शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

शेतकऱ्यांना मदत करण्याची सरकारला सद्बुद्धी द्यावी - 'वंचित'चे आंदोलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2020 17:20 IST

Akola News, Agitation शेतकऱ्यांना मदत करण्याची सरकारला सद्बुद्धी द्यावी यासाठी वंचित बहुजन आघाडीचेवतीने आंदोलन करण्यात आले.

अकोला : अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टरवरील कापूस, सोयाबीन, तूर, मूग उडीद ही महत्त्वाची पिके उद‍्ध्वस्त झाली. सलग ८० दिवस शेतात पाणी साचून राहिल्याने झाडांना कीड लागून तेही कुजले. कापसाचे झाड एक फुटापेक्षा अधिक वाढले नाही. पुरामुळे अनेक ठिकाणी शेतातला सुपीक मातीचा थर वाहून गेल्याने नवीनच संकट उभे राहिले आहे. जुने कर्ज कायम असताना नव्या कर्जामुळे शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याची गरज असून, सरकारी पातळीवर सगळीकडे अनास्थाच दिसून येतेय. याचा निषेध करतानाच शेतकऱ्यांना मदत करण्याची सरकारला सद्बुद्धी द्यावी यासाठी वंचित बहुजन आघाडीचेवतीनेआंदोलन करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर झालेल्या या आंदाेलनात सरकाराच्या नाकर्तेपणाबद्दल राेष व्यक्त करण्यात आला. या आंदाेलनानंतर जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवदेनात नमूद केले आहे की, दुष्काळ, नापिकी आणि कर्जबाजारीपणाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या विदर्भातील शेतकऱ्यांचे यंदा अतिवृष्टीने कंबरडे मोडल्याने तेथे पुन्हा आत्महत्यांचे सत्र सुरू होण्याची भीती निर्माण झाली आहे. परतीच्या पावसाने जिल्ह्यात हजारो हेक्टरवरची पिके वाहून गेली आहेत. डोक्यावर बँकांचे व सावकारांचे कर्ज, त्यात हे अस्मानी संकट यामुळे आधीच देशोधडीला लागलेला शेतकरी पुरता हतबल झाला आहे. दुसरीकडे सरकारी यंत्रणा निद्रिस्त असल्याचा आराेप केला आहे.

अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी मदत जाहीर केली नाही, केंद्रीय कृषिमंत्र्यांनी विदर्भात येऊन शेतकऱ्यांची दुःखं समजावून घेतली नाही. प्रत्यक्ष मदत मात्र अद्यापही जाहीर केली नाही. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा व तत्काळ नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे.

या आंदाेलनात पक्षाचे प्रदेश पदाधिकारी राजेंद्र पातोडे, डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, जि. प. अध्यक्ष प्रतिभा भोजने, अरुंधती शिरसाठ, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, प्रदीप वानखडे, प्रभा शिरसाट, राजकुमार दामोदर आदी सहभागी झाले हाेते.

टॅग्स :AkolaअकोलाVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीagitationआंदोलन