शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

अकोला, अमरावती व बुलडाणा जिल्ह्यातील खारपाणपट्टा प्रकल्पाचे नियोजन अंतिम टप्प्यात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 01:42 IST

अकोला: अकोला, अमरावती व बुलडाणा जिल्ह्यातील खारपाणपट्टय़ातील प्रकल्पाच्या कामास विलंब होत असल्यामुळे शेतकरी प्रतीक्षेत आहेत. सदर प्रकल्प कधी पूर्णत्वास जातील, असा सवाल विधान परिषद सदस्य गोपीकिशन बाजोरिया यांनी सभागृहात उपस्थित केला असता खारपाणपट्टय़ातील प्रकल्पांची आखणी व अंमलबजावणीचे नियोजन टप्प्यात असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांनी दिली. 

ठळक मुद्देआ. बाजोरिया यांच्या प्रश्नावर ना. फुंडकर यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: अकोला, अमरावती व बुलडाणा जिल्ह्यातील खारपाणपट्टय़ातील प्रकल्पाच्या कामास विलंब होत असल्यामुळे शेतकरी प्रतीक्षेत आहेत. सदर प्रकल्प कधी पूर्णत्वास जातील, असा सवाल विधान परिषद सदस्य गोपीकिशन बाजोरिया यांनी सभागृहात उपस्थित केला असता खारपाणपट्टय़ातील प्रकल्पांची आखणी व अंमलबजावणीचे नियोजन टप्प्यात असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांनी दिली. अकोला, अमरावती व बुलडाणा जिल्ह्यातील १६ तालुक्यांमध्ये खारपाणपट्टय़ाचा भाग समाविष्ट होतो. खारपाणपट्टय़ातील ४ लाख १६ हजार हेक्टर जमिनीचा विकास करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या भागात नेमक्या कोणत्या विकास कामांचा समावेश असून, प्रकल्पांचे कामकाज कधी पूर्ण होईल, असा सवाल विधिमंडळात आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी उपस्थित केला. रखडलेल्या प्रकल्पांची शासन स्तरावरून चौकशी झाली का, असा प्रश्न उपस्थित करून आ. बाजोरिया यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. खारपाणपट्टय़ातील प्रकल्पांचा निर्णय जुलै २0१६ मध्ये घेण्यात आला होता. प्रकल्प पूर्णत्वास जाण्यासाठी त्यांची आखणी व अंमलबजावणीचे नियोजन अंतिम टप्प्यात असल्याची माहिती कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी दिली. 

पुलांच्या कामाला विलंब का?

  • राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ च्या चौपदरीकरणाचे काम सुरू झाले आहे. मागील काही दिवसांपासून चौपदरीकरणाच्या कामाची गती मंदावली असून, समृद्धी महामार्गाच्या कामामुळे हा परिणाम झाला का, असा प्रश्न आ. गोपीकिशन बाजोरिया यांनी उपस्थित केला. 
  • अमरावती ते अकोला ते बाळापूर-खामगाव ते चिखलीपर्यंतच्या मार्गाचे चौपदरीकरण होत असले तरी महामार्गावर आवश्यक ठिकाणी असणार्‍या पुलांचे काम अद्यापही सुरू झाले नाही. रस्त्याचे काम टप्प्याटप्प्याने पूर्ण होत असतानाच पुलांचे कामही सुरू होणे गरजेचे असल्याचा मुद्दा आ. बाजोरिया यांनी उपस्थित केला. 
  • त्यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम २0१९ पर्यंत पूर्ण होणार असल्याचे सांगितले. तसेच पुलांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणला दिले. 
टॅग्स :Bhausaheb Phundkarभाऊसाहेब फुंडकरGopikishan Bajoriaगोपीकिशन बाजोरीयाAkola Ruralअकोला ग्रामीण