शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनोज जरांगेंनी २८८ जागांवर उमेदवार उभे करावेत, आम्ही स्वागतच करू”; लक्ष्मण हाकेंचे आव्हान
2
टोलमाफी, २ नदीजोड प्रकल्पांना मंजुरीसह राज्य मंत्रिमंडळाने घेतले १९ मोठे निर्णय
3
अजितदादांच्या आमदाराचा पारा चढला; महायुतीतील मित्रपक्षाच्या नेत्यांनाच इशारा
4
"या कामाची पोचपावती जनता निवडणुकीत देईल"; टोलमाफीच्या निर्णयावर CM शिंदेंची प्रतिक्रिया
5
PAK vs ENG : शाहीनला मोठा झटका! PCB ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता आफ्रिदीची लक्षवेधी पोस्ट
6
Surbhi Chandna : "रोज रात्री रडायची..."; १३ वर्षे डेट केल्यावर अभिनेत्रीला लग्न केल्याचा पश्चाताप, झाली भावुक
7
२०१९ नंतर पहिल्यांदाच एका दिवसात Dmart च्या शेअरमध्ये मोठी घसरण, गुंतवणूकदारांना कसली भीती?
8
बाबा सिद्दिकीच नाही तर या नेत्यांच्या हत्यांनीही हादरली होती मुंबई, समोर आला होता अंडरवर्ल्डचा हात
9
“CMपदाच्या चेहऱ्यापेक्षा महाभ्रष्ट महायुती सरकार घालवणे महत्त्वाचे”: बाळासाहेब थोरात
10
Rohit Sharma Hardik Pandya, Mumbai Indians IPL 2025: हार्दिक पांड्या, रोहित शर्मा अन् मुंबई इंडियन्स... जयवर्धने हेड कोच होताच आकाश चोप्राची मोठी भविष्यवाणी
11
जेव्हा करीनाने बहिणीला पहिल्यांदा सांगितलं होतं सैफबद्दल, तेव्हा करिश्माने दिली होती ही रिअ‍ॅक्शन
12
Kojagiri Purnima 2024: कोजागरी विशेष 'हे' लक्ष्मी मंत्र; करतील कर्जमुक्त; वाचा हे विशेष तोडगे!
13
Raj Thackeray reaction, Toll Free in Mumbai: "सरकारला उशिराने सुबुद्धी, निर्णय निवडणुकीपुरता न ठेवता..."; मुंबई टोलमाफीवर राज ठाकरेंची रोखठोक प्रतिक्रिया
14
Kojagiri Purnima 2024: कोजागरी पौर्णिमेला का खेळला जातो महाभोंडला? हा केवळ खेळ आहे की पुजा? वाचा!
15
इमर्जिंग आशिया चषकासाठी Team India ची घोषणा; तिलककडे नेतृत्व, ऋतुराज गायकवाडला डच्चू
16
'या' योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांना करू शकतं १५ लाखांची मदत; जाणून घ्या अर्ज कसा करावा?
17
प्राजक्ता माळीच्या 'फुलवंती'ची कळी खुलेना? ३ दिवसांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
18
कोल्हापूर दौरा, अचानक समोर तालमीतला मित्र दिसला, मोहोळांनी गाडी थांबवून गळाभेट घेतली...
19
Reliance Jio नं लाँच केले २ नवे रिचार्ज प्लॅन्स; केवळ १ रुपयाचा फरक, कोणता आहे बेस्ट? 
20
स्वप्निलला राज्य सरकारकडून २ कोटी! वडील सुरेश कुसाळेंच्या नाराजीनंतर मोठी घोषणा

ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतातुर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 4:32 AM

बाळापूर: ढगाळ वातावरण व पहाटेच्या सुमारास पडणाऱ्या धुक्यामुळे शेतकरी चिंतातुर झाला आहे. सध्या ग्रामीण भागातील शेतशिवारात रब्बी हंगामातील हरभऱ्याचे ...

बाळापूर: ढगाळ वातावरण व पहाटेच्या सुमारास पडणाऱ्या धुक्यामुळे शेतकरी चिंतातुर झाला आहे. सध्या ग्रामीण भागातील शेतशिवारात रब्बी हंगामातील हरभऱ्याचे पीक बहरलेले आहे. तसेच तुरीच्या पिकाला शेंंगा लागलेल्या आहेत. ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्यावर मर रोगाचा प्रादुर्भाव वाढला, तर तुरीवर अळींचा प्रादुर्भाव वाढला आहे. अळीचा बंदोबस्त करण्यासाठी कीटकनाशक फवारणीची लगबग शेतशिवारात दिसून येत आहे.

सततचा पाऊस व परतीच्या पावसामुळे यावर्षीच्या खरीप हंगामात उडीद, मूग, ज्वारी, सोयाबीन, कापूस पिकांची मोठी हानी झाली. लावलेला खर्चही वसूल न झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात आहेत. तुरीचे पीक चांगले येईल, अशी आशा बाळगून असताना तालुक्यातील ग्रामीण भागात तूर पिकावर अळीने थैमान घातले आहे. तूर पीक वाचविण्यासाठी शेतशिवारात फवारणी करण्यात येत आहे.

तालुक्यातील टाकळी खुरेशी, माणकी, खिरपुरी, व्याळा, देगाव, बोरगाव वैराळे, अंदुरा, निमकर्दा, शिंगोली, दुधाळा, लोणाग्रा, मालवाडा, मंडाळा, टाकळी खोजबळ या परिसरात तुरीची पेरणी मोठ्या प्रमाणात आहे; मात्र सध्या ढगाळ वातावरणामुळे तुरीच्या फुलोऱ्याची गळती होत असल्याने उत्पादन घटण्याची शक्यता नाकारता येत नाही. अळीचा प्रादुर्भाव झाल्याने तुरीचे पीक धोक्यात सापडले आहे.

रब्बी हंगामात यंदा हरभऱ्याची पेरणी वाढली आहे. सध्या हरभऱ्याचे पीक अंकुरलेले आहे; मात्र ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्यावर मर रोगाचे आक्रमण झाल्याने शेतकरी चिंतातुर आहे. त्यामुळे कृषी विभागाने परिसरात जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

------------------------------

यंदा खरीप हंगामात लागवडीचा खर्चही वसूल झाला नाही. सध्या रब्बी हंगामातील हरभऱ्याचे पीक बहरलेले आहे; मात्र ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्यावर मर रोगाचे आक्रमण वाढल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.

- प्रमोद सिरसाट, शेतकरी, मानकी