शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
2
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
3
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
4
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
5
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
6
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
7
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
8
दिंडोरीत 'आत्राम' पॅटर्न? अजित पवारांचं गोकूळ झिरवळांनी वाढवलं टेन्शन!
9
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
10
"ठोकलं अक्षय शिंदेला आणि एन्काऊंटर विरोधकांचा"; आशिष शेलारांचा सणसणीत टोला
11
“शरद पवारांनी सुपारी दिली अन् संजय राऊतांनी ठाकरे गटाचा एन्काउंटर केला”; शिंदे गटाची टीका
12
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य
13
अक्षय शिंदेचा पोलिसांकडून स्वसंरक्षणार्थ एन्काउंटर की ‘कुछ गडबड है’? CID तपास करणार
14
लैंगिक छळाच्या घटनांवर SC नाराज; केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश
15
वांद्रे पश्चिम मतदारसंघातून विधानसभेसाठी प्रिया दत्त? आशिष शेलारांविरोधात काँग्रेसची नवी खेळी
16
Irani Cup 2024 : दोन मराठमोळे कर्णधार! १ तारखेपासून थरार; मुंबईला ऋतुराजचा संघ भिडणार
17
"आधी म्हणत होते अक्षय शिंदेला फाशी द्या, आता...", अजित पवार 'मविआ'वर बरसले
18
Amazon Great Indian Festival Sale मध्ये 15 हजारांपेक्षा कमी किमतीत मिळतील 'हे' स्मार्टफोन
19
Exclusive: 'निक्कीला छत्रपती संभाजीनगरला घेऊन जाणार'; अरबाज म्हणतो, 'दोघांचंही बालपण...'
20
बदलापूरसारखीच घटना; मुख्याध्यापकाने सहा वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; अत्याचाराला विरोध केला म्हणून...

शेकडो हेक्टर सोयाबीन उगवले नाही; शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट!

By रवी दामोदर | Published: July 19, 2023 1:55 PM

या वर्षी पाऊस लांबल्याने खरीप हंगामातील पेरण्यांना उशिरा सुरुवात झाली.

अकोला : जिल्ह्यात पेरणी सुरू असतानाच बियाणे उगविले नसल्याचे संकट शेतकऱ्यांपुढे उभे राहिले आहे. जिल्ह्यातील शेकडो हेक्टरवरील सोयाबीन बियाणे उगवले नसल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. सातही तालुक्यांतून बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारींचा ओघ वाढत असून, दि.१८ जुलैपर्यंत जिल्हा परिषद कृषी विभागाकडे शेतकऱ्यांच्या ५० लेखी तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी त्वरित भरपाई देण्याची मागणी तक्रारीतून केली आहे. यात सर्वाधिक तक्रारी ‘महाबीज’च्या बियाण्यांसंदर्भात असल्याचे समजते.

या वर्षी पाऊस लांबल्याने खरीप हंगामातील पेरण्यांना उशिरा सुरुवात झाली. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून सार्वत्रिक पाऊस झाल्याने पेरण्यांना वेग आला. आता खरिपाची पेरणीदेखील अंतिम टप्प्यावर असून, सोयाबीन पेरणीने सरासरीचा टक्का ओलांडला आहे. अशातच सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. यंदा काही शेतकऱ्यांनी महाबीज व अन्य कंपन्यांचे बियाणे खरेदी करून पेरणी केली. 

यामध्ये महाबीजच्या बियाण्यांची उगवण क्षमता दोन टक्क्यांपेक्षा कमी आढळल्याचे कृषी व पीकेव्हीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पंचनाम्यातून दिसून आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेऊन संबंधित शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

तालुकानिहाय तक्रारीपातूर - १९अकोला - ४तेल्हारा - ४बाळापूर - ६बार्शीटाकळी - १०मूर्तिजापूर -  ४अकोट - ३

सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार कृषी विभाग, पीकेव्हीचे अधिकारी यांचे पथक सदर प्लॉटचे पंचनामे करीत आहेत. उगवणक्षमता कमी आढळल्यास त्याच बियाण्यांचे आणखी प्लॉट तपासल्या जातात. बियाणे उगविले नसल्यास शेतकऱ्यांनी स्थानिक स्तरावर कृषी सहायक, तालुका कृषी अधिकारी किंवा तक्रार निवारण कक्षात भेट द्यावी.महेंद्र सालके, कृषी विकास अधिकारी, जि.प., अकोला

टॅग्स :Akolaअकोला