शहरं
Join us  
Trending Stories
1
संपादकीय: विधानसभेचा निकाल देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल, त्यांच्या बोलण्याचा अर्थ...
2
यूएनच्या सरचिटणिसांना इस्रायलमध्ये प्रवेशबंदी; इराणला योग्य वेळी प्रत्युत्तर देण्याची इस्रायलची धमकी
3
इराणच्या आण्विक स्थळांवर इस्त्रायली हल्ल्याला अमेरिका सरमर्थन देणार नाही, बायडेन यांनी केले स्पष्ट
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिक दृष्टिकोनांतून आजचा दिवस लाभदायी
5
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
6
हरयाणात भाजपची सत्ता जाते आहे, कारण..
7
नवरात्री: ‘माझ्यासाठी जे काही चांगले आहे, ते मला अवश्य मिळेल’
8
मविआतील लहान घटक पक्षांना हव्यात ४० जागा; प्रस्तावावर ७ आणि ८ ऑक्टोबरला पुन्हा चर्चा
9
अजित पवार गटाला हव्यात महायुतीतील ६५ ते ६८ जागा; अमित शाह यांच्याकडे आग्रही मागणी
10
मुलगी जर दिसायला चांगली असेल तर... अजित पवार समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांचे सभेत वादग्रस्त विधान
11
स्वस्त पेट्राेल-डिझेल आता विसरा; युद्धाचे ढग; कच्च्या तेलाचे दर वाढले
12
मुंबईकर सरफराझ खानचे ऐतिहासिक नाबाद द्विशतक
13
माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे निधन
14
नाेकऱ्या अन् पगारवाढही! पण, उत्पादन क्षेत्रातील वाढ नीचांकावर
15
मराठीला अभिजात दर्जासाठी अवघ्या 26 आमदारांनीच दाखविला रस
16
मानवरहित सौर ऊर्जा बोटीद्वारे कचरा संकलन; समुद्र होणार चकाचक
17
आहारामुळे विद्यार्थ्यांची आबाळ; शिक्षणमंत्री मध्यरात्री आले; झोपलेल्या मुलांना उठवून गेले
18
माणूस असो वा प्राणी, सत्तासंघर्ष अटळ, तो घडतच राहणार..
19
‘एमएमआरडीएचे अधिकारी संवेदनशील का नाहीत?’ आयुक्तांनी उपस्थित राहून स्पष्टीकरण द्यावे
20
देहविक्रयासाठी थायलंडच्या मुलीचा पाच हजारांत सौदा; ठाण्यात चौघांना अटक

आधी शहराचा विकास हवा; मगच हद्दवाढ करा!

By admin | Published: January 28, 2016 12:42 AM

‘लोकमत परिचर्चे’त उमटला सूर; ग्रामस्थांना सहन करावा लागेल कराचा भुर्दंड.

अकोला: महानगरपालिकेची प्रस्तावित हद्दवाढ करण्यात यावी; मात्र आधी शहराचा विकास करावा, मगच शहरानजीकच्या २१ गावांचा मनपा हद्दीत समावेश करावा, असा सूर ह्यलोकमतह्णच्यावतीने आयोजित परिचर्चेत सोमवारी उमटला.अकोला महानगरपालिकेच्या हद्दवाढीचा प्रस्ताव असून, यामध्ये शहरानजीकच्या २१ गावांचा समावेश प्रस्तावित आहे. शहरालगतच्या गावांमध्ये रस्ते, पाणी व इतर मूलभूत सुविधांसह गावांच्या विकासासाठी शहराची हद्दवाढ होणे आवश्यक आहे. हद्दवाढ झाल्याशिवाय शहरालगतच्या गावांचा विकास होणार नाही. त्यामुळे शहरानजीकच्या २१ गावांचा मनपा हद्दीत समावेश आवश्यक आहे. हद्दवाढ झाल्यास गावांचा विकास होणार असून, बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होईल, असा विचार यावेळी मांडण्यात आला. तथापि, महानगरपालिका अस्तिवात आल्यापासून शहराचाच पाहिजे तसा विकास झाला नाही. आधी शहराचा विकास करण्यात यावा; नंतर शहरानजीकच्या गावांचा मनपा हद्दीत समावेश करावा, अशी भूमिका परिचर्चेत सहभागी बहुतांश वक्त्यांनी मांडली. मनपाची हद्दवाढ झाल्यास शहरानजीकच्या गावांमधील ग्रामस्थांना नाहक कराचा भुर्दंंड सहन करावा लागेल. ग्रामीण भागात विकासाच्या योजना राबविण्यात येत असून, हद्दवाढ झाल्यानंतर मनपा क्षेत्रात २१ गावे समाविष्ट केल्यास या गावांचा विकास होणार की नाही, याबाबत खात्री नाही. शहराचा विकास नाही, तर हद्दवाढ करून गावांचा समावेश कसा होईल.धी शहराचा विकास करण्यात यावा, नंतर शहराची हद्दवाढ करण्यात यावी, असा विचार मांडण्यात आला.