शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
2
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
3
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
4
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
5
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
6
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
7
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
8
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
9
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
10
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
11
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
12
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
13
दिंडोरीत 'आत्राम' पॅटर्न? अजित पवारांचं गोकूळ झिरवळांनी वाढवलं टेन्शन!
14
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
15
"ठोकलं अक्षय शिंदेला आणि एन्काऊंटर विरोधकांचा"; आशिष शेलारांचा सणसणीत टोला
16
“शरद पवारांनी सुपारी दिली अन् संजय राऊतांनी ठाकरे गटाचा एन्काउंटर केला”; शिंदे गटाची टीका
17
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य
18
अक्षय शिंदेचा पोलिसांकडून स्वसंरक्षणार्थ एन्काउंटर की ‘कुछ गडबड है’? CID तपास करणार
19
लैंगिक छळाच्या घटनांवर SC नाराज; केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश
20
Irani Cup 2024 : दोन मराठमोळे कर्णधार! १ तारखेपासून थरार; मुंबईला ऋतुराजचा संघ भिडणार

भूजल पातळी साडेपाच फुटांनी घटली

By admin | Published: June 16, 2016 2:20 AM

अकोला जिल्ह्याच्या भूजल पातळीत घट; भूजलाचा अतिरिक्त उपसा कारणीभूत.

अकोला: गत दोन-तीन वर्षांपासून होत असलेले अत्यल्प पर्जन्यमान, भूगर्भातील पाण्याचा अतिरिक्त उपसा तसेच जलपुनर्भरणाकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे जिल्ह्यातील भूजल पातळी गत पाच वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत ५.२८ फूट अर्थात १.६0 मीटरने घटली आहे. यावर्षीही पावसाने दगा दिला, तर जिल्ह्यातील नागरिकांना तीव्र जलसंकटाला तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे. भूजल पातळी तपासण्यासाठी तसेच या पातळीत वाढ व्हावी, याकरिता उपाययोजना करण्यासाठी राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यात भूजल सर्वेक्षण आणि विकास विभागाची निर्मिती केली आहे. या विभागातील भूवैज्ञानिक दर तीन महिन्यांनी भूजल पातळीचे अवलोकन करतात. यासाठी संपूर्ण जिल्ह्यात ८१ निरीक्षण विहिरी निश्‍चित करण्यात आल्या आहेत. गत मे महिन्यात या ८१ निरीक्षण विहिरींमधील जलपातळीचे अध्ययन करण्यात आले. गत पाच वर्षांंतील मे महिन्यातील सरासरीच्या तुलनेत यावर्षी भूजल पातळी ५.२८ फूट अर्थात १.६0 मीटरने घटल्याचे आढळून आले. तालुकानिहाय आकडेवारीवरून ही स्थिती अधिक स्पष्ट होते. अकोला तालुक्याची वर्ष २0११ ते २0१४ पर्यंतची सरासरी भूजल पातळी ९.९४ मीटर होती; परंतु वर्ष २0१६ मध्ये ती १0.८८ पर्यंंत खाली आली. याचा अर्थ भूजल पातळी १. १९ मीटरने घटली. आकोट तालुक्याची भूजल पातळी गत पाच वर्षांंच्या सरासरीच्या तुलनेत २.३३ मीटर, बाश्रीटाकळी तालुका २.२0 मीटर, बाळापूर 0.९६ मीटर, मूर्तिजापूर १.00 मीटर, पातूर १.६९ मीटर तसेच तेल्हारा तालुक्याची भूजल पातळी १.८१ मीटरने घटली आहे. जिल्ह्याची एकंदर भूजल पातळी सरासरी १.६0 मीटरने घटली आहे.