शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

कोवळ्या पिकांच्या रक्षणासाठी शेतकऱ्यांची रात्रभर जागल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 10:51 IST

Farmers stay up all night to protect their crops : कोवळ्या पिकांवर वन्य प्राणी ताव मारत असून, पीक फस्त करीत असल्याचे चित्र आहे.

- रवी दामोदर

अकोला: शेतकऱ्यांवरील संकटांची मालिका संपत नसल्याचे चित्र आहे. एकीकडे कोरोना विषाणू, तर दुसरीकडे अस्मानी संकट यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. शेतकरी दुहेरी संकटात असतानाच शेतकऱ्यांसमोर आणखी एक संकट उभे ठाकले आहे. जूनच्या प्रारंभी पावसाने चांगली सुरुवात केल्याने जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी पेरणी आटोपली होती. सध्या शेतकऱ्यांनी पेरलेली पिके शेतात डोलू लागली आहेत. या कोवळ्या पिकांवर वन्य प्राणी ताव मारत असून, पीक फस्त करीत असल्याचे चित्र आहे. पिके पावसाअभावी व वन्य प्राण्यांपासून वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रभर जागल करावी लागत असल्याचे चित्र आहे.

गत आठवडाभरापासून पावसाने दडी मारल्याने डोलणाऱ्या पिकांनी पावसाअभावी माना टाकल्या आहेत. पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. अशातच जिल्ह्यात ठिकठिकाणी वन्य प्राण्यांनी आपला मोर्चा आता कोवळ्या पिकांकडे वळविला असून, शेतकरी आता तिहेरी संकटात सापडल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. पुढील आठवडाभरात दमदार पावसाने हजेरी न लावल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची टांगती तलवार आहे. (फोटो)

 

पाऊसही रुसला!

येत्या आठवडाभरात पाऊस न झाल्यास उगवलेली पिके जळून जाण्याचा धोका वाढला आहे. त्याचबरोबर दुबार पेरणीची वेळ आली, तर शेतकऱ्यांना आर्थिक झळ सोसावी लागणार आहे. सध्या जी पिके शेतात उगवली आहेत त्या पिकांना पाण्याची गरज आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय आहे, ते शेतकरी स्प्रिंक्लरद्वारे पाणी देत आहेत. जर पाऊस लांबला, तर दुबार पेरणीशिवाय पर्याय नाही.

 

 

रात्रीस खेळ चाले!

दिवसा बहुतांश शेतकरी शेतात असल्याने वन्य प्राणी शेतात येत नाही. परंतु रात्रीच्या सुमारास हरीण, रानडुकरांचे कळपचे कळप उगवलेल्या पिकांवर ताव मारीत आहेत. त्यामुळे शेतकरी स्वत:चा जी धोक्यात टाकून रात्रीच्या सुमारास जागल करून पिकांचे रक्षण करीत असल्याचे चित्र आहे.

---------------------

दररोज ढग येतात दाटून!

मृग नक्षत्रात सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने काही शेतकऱ्यांनी पेरणी आटोपली. त्यानंतर पावसाने दडी मारल्याने पेरणी करून उगवलेली पिके आता पावसाच्या प्रतीक्षेत असताना पाऊस मात्र गायब झाला आहे. दररोज आकाशात ढग दाटून येतात. सकाळी पाऊस येईल, असे वातावरण निर्माण होते, तर सायंकाळच्या सुमारास आलेले ढग न बरसताच निघून जातात.

 

जून महिन्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने सोयाबीन पिकाची पेरणी केली. पावसाने दडी मारल्याने सिंचनाद्वारे पीक वाचविण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशातच वन्य प्राणी रात्रीच्या सुमारास उगवलेले पीक फस्त करीत असल्याने रात्रभर जागल करून पिकांचे रक्षण करावे लागते. सध्या पावसाची प्रतीक्षा आहे.

- ऋषिकेश घोगरे, शेतकरी.

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी