शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

गोपीकिशन बाजोरिया यांच्याकडे अकोट मतदारसंघाची जबाबदारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 01:40 IST

गेल्या काही दिवसांपासून अकोट मतदारसंघात आमदार गोपीकिशन  बाजोरिया यांच्या फेर्‍या वाढल्या असून, त्यांची पावले आता अकोट विधानसभा  मतदारसंघाकडे वळली असल्याची चर्चा राजकीय वतरुळात सुरू आहे. अशा तच आता त्यांच्याकडे अकोट विधानसभा मतदारसंघ बांधणीची जबाबदारी  शिवसेनेच्यावतीने दिली असल्याने या चर्चेला बळ मिळाले आहे. 

ठळक मुद्देभाजपच्या ताब्यातील मतदारसंघात मोर्चेबांधणी राजकीय वतरुळात चर्चा सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गेल्या काही दिवसांपासून अकोट मतदारसंघात आमदार गोपीकिशन  बाजोरिया यांच्या फेर्‍या वाढल्या असून, त्यांची पावले आता अकोट विधानसभा  मतदारसंघाकडे वळली असल्याची चर्चा राजकीय वतरुळात सुरू आहे. अशा तच आता त्यांच्याकडे अकोट विधानसभा मतदारसंघ बांधणीची जबाबदारी  शिवसेनेच्यावतीने दिली असल्याने या चर्चेला बळ मिळाले आहे. राज्यामध्ये सत्तेत असलेल्या भाजपा-शिवसेना या दोन पक्षातील शीतयुद्ध  कधीचेच संपले असून, हे दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात रणशिंग फुंकून  आगामी निवडणुकीची मार्चेबांधणी करीत आहेत. शिवसेनेने प्रत्येक विधानसभा  मतदारसंघनिहाय मोर्चेबांधणीसाठी जबाबदारी दिली असून, त्यामध्ये अकोट  विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी आमदार गोपिकिशन बाजोरिया यांच्याकडे  सोपविली आहे. अकोट हा मतदारसंघ सध्या भाजपाकडे आहे. येथून भाजपाचे  ज्येष्ठ आमदार प्रकाश भारसाकळे यांनी मागील निवडणुकीत शिवसेनेसह  विरोधकांचा पराभव करून, विजयाचा झेंडा रोवला होता. जिल्हय़ातील सर्वात  मोठी नगरपालिका असलेल्या अकोट या मतदारसंघात भाजपाचा वरचष्मा  आहे. यापूर्वी येथे सेनेचे संजय गावंडे हे आमदार होते. त्यांच्या पराभवानंतर  सेनेच्या वर्चस्वाला उतरती कळा लागली. त्यामुळे आता पुन्हा नव्या दमाने सेना उभारणीसाठी संपर्कप्रमुख खा. अरविंद  सावंत यांनी प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय मोर्चेबांधणीची जबाबदारी  निश्‍चित केली आहे. आ. बाजोरिया यांनी यापूर्वी अकोला पूर्व मतदारसंघातून निवडणूक लढविली  होती. त्यामध्ये त्यांना भाजपाकडून निसटता पराभव पत्कारावा लागला. मात्र,  विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून तिसर्‍यांदा विजयी होत,  त्यांनी पक्षातील आपले स्थान अधिक मजबूत केले आहे. गेल्या शुक्रवारीच अकोट नगर परिषदेच्या समस्यांबाबत प्रशासकीय  कामकाजाचा आढावा घेतला होता, तर अकोटकडे जाणार्‍या राज्य मार्गाच्या  दुरुस्तीसाठी अल्टिमेटम देऊन अकोट येथील जनतेच्या जिव्हाळय़ाच्या प्रश्नांना  हात घातला. तसेच अकोट शहरासाठी तयार केलेल्या विकास आराखड्यात  आवश्यक बदल करून, मुंबईत बैठक लावण्याचे आश्‍वासन आ. बाजोरिया  यांनी दिले. पुरवणी कर आकारणीमधील अपिलापासून वंचित राहिलेल्या  मालमत्ताधारकांना संधी देऊन त्यांचे आक्षेप निकाली काढण्याचे निर्देश मु ख्याधिकारी गीता ठाकरे यांना दिले. बाजोरिया यांचा अकोटमधील वाढता राब ता, सध्या राजकीय वतरुळात चर्चेचा विषय बनला आहे. अशातच आता  विधानसभा मोर्चेबांधणीची जबाबदारी त्यांच्यावर आल्याने पुढील विधानसभा  निवडणुकीची तयारी तर नव्हे ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

टॅग्स :Gopikishan Bajoriaगोपीकिशन बाजोरीयाakotअकोट