शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

शिधापत्रिका नसलेल्या गरीब कुटुंबांवर उपासमारीचे संकट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 17:20 IST

लॉकडाउनमध्ये हाताला काम नसल्याने पोटाची खळगी भरणार तरी कशी, असा प्रश्न गरीब मजूर कुटुंबांसमोर निर्माण झाला आहे.

- संतोष येलकर

अकोला : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लागू करण्यात आलेल्या ‘लॉकडाउन’ मध्ये शिधापत्रिकाधारकांना रास्त भाव दुकानांमधून धान्य वितरित करण्यात येत असले तरी, शिधापत्रिका नसलेल्या अनेक गरीब कुटुंबांना रास्त भावाच्या धान्यापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे हातावर पोट असलेल्या आणि शिधापत्रिका नसलेल्या गरीब मजूर कुटुंबांसमोर उपासमारीचे संकट निर्माण झाले आहे. लॉकडाउनमध्ये हाताला काम नसल्याने पोटाची खळगी भरणार तरी कशी, असा प्रश्न गरीब मजूर कुटुंबांसमोर निर्माण झाला आहे.लॉकडाउनच्या कालावधीत नागरिकांनी घराबाहेर पडू नये तसेच कोणताही व्यक्ती अन्नधान्यापासून वंचित राहू नये, यासाठी शासनामार्फत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत प्राधान्य गटातील शिधापत्रिकाधारक आणि अंत्योदय योजनेअंतर्गत शिधापत्रिकाधारक लाभार्थींना सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत दरमहा वितरित करण्यात येत असलेल्या धान्यासह एप्रिल, मे व जून या तीन महिन्यांच्या कालावधीत दरमहा प्रत्येक लाभार्थीला ५ किलोप्रमाणे मोफत तांदूळ वितरित करण्यात येत आहे. यासोबतच केशरी शिधापत्रिकाधारक ( एपीएल) लाभार्थींनादेखील मे व जून या दोन महिन्यांच्या कालावधीत सवलतीच्या दरात धान्य वितरित करण्यात येणार आहे; परंतु अनेक गरीब मजूर कुटुंबांकडे शिधापत्रिका नाहीत. लॉकडाउनच्या परिस्थितीत हाताला काम नाही आणि शिधापत्रिका नसल्याने रास्त भाव दुकानांमधून धान्य मिळत नाही. त्यामुळे हातावर पोट असलेल्या गरीब कुटुंबांसमोर उपासमारीचे संकट निर्माण झाले आहे. त्यानुषंगाने लॉकडाउनच्या कालावधीत पोटाची खळगी भरणार कशी, याबाबतची चिंता गरीब मजूर कुटुंबांना सतावत आहे.जिल्ह्यातील ज्या गरीब, मजूर कुटुंबांकडे शिधापत्रिका नाही अशा कुटुंबांची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. शिधापत्रिका नसलेल्या कुटुंबांना शिधापत्रिका उपलब्ध करून पात्र लाभार्थी कुटुंबांना धान्य वितरित करण्यात येणार आहे.- बी. यू. काळेजिल्हा पुरवठा अधिकारी 

 

 

टॅग्स :Akolaअकोला