शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

१५ कोटी रुपये निधीच्या शासन आदेशाला उच्च न्यायालयाची स्थगिती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 11:06 IST

Akola News खंडपीठाने शासनाच्या आदेशाला स्थगिती देत, २६ डिसेंबरपर्यंत शासनाने उत्तर सादर करण्यास बजावले.

ठळक मुद्देआमदार शर्मा यांनी दाखल केली होती याचिकाशासनाने काढला तडकाफडकी आदेश

अकोला: तत्कालीन मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजपा सरकारने अकोला शहराच्या विकासासाठी आमदार गोवर्धन शर्मा यांच्या मागणीनुसार १५ कोटी रुपयाचा विशेष निधी दिला. त्यांनी सुचविलेल्या कामांना मान्यता दिल्यानंतर निविदा प्रक्रिया सुरू झाली असताना, सत्तांतर झाल्याने महाविकास आघाडी सरकारने १६ जुलै रोजी तडकाफडकी नवीन शासन आदेश काढून नवीन कामे संदर्भात शासन आदेश काढला. या निर्णयाच्या विरोधात आमदार शर्मा यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. या याचिकेवर सुनावणी करताना, उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश दिपांकर दत्ता आणि रवी. के. देशपांडे यांच्या खंडपीठाने मुख्य न्यायाधीश दिपांकर दत्ता आणि रवी. के. देशपांडे यांच्या खंडपीठाने शासनाच्या आदेशाला स्थगिती देत, २६ डिसेंबरपर्यंत शासनाने उत्तर सादर करण्यास बजावले.

आमदार गोवर्धन शर्मा यांनी तत्कालिन भाजप शासनाकडून अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघासाठी १५ कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर करून घेतला होता; परंतु महाराष्ट्रात सत्तांतर होऊन १६ जुलै २०२० रोजी शासनाने नवीन आदेश काढले. त्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव आणला. या विरोधात आमदार शर्मा यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. राज्य शासनाला जबाब दाखल करण्याकरिता ६ वेळा संधी दिल्यावरसुद्धा उत्तर दाखल न केल्यामुळे आमदार शर्मा यांच्यातर्फे ॲड. तुषार मंडलेकर व ॲड. भानुदास कुलकर्णी यांनी न्यायालयात युक्तिवाद करून शासन बदलल्यानंतर व्यक्ती व पक्षाचा विचार करून धोरणात्मक निर्णयात बदल करता येत नाही. या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेत बाजू मांडली. नवीन शासन सत्तारूढ होण्यापूर्वी याची प्रक्रिया पूर्ण झाली असताना जो बदल केला, त्या १६ जुलै २०२० च्या शासन निर्णयाच्या अंतिम निर्णय होईपर्यंत स्थगिती द्यावी, असा आग्रह केला. उच्च न्यायालयाने ही बाब मान्य करीत, २६ डिसेंबर २०२० पर्यंत शासनाने कोर्टात उत्तर सादर करण्याचे आदेश दिले, तसेच सहा वेळा अवधी दिल्यानंतरसुद्धा राज्य शासनाने उत्तर दाखल न केल्याबद्दलसुद्धा न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. सरकारतर्फे सरकारी वकील आनंद देशपांडे यांनी न्यायालयात युक्तिवाद केला.

जनतेच्या बाजूने निकाल लागला!

उच्च न्यायालयाने जनतेच्या बाजूने निर्णय दिला आहे. शासनाने दिलेला आदेश न्यायालयाने चुकीचा ठरविला. यामुळे शहर विकासाला गती मिळणार आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Govardhan Sharmaगोवर्धन शर्माAkolaअकोला