शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

इच्छुक; आशा-निराशेच्या हिंदोळ्य़ावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2016 3:15 AM

अकोला महानगरपालिकेत राजकीय समीकरणांची चाचपणी सुरू.

अकोला, दि. 0७- महापालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत काढण्यात आली असता, विद्यमान नगरसेवक, राजकीय पक्षांचे महानगराध्यक्ष व इच्छुकांच्या गर्दीमुळे प्रमिलाताई ओक सभागृह गर्दीने खच्चून भरले होते. मनपा प्रशासनाने नियोजनबद्धरीत्या अवघ्या तासाभराच्या आत आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण केली. निवडणूक कोणतीही असो, राजकीय पक्ष व त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी जणू पर्वणीच ठरलेली असते. पक्षाच्या सतरंज्या झटकण्यात आयुष्य खर्ची करणार्‍या कार्यकर्त्यांना पक्षाकडून तिकीट मिळेल, अशी अपेक्षा असते.फेब्रुवारी २0१७ मध्ये महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक होईल. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार शुक्रवारी (७ ऑक्टोबर) मनपा प्रशासनाने प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत काढली. स्थानिक प्रमिलाताई ओक सभागृहात आरक्षण काढल्या जाणार असल्याने सकाळपासूनच विद्यमान नगरसेवक, राजकीय पक्षांचे महानगराध्यक्ष तसेच इच्छुक उमेदवारांनी चांगलीच गर्दी केल्याचे चित्र पहावयास मिळाले. सभागृहात मनपा आयुक्त अजय लहाने, उपायुक्त सुरेश सोळसे, उपायुक्त समाधान सोळंके, सहायक आयुक्त डॉ. दीपाली भोसले, जितकुमार शेजव व निवडणूक विभागाच्या कर्मचार्‍यांनी आरक्षण सोडतची प्रक्रिया पूर्ण केली. यंदाची निवडणूक प्रथमच बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार होणार आहे. हद्दवाढीमुळे मनपा क्षेत्रात समाविष्ट झालेल्या भागाची हद्दवाढ व लोकसंख्येचे निकष लक्षात घेऊन प्रभागाची पुनर्रचना करण्यात आली. यामध्ये २0 प्रभाग निश्‍चित करण्यात आले असून, प्रत्येक प्रभागात चार याप्रमाणे ८0 नगरसेवक निवडून येतील. ८0 जागांसाठी शुक्रवारी आरक्षणाची सोडत काढण्यात आली. महिलांसाठी ५0 टक्के आरक्षणानुसार ४0 जागांवर महिलांचे जातीनिहाय प्रवर्गानुसार आरक्षण निश्‍चित करण्यात आले. आरक्षणामुळे अनेकांच्या राजकीय समीकरणात उलथापालथ झाली असून, विद्यमान नगरसेवकांसह इच्छुकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. मनपाने केले नकाशे प्रसिद्धहद्दवाढीमुळे शहरालगतच्या २४ गावांचा मनपा क्षेत्रात समावेश झाला. प्रभागाच्या कार्यक्षेत्रात वाढ झाल्याने प्रभाग पुनर्रचनेबद्दल अकोलेकरांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. मनपा प्रशासनाने आरक्षणाची सोडत काढल्यानंतर सभागृहाच्या बाहेर भिंतीवर प्रभाग पुनर्रचेनेचे नकाशे प्रसिद्ध केले. नकाशांमध्ये त्या-त्या भागाचा नावानिशी उल्लेख असल्याने डोकेदुखी कमी झाल्याचा सूर यावेळी उमटला.शहराची लोकसंख्या पाच लाखांच्या वर हद्दवाढीपूर्वी अकोला शहराची लोकसंख्या २0११ च्या जनगणनेनुसार ४ लाख २५ हजार ८१७ होती. शहरालगतच्या २४ गावांचा मनपात समावेश झाला असून, संबंधित भागाची लोकसंख्या १ लाख ११ हजार ३४0 च्या आसपास आहे. त्यामुळे आता संपूर्ण शहराची लोकसंख्या ५ लाख ३६ हजारांच्या घरात गेली असून, ८0 नगरसेवक महापालिकेत अकोलेकरांचे प्रतिनिधित्व करतील.युती,आघाडीसाठी मनधरणी!मनपा क्षेत्राची हद्दवाढ झाल्यामुळे प्रभागांच्या क्षेत्रफळात कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे निवडणुकीत मतदारांसमोर जाताना उमेदवारांची चांगलीच दमछाक होणार हे निश्‍चित आहे. अशास्थितीत सर्वच राजकीय पक्षातील कार्यकर्ते युती किंवा आघाडी व्हावी, यासाठी पक्षाची मनधरणी करीत असल्याची माहिती आहे.