शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
4
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
5
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
6
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
7
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
8
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
9
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
10
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
11
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
12
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
13
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
14
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
15
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
16
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
17
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
18
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
19
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
20
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

रेल्वेने परराज्यात जाताय, तर आधी कोरोना टेस्ट करून घ्या!

By atul.jaiswal | Updated: July 7, 2021 10:49 IST

Corona Test Mandatory for Railway Journey : कर्नाटक, गोवा, पश्चिम बंगाल, ओरिसा, राजस्थान या राज्यांनी महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांसाठी कोरोना चाचणी बंधनकारक केली आहे.

ठळक मुद्देप्रवासात निगेटिव्ह अहवाल बाळगणे अनिवार्य कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालनही आवश्यक

अकोला : राज्यात अजूनही कोरोना रुग्ण आढळून येत असल्याने, शेजारच्या अनेक राज्यांनी महाराष्ट्रातून रेल्वेद्वारे येणाऱ्या प्रवाशांना कोरोना चाचणी बंधनकारक केली आहे. रेल्वेद्वारे परराज्यात जाण्याचा बेत आखणाऱ्यांनी ७२ तास आधी केलेल्या आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल बाळगणे अनिवार्य आहे.

कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असली, तरी रेल्वेची प्रवासी वाहतूक अजूनही पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाही. प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष रेल्वेगाड्या सुरू करण्यात आल्या असून, या गाड्यांमध्ये केवळ आरक्षित तिकिटांवरच प्रवास करता येतो. या गाड्यांमध्ये प्रवास करताना कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन आवश्यक आहे. आता कर्नाटक, गोवा, पश्चिम बंगाल, ओरिसा, राजस्थान या राज्यांनी महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांसाठी कोरोना चाचणी बंधनकारक केली आहे. कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून ही एक उपाययोजना आहे.

 

कोरोना टेस्ट, लसीकरण प्रमाणपत्र आवश्यक

प्रवाशांसाठी किमान ७२ तास आधी केलेल्या आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल अनिवार्य आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचा एक डोस घेतलेल्या प्रवाशांनाही मुभा राहणार आहे. अशा प्रवाशांना लस घेतल्याचे प्रमाणपत्र सोबत बाळगावे लागणार आहे.

सद्या अकोल्याहून धावत आहेत या गाड्या

अमरावती - मुंबई

लो.टी.ट. - हटीया

पोरबंदर - हावडा

हावडा - अहमदाबाद

नागपूर - कोल्हापूर

मुंबई - हावडा

 

पॅसेंजर गाड्यांची प्रतीक्षाच

कोरोना काळात सद्या केवळ विशेष गाड्या सुरू असून, या गाड्यांमध्ये आरक्षित तिकिटावरच प्रवास करता येतो. या गाड्यांचे तिकीट महाग असल्याने, सामान्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे पॅसेंजर गाड्या सुरू व्हाव्या, अशी अपेक्षा सामान्य नागरिकांकडून व्यक्त होत आहे. कोरोनाची लाट ओसरल्यानंतर पॅसेंजर गाड्या सुरू करणार असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले होते. तथापि, अद्याप अकोलामार्गे एकही पॅसेंजर गाडी सुरू झालेली नाही.

मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांचे आरक्षण मिळेना

मध्य रेल्वेच्या मुख्य लोहमार्गावर असलेल्या अकोला येथून मुंबई व हावडाकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये मोठी गर्दी असते. विशेषत: अकोल्याहून मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये आरक्षण मिळणे कठीण झाले आहे. याशिवाय पुण्याकडे जाणाऱ्या गाड्यांमध्येही आरक्षण वेटिंगवरच असल्याचे चित्र आहे.

 

या गाड्या कधी सुरू होणार ?

भुसावळ - नरखेड पॅसेंजर

भुसावळ - वर्धा पॅसेंजर

अकोला - पूर्णा पॅसेंजर

अकोला - परळी पॅसेंजर

टॅग्स :Akola Railway Stationअकोला रेल्वे स्थानकIndian Railwayभारतीय रेल्वे