शहरं
Join us  
Trending Stories
1
लेबनॉनचे लष्कर, सरकार गायब! लोक सिरियाकडे पलायन करू लागले, रात्र काढली रस्त्यावर बसून
2
भाजपा नेते हर्षवर्धन पाटलांना राष्ट्रवादीत घेणार का?; शरद पवारांचं मोठं विधान
3
मविआत उद्धव ठाकरेंवर दबाव?; ठाकरे गटाच्या नेत्याचा काँग्रेसला गर्भित इशारा
4
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
5
'त्या' खेळाडूंवर बंदी घालायलाच हवी; नवीन नियमाचे इरफान पठाणकडून स्वागत; BCCI चे आभार!
6
₹100000 पार जाणार सोन्याचा भाव...? दिसतोय US Fed च्या निर्णयाचा परिणाम! या वर्षात झाली 30% वाढ
7
पितृपक्षात सोम प्रदोष शिवरात्री: ‘या’ गोष्टी अवश्य करा; पितृदोष मुक्तता, महादेव कृपा करतील!
8
धक्कादायक! गाडी नीट चालवायला सांगितली म्हणून पोलिसाची केली हत्या; दिल्लीतील घटना
9
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना पितृपक्षाची शुभ सांगता, ऑक्टोबर आणेल अच्छे दिन; अपार यश-लाभ!
10
आता IPL मधून माघार घेणाऱ्या खेळाडूला मोजावी लागणार मोठी किंमत; जाणून घ्या नवा नियम
11
पितृपक्ष: एकाच दिवशी प्रदोष शिवरात्री शुभ संयोग; कसे करावे व्रत? पाहा, महात्म्य अन् मान्यता
12
IND vs BAN T20 : ऋतुराज गायकवाडला पुन्हा डच्चू! चाहत्यांचा रोष; चांगली कामगिरी असूनही वगळलं
13
भाजपाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार फोडला; विधानसभा निवडणुकीपूर्वीच मोठा झटका दिला
14
"CSK च्या चाहत्यांसाठी दुःखाची बाब आहे पण...", गंभीरची जागा घेताच ड्वेन ब्राव्हो भावुक
15
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
16
अमेरिकेनं दिलेल्या 5000 पाउंड वजनाच्या 'स्पेशल गिफ्ट'नं मरला गेला नसरल्लाह! इराणचा मोठा दावा
17
Video: पगार ६० लाख पण जगणं कठीण; कॅनडात भारतीयांना पैसे पुरेना, कारण काय?
18
कोल्हापूर : दोन्ही आघाड्यांच्या संभाव्य उमेदवारांचे चित्र स्पष्ट; सहा मतदारसंघात बंडखोरीची शक्यता
19
IND vs BAB, 2nd Test, Day 3 : तिसऱ्या दिवशी तरी खेळाडू मैदानात उतरणार का?
20
कोल्डप्ले तिकिट विक्री वादावर Book My Show चं स्पष्टीकरण; काळाबाजाराचा आरोप

शेतक-यांनी ४१ लाख क्विंटल कापूस विकला व्यापा-यांना!

By admin | Published: December 07, 2015 2:49 AM

सीसीआय आणि पणणकडून चुका-यास विलंबाचा परिणाम.

अकोला : कापूस उत्पादक शेतकर्‍यांनी यावर्षी खासगी बाजारात आतापर्यंत ४१ लाख २९ हजार क्विंटलपेक्षघ जास्त कापूस विकला असून, पणन महासंघाकडे १ लाख ७२ हजार ३८८, तर भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) २ लाख ९४ हजार ३३६ क्विंटल कापूस खरेदी केला आहे. आधारभूत किमतीपेक्षा १00 रुपये जास्त मिळत असल्याने शेतकर्‍यांनी व्यापार्‍यांना कापूस विकला आहे. यावर्षी कापसाचे चुकारे बँके त थेट शेतकर्‍यांच्या खात्यात जमा होत असल्याने चुकार्‍यांना विलंब होऊन शेतकरी खासगी व्यापार्‍यांकडे वळला असल्याचे दिसून येते. सीसीआयने यावर्षी कापूस उत्पादक भागात ४८ कापूस खरेदी केंद्र सुरू केली असून, २ लाख ९४ हजार ३३६ क्विंटल कापूस खरेदी केला. पणन महासंघाने ७९ खरेदी केंद्रे सुरू केली. कापसाचे हमी दर प्रतिक्विंटल ४१00 रुपये असले तरी प्रतवारीचे निकष लावून खरेदी केली जात असल्याने शेतकर्‍यांना प्रत्यक्षात ३९00 ते ३९५0 रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहेत. सीसीआय आणि पणन महासंघाच्या कापूस खरेदी केंद्रावर प्रतवारीचे निकष लावले जात असल्याचे बघून व्यापार्‍यांकडून थेट गावात जाऊन कापूस खरेदी केला जात आहे. यावर्षीचा दुष्काळ आणि खरीप पिकांचे झालेले नुकसान बघता कापसाचा उत्पादन खर्च निघावा, यासाठी येत्या हिवाळी अधिवेशनात कापसाला बोनस किंवा सामाजिक सुरक्षितता म्हणून दरवाढीची घोषणा होईल, यासाठी अनेक शेतकर्‍यांनी कापूस अद्याप विकलेला नाही. यासंदर्भात महाराष्ट्र कापूस उत्पादक सहकारी पणन महासंघाचे अध्यक्ष डॉ. एन.पी. हिराणी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यावर्षी आतापर्यंत १ लाख ७२ हजार क्विंटल कापूस खरेदी केला असून, ५ डिसेंबरपर्यंतचे चुकारे बँकेत जमा केले असल्याचे सांगीतले. चुकारे मिळण्यास शेतकर्‍यांना सुरुवातीला अडचण वाटत असेल, पण ही योजना चांगली असल्याचे पुस्ती त्यांनी जोडली.