शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

"लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य सरकारने धोक्यात आणले"; काँग्रेसच्यावतीने चिकलफेक आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2024 13:13 IST

सत्ताधारी पक्षाकडून जाती धर्माच्या नावाखाली आरक्षणाचे वाद निर्माण करून जाती-जातीत भांडणे लावत राज्यातील सामाजिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न सरकारने चालविला असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

- मनोज भिवगडे

अकोला : जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने भाजपच्या विरोधात शुक्रवार, दि. २१ जून रोजी सकाळी ११ वाजता चिखलफेक आंदोलन करण्यात आले. राज्यातील कायदा व सुव्यवस्था, रोजगाराचे प्रश्न, सरकारचा भ्रष्टाचार आदी विषयांचा निषेध नोंदवित ह आंदोलन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपत्री राजश्री शाहू महाराज, महात्मा जोतीबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने चालणाऱ्या महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा फासण्याचे काम महाराष्ट्रातील युती सरकारने केले असल्याचा आरोप करीत हे चिखलफेक आंदोलन करण्यात आले. 

सत्ताधारी पक्षाकडून जाती धर्माच्या नावाखाली आरक्षणाचे वाद निर्माण करून जाती-जातीत भांडणे लावत राज्यातील सामाजिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न सरकारने चालविला असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. मागील दहा वर्षांपासून केंद्रातील भाजप सरकारने महाराष्ट्रातील औद्योगिक विकासाला खीळ घातली असून, राज्यातील मोठे उद्योग गुजरातला पळविण्यात येत असल्याचा आरोप यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला. सरकारी नोकर भरती केली जात नाही. स्पर्धा परीक्षा वेळेवर घेतल्या जात नाही. या परीक्षा घेतल्या तर पेपर फुटीचे ग्रहण लागते. नीट परीक्षेच्या पेपर फुटी व निकालातील घोळाने देशातील लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य सरकारने धोक्यात आणले आहे. राज्यातील पोलिस भरती चिखलात सुरू आहे. यामुळे उमेदवारांचे नुकसान होत आहे. 

सरकार रिक्त पदे भरण्याबाबत कोणत्याही उपाययोजना करीत नाही. त्यामुळे रोजगाराचा प्रश्न गंभीर होताना दिसत असून, राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे बिघडलेली आहे. गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. महिला, युवतींचे दिवसाढवळ्या रस्त्यावर खून पाडले जात आहे. राज्यातील शेतकरी भयंकर संकटात आहे, पण त्यांना मदत दिली जात नाही. कांदा, कापूस, सोयाबीन असा कोणत्याही शेतमालाला भाव नाही. सरकार एमएसपी देत नाही. कठीण काळात जनतेला मदत करण्या ऐवजी सरकार जनतेचे शोषण आणि आर्थिक पिळवणूक करीत आहे. राज्यात खते, बी-बियाण्यांचा काळाबाजार सुरू असून, कर्जासाठी शेतकऱ्यांची अडवून केली जात आहे. सरकारच्या आशीर्वादाने श्रीमंतांची मुले गोरगरीब लोकांना गाड्याखाली चिडत असल्याचा आरोप करीत काँग्रेसच्या वतीने हे चिखलफेक आंदोलन करण्यात आले. 

या आंदोलनात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक मानकर, महानगराध्यक्ष डॉ. प्रशांत वानखडे, माजी राज्यमंत्री खान अजहर हुसेन, माजी आमदार बबनराव चौधरी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणी डॉ. अभय पाटील, सचिव प्रकाश तायडे, मदन भरगड, मनपाचे माजी विरोधी पक्ष नेता साजिद खान पठाण, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव डॉ, झिशान हुसेन, प्रवक्ते डॉ.सुधीर ढोणे, डॉ. सुभाष कोरपे, विवेक पारस्कर, महेश गणगणे, कपिल रावदेव, महेंद्र गवई, विजय देशमुख, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पूजा काळे, पुष्पा देशमुख, भूषण गायकवाड, प्रमोद डोंगरे, महानगर काँग्रेस कमिटीचे निरीक्षक धनंजय देशमुख आदींसह काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

टॅग्स :Akolaअकोलाcongressकाँग्रेस