शहरं
Join us  
Trending Stories
1
VBA Candidate List 2024: आंबेडकरांनी 30 उमेदवारांची केली घोषणा; आदित्य ठाकरेंविरोधात कोण?
2
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
3
नागपूर : न केलेल्या गुन्ह्यात १९ दिवस गेला कारागृहात अन्...; पोलिसांच्या चुकीची भोगतोय शिक्षा
4
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
5
नागपूर : ‘तुझे राजकारण संपले’ म्हणत काँग्रेस पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला
6
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
7
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा
8
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी उघडली; आता नवीन मूर्ती समोर आली, काय आहे खास?
9
विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख
10
झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
11
"संबधित निशाणी रद्द करून देतो"; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप
12
भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला PM जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा
13
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
14
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
15
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
16
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
17
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
18
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
19
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?
20
योगींसह 'या' नेत्यांच्या सुरक्षेतून NSG चे ब्लॅक कॅट कमांडो हटवणार, सरकारने आखली नवीन योजना

अकोला जिल्ह्यात शेतक-याची आत्महत्या

By admin | Published: August 21, 2015 10:38 PM

सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणा कारणीभूत.

पाथर्डी (अकोला): सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील पाथर्डी येथील शेतकरी मंगल वासुदेवराव लुटे (वय ४५) यांनी शुक्रवारी आत्महत्या केली. जून महिन्याच्या पहिल्या आणि दुसर्‍या आठवड्यात जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकर्‍यांनी पेरणी केली; मात्र नंतर पावसाने जवळपास महिनाभर दडी मारली. त्यामुळे पिके सुकली. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दमदार पाऊस झाला. परिणामी पिकांची नासाडी झाली. अनेक शेतकर्‍यांवर दुबार पेरणीची वेळ आली. याच परिस्थितीला तोंड देत पाथर्डी येथील शेतकरी मंगल लुटे हे हतबल झाले होते. त्यांच्याकडे तीन एकर शेती होती. त्यांनी शेतीसाठी ८0 हजार रुपये कर्ज काढले; मात्र सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे त्यांनी झाडाला गळफास बांधून आत्महत्या केली. त्यांच्या पश्‍चात आई, वडील, पत्नी, भाऊ असा बराच आप्त परिवार आहे. याप्रकरणी तेल्हारा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये एकूणच परिस्थिती नमुद केली आहे.