शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! नागपूर जिल्ह्यात कुटुंबाची सामूहिक आत्महत्या; पती-पत्नीसह दोन मुलांनी घेतला गळफास
2
कधीकाळी जिगरी दोस्त होते इराण-इस्रायल; जानी दुश्मन कसे बनले? सद्दामच्या इराकवर केलेला हल्ला
3
१९७१ आम्ही विसरलो नाही, आधी माफी मागा; बांगलादेशने पाकिस्तानला करून दिली आठवण
4
ख्रिस गेलचा PM मोदींना 'नमस्कार'! भारतीयांना ती शैली भावली; 'युनिव्हर्सल बॉस'ची लक्षवेधी पोस्ट 
5
Sarva Pitru Amavasya 2024: 'या' ठिकाणी करता येते जिवंतपणी श्राद्ध; मात्र हा तोडगा कोणासाठी? वाचा!
6
"रोहित पवार, रोहित पाटील, टोपेंसह ५० उमेदवारांना पाडणार", लक्ष्मण हाकेंची यादी तयार!
7
अजित पवारांनी तटकरे, पटेलांसह घेतली अमित शाहांची भेट, कोणत्या मुद्द्यावर चर्चा?
8
Raj Thackeray : "कितीही बेताल वक्तव्य केली तरी..."; गांधी जयंतीनिमित्त राज ठाकरेंनी वाचाळवीरांना फटकारलं
9
कमाल! WhatsApp ची मोठी घोषणा, Video कॉलचा आनंद द्विगुणित; बदलणार चॅटिंगचा एक्सपीरियन्स
10
T20 WC 2024 : भारताचा विजयरथ! न्यूझीलंड, आफ्रिकेविरुद्ध 'भारी' सराव; गुरुवारपासून स्पर्धेचा थरार
11
फक्त 6 तास अ्न मोसाद इराणचे 100000 हून अधिक सीक्रेट न्यूक्लिअर डॉक्यूमेन्ट घेऊन 'भूर्र'; माजी राष्ट्रपतींचा दावा
12
गोविंदा गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, पोलिसांनी व्यक्त केला संशय
13
मुलगी झाली हो..! खुशबू तावडे आणि संग्राम साळवी दुसऱ्यांदा झाले आई-बाबा
14
गुरु-शनी गोचर: ८ राशींचा सुवर्णकाळ, धनलक्ष्मी भरभरुन देईल; नवदुर्गा कृपा करेल, दसरा शुभ होईल!
15
इराण-इस्रायल या दोन्ही दैशांपैकी भारताचा सर्वात जवळचा मित्र कोण?; जाणून घ्या
16
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय तरी काय? आता Babar Azam चा कर्णधारपदाचा राजीनामा!
17
गोविंदाला कधी मिळणार डिस्चार्ज? अभिनेत्याच्या तब्येतीविषयी पत्नी सुनिता आहुजा यांनी दिली माहिती
18
"शिवसेनेमुळे माझा पराभव झाला", समरजित सिंह घाटगेंचं मोठं विधान
19
धक्कादायक माहिती! 'त्या' दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरने सुनील तटकरे करणार होते प्रवास
20
Irani Cup 2024 : अजिंक्य रहाणेचे शतक थोडक्यात हुकले! पण सर्फराजने गड गाठलाच; ऋतुराजचा संघ अडचणीत

द्रवरूप सूक्ष्म अन्नद्रव्य खते ठरणार पिकांसाठी प्रभावी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 4:20 AM

अकोला : जमिनीचे आरोग्य खालावत असल्याने पिकांवर परिणाम जाणवत असून, उत्पादकता दिवसागणिक कमी होत आहे. या स्थितीत अधिक उत्पादनासाठी ...

अकोला : जमिनीचे आरोग्य खालावत असल्याने पिकांवर परिणाम जाणवत असून, उत्पादकता दिवसागणिक कमी होत आहे. या स्थितीत अधिक उत्पादनासाठी सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खते ही पिकासाठी संजीवनी ठरत आहे. याकरिता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडून अखिल भारतीय समन्वयीत सूक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्य प्रकल्प उभारण्यात आला आहे. या माध्यमातून द्रवरूप सूक्ष्म अन्नद्रव्य खतांची निर्मिती करण्यात येत असून, या नावीन्यपूर्ण प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना उत्पादन वाढीस मदत होणार आहे.

पिकाच्या जोमदार वाढीसाठी पीक पोषक अन्नद्रव्यांचा पुरवठा योग्य प्रमाणात होणे महत्त्वाचे आहे. सध्याची पीक जोपासना लक्षात घेतली तर आवश्यक १६ अन्नद्रव्यांपैकी नत्र, स्फुरद आणि पालाश या मुख्य अन्नद्रव्यांच्या वापरासंबंधी जितकी काळजी घेतली जाते तितकी काळजी कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, गंधक ही दुय्यम अन्नद्रव्ये आणि लोह, जस्त, मॅंगेनीज, तांबे, बोरॉन, मॉलिब्डेनम या सूक्ष्मअन्नद्रव्यांच्या वापराबाबत घेतली जात नाही. मात्र, मागील काही काळात या अन्नद्रव्यांचा वापर वाढला आहे. यामध्ये खासगी कंपन्यांची उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत. परंतु ती महागडी असल्याने शेतकऱ्यांना परवडणारी नाहीत. हा विषय हेरून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मृद, विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभागाने या सूक्ष्म अन्नद्रव्याची निर्मिती सुरू केली. १५ ऑगस्ट रोजी या केंद्राचे उद्घाटन पार पडले. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना उच्चप्रतीचे सूक्ष्म अन्नद्रव्य मिळण्यास मदत होणार होत आहे. ही खते विदर्भातील ८ केव्हीकेमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे कृषी विद्यापीठाकडून सांगण्यात आले.

मुख्य अन्नद्रव्याची मुबलकता वाढविण्यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्याची गरज आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील जमिनीचे पृथक्करण करण्यात येत आहे. विद्यापीठाद्वारे हा प्रकल्प हाती घेण्यात आला असून, या प्रकल्पांचा शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

- डॉ. संजय भोयर, विभाग प्रमुख, मृद विज्ञान व कृषी रसायन शास्त्र विभाग, डॉ.पंदेकृवि

सूक्ष्म अन्नद्रव्याची वाढत असलेली कमतरता लक्षात घेता, शेतकऱ्यांनी जमिनीतून व फवाऱ्याच्या माध्यमातून सूक्ष्म अन्न द्रव्याचा वापर केल्यास उत्पादनात वाढ होईल. शेतकऱ्यांना विद्यापीठाचा प्रकल्प फायदेशीर ठरणार आहे.

- डॉ. संदीप हाडोळे, प्रभारी अधिकारी, सूक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्य प्रकल्प

पिकांचे तीन ग्रेड तयार

या केंद्रातून निर्माण होणाऱ्या निविष्ठांमध्ये पीडीकेव्ही मायक्रो ग्रेड २ फळबाग व भाजीपाला पिकांकरिता, पीडीकेव्ही मायक्रो ग्रेड १० कडधान्य पिकांकरिता, पीडीकेव्ही मायक्रो ग्रेड ११ कपाशी पिकाकरिता तयार करण्यात आले आहे. राज्यातील शेतकऱ्यांना ना नफा ना तोटा तत्त्वावर ही खते विद्यापीठाने उपलब्ध करून दिली आहेत.

राज्यातील एकमेव सेंटर

या प्रकल्पाकरिता भारतीय मृदा विज्ञान संस्था भोपाळ यांच्याकडून ७५ टक्के तर राज्य सरकारकडून २५ टक्के अनुदान प्राप्त झाले आहे. तीन प्रकारच्या ग्रेडमध्ये द्रवरूप अन्नद्रव्य खते तयार करणारे हे राज्यातील एकमेव सेंटर असल्याचे कृषी विद्यापीठाकडून सांगण्यात आले.