शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

६८ गाव पाणीपुरवठा योजना मंजूर कशी? मूळ कागदपत्रे न्यायालयात सादर करा

By राजेश शेगोकार | Published: February 28, 2023 6:52 PM

शासनाला नाेटीस : उच्च न्यायालय तपासणार निर्णय प्रक्रिया

राजेश शेगाेकार

अकोला : बाळापूर मतदारसंघातील ६९ गाव पाणीपुरवठा योजनेला मान्यता दिल्याविरुद्ध तेल्हारा तालुक्यातील शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली असून, त्याची साेमवार २७ फेब्रुवारी राेजी सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने कवठा बॅरेजमध्ये पानी उपलब्ध असल्याचा प्रस्ताव असताना आणि कवठा हे गाव सदर ६८ गाव पाणीपुरवठा योजनेत समाविष्ट असतानाही सदर गावांना ३० किलो मीटरपेक्षा दूर असलेल्या वान धरणावरून याेजना कशी मंजूर झाली, याबाबत प्रश्न उपस्थित करून शासनाला या याेजनेच्या अनुषंगाने सर्व कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

वान प्रकल्प हा पूर्णतः सिंचनासाठी उभारलेला असताना अकोट, जळगाव जामोद, तेल्हारा, शेगाव या शहरांना, तसेच वेगवेगळ्या पाणीपुरवठा योजनेद्वारे पिण्याचे पाण्याचे आरक्षण दिले. त्यामुळे १८ हजार हेक्टर सिंचन क्षमता कमी होऊन ४ हजार हेक्टर एवढी कमी झाली, अकोला शहर अमृत पाणीपुरवठा योजना तूर्तास स्थगित आहे. तरीही नव्याने बाळापूर मतदारसंघातील ६९ गाव पाणीपुरवठा योजनेला जलसंपदा विभागाने ३.३५ दलघमी पाण्याची मान्यता दिली. या याेजनेत बाळापूर मतदारसंघातील ६८ गावांचा पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव बाळापूर तालुक्यातील कवठा बॅरेजवरून संपूर्ण तपासणी करून यंत्रणेद्वारा मंजुरीकरिता पाठविला असता तो पुढे पाठविण्यात आला नाही. मात्र आर्थिकदृष्टीने खर्चाचे असताना ६८ गावांसाठीची योजना तेल्हारा तालुक्यातील वान प्रकल्पावरून मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे  शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे.शेतकऱ्यांच्या बाजूने वरिष्ठ वकील ॲड. मुकेश समर्थ आणि ॲड. प्रदीप क्षीरसागर काम पहात आहे

टॅग्स :AkolaअकोलाWaterपाणी