध्ये बंडखोरी, सावंतवाडीत अर्चना घारे-परब यांनी भरला उमेदवारी अर्ज
17
नाशिक शहरात एकही जागा काँग्रेसला नाही; इच्छुक ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात अपक्ष लढणार
18
रोहितच्या नावे लाजिरवाणा विक्रम; धोनी-विराटच्या कॅप्टन्सीत असं कधीच नाही घडलं
19
दलित वसाहतीला आग लावणाऱ्या 101 जणांना न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा...
20
एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अदानी-अंबानींच्या कंपन्यांनाही टाकलंय मागे

अकोला जिल्ह्यातील कापूस केंद्रावर शेतकऱ्यांची थट्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 10:05 AM

लॉकडाउनमुळे व्यापारीही कापूस खरेदी करीत नसल्याने कापसाचे काय करावे, असा प्रश्न शेतकºयांना आहे.

- प्रशांत विखे लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा: भाववाढीच्या उद्देशाने घरात कापूस ठेवलेल्या शेतकऱ्यांना सीसीआयची कापूस खरेदी सुरू झाल्याने दिलासा मिळाला होता; मात्र तेल्हारा येथील कापूस खरेदी केंद्रावर शेतकºयांची थट्टा सुरू असल्याचे चित्र आहे. कापूस खरेदीसाठी लावलेले निकष शेतकºयांच्या मानगुटीवर बसले आहेत. दर्जेदार नसल्याचे कारण समोर अनेक शेतकºयांचा कापूस परत करण्यात येत आहे. लॉकडाउनमुळे व्यापारीही कापूस खरेदी करीत नसल्याने कापसाचे काय करावे, असा प्रश्न शेतकºयांना आहे.सीसीआय केंद्रावर राज्य शासन राज्य पणन महासंघ (फेडरेशन) मार्फत कापूस खरेदी करीत आहे. कापूस उत्पादक शेतकºयांची संख्या तीन हजाराच्यावर आहे. अगोदरच उशिरा सुरू झालेली खरेदी व त्यात लॉकडाउन सुरू असल्याने सुरुवातीला १५ व नंतर ३० शेतकºयांना केंद्र्रावर कापूस विक्रीकरिता बोलावत आहे. अनेक दिवसांपासून घरात पडलेला कापूस काही प्रमाणात डागी झाला किंवा थोड्याफार प्रमाणात मागील वेचणीचा कापूस ट्रॅक्टर-ट्रॉलीमध्ये आला तर केंद्रावरून पूर्ण ट्रॉली परत पाठविण्यात येत आहे. शेतकºयांनी आपआपल्या परीने घरात किंवा गोडावूनमध्ये कापूस भरून ठेवला असताना केंद्रावर आणलेला कापूस केंद्रप्रमुख या ना त्या कारणाने परत पाठवित आहेत. असाच प्रकार शेतकºयांसोबत शुक्रवारी घडला. शेतकºयांचा आक्रोश बघता तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी, बाजार समितीचे सभापती, संचालक, सहायक निबंधकचे कर्मचारी खरेदी केंद्रावर पोहोचले होते. १४ मेपर्यंत केवळ ३११ शेतकºयांचा कापूस मोजला गेल्याची माहिती मिळाली असून, ३ हजाराच्यावर किंवा जवळपास असलेल्या शेतकºयांचा कापूस केव्हा मोजल्या जाईल व त्याचे पैसे केव्हा मिळतील,असा प्रश्न आहे. प्रतीक्षा करूनही जर कापूस खरेदी केला नाही तर काय करायचे, असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे. कापसाची अवस्था बघता शासनाची ही खरेदी जगू देत नाही अन् मरू पण देत नाही, अशा अवस्थेत शेतकरी आहे. त्यामुळे यावर्षी शेतकरी कापसाचा पेरा करणार नसल्याचे चित्र आहे.शेतकºयांचे नियोजन बिघडले कापूस विकून शेतकरी खरिपाचे नियोजन करतात. यावर्षी सीसीआय केंद्रावर कापूस खरेदीस मोठ्या प्रमाणात विलंब होत आहे. तसेच व्यापारीही कापूस खरेदी करीत नसल्याने शेतकºयांचे नियोजन बिघडले आहे. खरीप हंगाम काही आठवड्यावर आला असल्याने कापूस खरेदीचा वेग वाढविण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.

मी कापूस खरेदी ही शासनाच्या निकषानुसार करीत आहे. निकषात बसत नसलेला कापूस नाइलाजास्तव परत पाठविल्या जात आहे.-जगन्नाथ बोंडे,ग्रेडर, तेल्हारा.

 

टॅग्स :Telharaतेल्हाराAkolaअकोलाFarmerशेतकरी