शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

जिल्ह्यातील खरीप पेरणी आटोपण्याच्या मार्गावर!

By संतोष येलकर | Published: July 13, 2024 6:15 PM

पावसानंतर गती : ३.७१ लाख हेक्टरवरील पेरणी आटोपली

संतोष येलकर, अकोला : गेल्या आठवड्यात दोन दिवस बरसलेल्या जोरदार पावसानंतर जिल्ह्यात खोळंबलेल्या खरीप पेरणीला गती आल्याने, शुक्रवार १२ जुलैपर्यंत ३ लाख ७० हजार ८५३ हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पेरणी आटोपली. उर्वरित ७२ हजार हेक्टरवरील पेरणी एक ते दोन दिवसांत पूर्ण होणार आहे. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामातील पेरणी जिल्ह्यात आटोपण्याच्या मार्गावर असल्याचे वास्तव आहे. जिल्ह्यात खरीप पेरणीचे एकूण सरासरी क्षेत्र ४ लाख ४३ हजार हेक्टर इतके आहे. यंदाच्या पावसाळ्यात प्रारंभी अधून मधून बरसलेल्या पावसात गेल्या आठवड्यापर्यंत जवळपास ६० ते ६५ टक्के पेरणी आटोपली होती. पेरणीलायक सार्वत्रिक जोरदार पावसाअभावी जिल्ह्यातील उर्वरित पेरणी खोळंबली होती. गेल्या आठवड्यात ६ ते ८ जुलैदरम्यान तीन दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात सार्वत्रिक जोरदार पाऊस बरसला. त्यामुळे जिल्ह्यातील नदी व नाल्यांना पूर आला. त्यानंतर रखडलेल्या पेरणीला गती आली असून, १२ जुलैपर्यंत जिल्ह्यात ८३.७० टक्के खरीप पेरणी पूर्ण करण्यात आली.८३.७० टक्के अशी आटोपली पेरणीपीक क्षेत्र (हेक्टर)सोयाबीन २,०३,७६०कापूस १,१२,०४१तूर ५२,१३१उडीद १,३०५मूग १,२३९ज्वारी २८०मका ६४तीळ ३२७२ हजार हेक्टरवरील पेरणी दोन दिवसांत पूर्ण होणार ?

जिल्ह्यातील एकूण ४ लाख ४३ हजार खरीप पेरणी क्षेत्रापैकी १२ जुलैपर्यंत ३ लाख ७० हजार ८५३ हेक्टर क्षेत्रावरील पेरणी आटोपली असून, उर्वरित ७२ हजार १४७ हेक्टरवरील पेरणी १३ व १४ जुलै रोजी या दोन दिवसांच्या कालावधी पूर्ण होण्याची शक्यता आहे.१९३ मेट्रिक टन संरक्षित खतसाठा होणार मुक्त !

जिल्ह्यातील खरीप पेरणी आटोपण्याच्या मार्गावर असतानाच उगवलेल्या पिकांसाठी रासायनिक खतांची मागणीही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर १९३ मेट्रिक टन डीएपी खताचा संरक्षित साठा सोमवारपर्यंत विक्रीसाठी मुक्त करण्यात येणार आहे. कृषी आयुक्तालयाच्या निर्देशानुसार संबंधित संरक्षित खतसाठा मुक्त करण्यासंदर्भातील प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार संरक्षित खतसाठा मुक्त करण्यात येणार आहे, अशी माहिती कृषी विकास अधिकारी मिलिंद जंजाळ यांनी दिली.

 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रfarmingशेतीFarmerशेतकरी