शहरं
Join us  
Trending Stories
1
१३ ऑक्टोबरनंतर महाराष्ट्रात आचारसंहिता?; निवडणूक कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता
2
"भोले बाबांना सरकारचं संरक्षण"; आरोपपत्रात नाव नसल्याने मायावती संतापल्या, म्हणाल्या...
3
Gold Silver Price 3 October: नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; पाहा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे दर
4
भारतामुळे आज इस्त्रायलकडे आहे 'हे' मोठे शहर; ज्यानं अर्थव्यवस्थेला मिळते चालना
5
Yusuf Pathan, LLC Video: दे घुमा के!! युसुफ पठाणने लगावले एकाच ओव्हरमध्ये ३ षटकार, चेंडू थेट मैदानाबाहेर!
6
मुख्यमंत्रि‍पदाच्या उमेदवारीवर मनोज जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, "प्रत्येकाची भावना..."
7
Oral cancer चे निदान टूथब्रशद्वारे लागणार, IIT Kanpur मध्ये बनवलेले डिव्हाईस लवकरच बाजारात येणार!
8
नवरात्र: इच्छा असूनही दुर्गा सप्तशती म्हणणे शक्य नाही? ‘असे’ पठण करा; संपूर्ण पुण्य मिळवा
9
आता लाडक्या बहिणींच्या खात्यात केव्हा जमा होणार ऑक्टोबर-नोव्हेंबरचे पैसे? फडणवीस म्हणाले- काळजी करू नका, परत...
10
नवरात्र: ५ मिनिटांत होणारे ‘हे’ स्तोत्र म्हणा; संपूर्ण दुर्गा सप्तशती पठणाचे पुण्य मिळवा
11
Mumbai Metro 3 Ticket Rates: मेट्रो-३ चे तिकीटाचे दर काय? कुठून कुठवर सेवा? कसा होणार फायदा? जाणून घ्या सारंकाही...
12
"सावरकर गोमांस खायचे, त्यांनी कधीही..."; कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांचं वादग्रस्त विधान
13
Bigg Boss Marathi 5 : रितेश देशमुखचे 'भाऊच्या धक्क्या'वर कमबॅक, ग्रँड फिनाले रंगणार ६ ऑक्टोबरला
14
Navratri Special: नीना कुळकर्णींची लेक सोहादेखील आहे सिनेइंडस्ट्रीत कार्यरत, अभिनयात नाही पण...
15
"संजय अंकल अश्लील कृत्य करतात"; पुण्यात व्हॅन चालकाचा चिमुकल्यांसोबत घृणास्पद प्रकार
16
सद्गुरूंच्या ईशा फाऊंडेशनला मोठा दिलासा, उच्च न्यायालयाच्या आदेशाला SC ची स्थगिती; नेमकं प्रकरण काय?
17
नवरात्र: अखंड दिवा अत्यंत शुभ, ‘या’ दिशेला लावा, अकाल मृत्यू टाळा; वाचा, अखंड ज्योत महत्त्व
18
सावधान! जास्त टोमॅटो खाल्ल्याने वाढते सांधेदुखी, चालणं होतं अवघड; 'या' समस्यांचा धोका
19
मारुतीची गाडी घेतली असेल तर सतर्क रहा; हा सोन्याएवढा मौल्यवान पार्ट चोरांच्या रडारवर
20
Navratri 2024: प्रतापगडावर दोन घट बसविण्याची परंपरा असलेले राज्यातील एकमेव मंदिर!

अमरावती विभागातील शेकडो लघुप्रकल्प कोरडे!

By admin | Published: January 27, 2016 11:24 PM

भीषण पाणीटंचाईचे संकेत; प्रशासनाचा कृती आराखडा कागदावरच.

सुनील काकडे/वाशिम: गतवर्षीच्या पावसाळ्यात संपूर्ण विदर्भात अल्प प्रमाणात पाऊस झाला. परिणामी मोठे, मध्यम आणि लघू प्रकल्पांच्या पाणीपातळीत अपेक्षित वाढ झाली नाही. अशातच रब्बी हंगामातील पिकांसाठी झालेला उपसा आणि जमिनीची होणारी धूप या कारणांमुळे सद्यस्थितीत अमरावती विभागातील ४२८ लघुसिंचन प्रकल्पांपैकी सुमारे २५0 प्रकल्प कोरडे पडले आहेत. मोठय़ा आणि मध्यम प्रकल्पांची पाणी पातळीदेखील झपाट्याने खालावत असल्याने यंदाच्या उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई जाणवणार आहे. सद्यस्थितीत अमरावती विभागातील अमरावती, यवतमाळ, बुलडाणा, अकोला आणि वाशिम या पाच जिल्ह्यांमधील ४२८ लघुप्रकल्पांमध्ये केवळ २0 ते २२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. वाशिम जिल्ह्यातील १0७ पैकी तब्बल ६0 प्रकल्प कोरडे पडले असून, उर्वरित चार जिल्ह्यांमध्येही भयावह स्थिती उद्भवली आहे. हातपंप, कूपनलिका, विहिरी हे जलस्रोतदेखील कोरडे पडल्याने जनमानसासोबतच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही भेडसावत आहे. तथापि, जिल्हा प्रशासनाने कोट्यवधी रुपयांचा संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा कागदोपत्री तयार करण्यापलीकडे कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. वाशिम जिल्ह्यात साडेपाच कोटींपेक्षा अधिक रकमेचा कृती आराखडा तयार आहे; पण ७९३ पैकी ५६0 गावे टंचाईग्रस्त असताना एकाही गावात अद्याप साधे टँकरदेखील सुरू झाले नसल्याची वस्तुस्थिती आहे. जलयुक्त शिवारचा फुगा हवेतच विरला!मोठा गाजावाजा करून महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये जलयुक्त शिवार अभियान राबविले. या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात कोट्यवधी लिटर पाण्याची साठवण झाल्याचा आव प्रशासकीय पातळीवरून आणण्यात आला; मात्र सध्या उद्भवलेल्या भीषण पाणीटंचाईने राज्य शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत.

अख्खा मराठवाडा तहानला!महाराष्ट्रातील इतर विभागांच्या तुलनेत यंदा मराठवाड्याला भीषण पाणीटंचाईचे चटके जास्त सोसावे लागत आहेत. मराठवाड्यातील ७२८ लघुप्रकल्पांमध्ये आजमितीस उणापुरा दोन ते अडीच टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. ५00 पेक्षा जास्त प्रकल्प कोरडेठण्ण पडल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मोठय़ा प्रकल्पांपैकी बीड जिल्ह्यातील माजलगाव, मांजरा, उस्मानाबादमधील निम्न तेरणा, सिना कोळेगाव आणि नांदेड जिल्ह्यातील मनार या पाच प्रकल्पांची पाणीपातळी शून्यावर पोहोचली असून, जायकवाडी, पूर्णा येलदरी, पूर्णा सिद्धेश्‍वर, ऊध्र्व पैनगंगा, विष्णुपुरी, निम्न दुधना हे मोठे प्रकल्प अल्पावधीतच कोरडे पडतील, अशी भीती वर्तविली जात आहे.