शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
2
मुंबईत उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का; २ नेते पक्ष सोडणार, अपक्ष लढण्याची तयारी
3
मुंबईतल्या ३ जागांवर ठाकरे गटाचे उमेदवार जाहीर; मुस्लीम चेहरा उतरवला रिंगणात
4
शरद पवार गटाच्या २२ उमेदवारांची यादी जाहीर; बीडमधून संदीप क्षीरसागरांना पुन्हा संधी
5
भयंकर! "सर, आमचा जीव वाचवा..."; गुंडांच्या भीतीने शिक्षकांनी अधिकाऱ्यांसमोर जोडले हात
6
IND vs NZ : "...म्हणूनच आमचा पराभव झाला, मी दुखावलोय", कर्णधार रोहित शर्माची प्रामाणिक कबुली
7
दिग्गजांना आस्मान दाखवण्यासाठी पवारांचा डाव: बीडमध्ये पुन्हा क्षीरसागरच; भुजबळ, झिरवळांविरोधात कोणाला संधी?
8
IND vs NZ : शिकाऱ्यांची शिकार झाली! आपल्याच घरात भारताचा दारुण पराभव; टीम इंडिया कुठे चुकली?
9
टीम इंडियाला घरच्या मैदानात धोबीपछाड; न्यूझीलंडनं पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकत रचला इतिहास
10
एका महिन्यात 30 लाख नवीन ग्राहक! BSNL ची कमाल;  Airtel, Vodafone आणि Jio ची  अवस्था वाईट!
11
न्यूझीलंड विरुद्ध सलग दोन पराभव; WTC फायनल गाठण्यासाठी टीम इंडियासमोर मोठं चॅलेंज
12
अखेर Andheri East Assembly चा महायुतीचा उमेदवार ठरला; भाजपचा नेता शिंदेंच्या सेनेतून लढणार
13
'दरवेळी ऑफर देतात'; बाळासाहेब थोरात-संजय राऊतांबद्दल देशमुखांचा गौप्यस्फोट
14
कडक सॅल्यूट! हातावरच्या रेषा नशीब ठरवत नाहीत...; डिलिव्हरी बॉयचा डोळे पाणावणारा Video
15
ऐन निवडणुकीत महाराष्ट्रात नवीन राजकीय पक्षाचा उदय; २८८ जागा लढवणार, काय आहे नाव?
16
'या' भाषा भारतात सर्वाधिक बोलल्या जातात; तुम्हाला माहितीये का?
17
मी ध्यानचंद खेल रत्न पुरस्कारासाठी पात्र आहे का? मनूची पोस्ट; चाहत्यांनी उडवली खिल्ली मग...
18
जयश्री थोरातांवरील आक्षेपार्ह वक्तव्यावर बाळासाहेब थोरातांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सुजय विखेंचे ढोंग...
19
छत्रपती संभाजीराजेंचा मनोज जरांगेंकडे युतीचा प्रस्ताव; अपक्ष उमेदवारीचे सांगितले तोटे
20
"पप्पांनी आयुष्यभराची कमाई माझ्या लग्नावर खर्च केली, अजूनही फेडताहेत कर्ज"

‘जलयुक्त’ने शिवार झाले ‘जलमय’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 12:42 PM

बुलडाणा : राज्यात २०१५-१६ पासून जलयुक्त शिवार योजना राबविण्यात येत असून जिल्ह्यातील एक हजार ७३ गावांमध्ये जलयुक्तची कामे करण्यात आली आहेत.

-ब्रम्हानंद जाधव

बुलडाणा : राज्यात २०१५-१६ पासून जलयुक्त शिवार योजना राबविण्यात येत असून जिल्ह्यातील एक हजार ७३ गावांमध्ये जलयुक्तची कामे करण्यात आली आहेत. त्यासाठी २९४.७ कोटी रुपयांपर्यंत खर्च करण्यात आला आहे. जलयुक्तच्या या कामामुळे ९२ हजार ९४७ टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला. अनेक ठिकाणी यावर्षी पाणी साठवण्यास मोठी मदत झाली असून जलयुक्तने शिवारही ‘जलमय’ झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.पाण्याचा प्रत्येक थेंब वाचला!बिबी शिवारामध्ये जलयुक्तची मोठ्या प्रमाणावर कामे झाली आहेत. बिबीमध्ये १३ सिमेट नाला बंधारा आहेत. यामुळे ७० ते ८० टीसीएम पाणीसाठा येथे झाला आहे. यावर्षी पाहिला पाणी आला ते पूर्ण येथे पाणी अडवल्याने ते जमीनीत जिरले. त्यामुळे आता पाणीसाठा येथे दिसून येतो. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’चा यशस्वी प्रयोग येथे बघावयास मिळतो. पाण्याचा एक थेंबही येथे वाया गेला नसून, सर्व पाणी अडवल्या गेले आहे.

लोणार तालुक्यातील बिबी, देवानगर या भागात जलयुक्तच्या कामामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याची पातळी वाढली आहे. विहिरीही तुडूंब भरल्या आहेत. बिबीमध्ये ८० टीसीएमपर्यंत पाणीसाठा निर्माण झाला आहे. त्यामुळे २०० ते २५० हेक्टर पाणी हे संरक्षीत म्हणून वापरता येणार आहे. मध्यंतरी पाऊस लांबल्याने कपाशीसारखे पिके संकटात सापडली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी बंधाºयावर मोटारी टाकून २० ते २५ हेक्टरवरील कपाशी जगवली आहे. देवागनरमध्ये हा मोठा फायदा जलयुक्तच्या कामामुळे झाला आहे.- राजू शिरसाट, कृषी सहाय्यक लोणार.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाJalyukt Shivarजलयुक्त शिवार