शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
2
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
3
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
6
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
7
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
8
"अपने साथी शहीदों में शामिल...", हिजबुल्लाहकडून नसरल्लाहच्या खात्म्याची पुष्टी; घेतली मोठी शपथ!
9
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
10
हिजबुल्लाहच्या नसरल्लाहचा 'खात्मा'; आता खामेनेईंचं टेनन्शन वाढलं; इस्रायलवर भडकले अन् अंडरग्राउंड झाले!
11
"महालक्ष्मी ब्लॅकमेल करत होती, म्हणून ५९ तुकडे..."; बंगळुरू हत्येतील आरोपीच्या भावाचा मोठा दावा
12
“ठाकरे गटाला महाविकास आघाडीत फक्त ४४ जागा मिळतील”; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
13
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
14
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
15
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
16
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून १०१ पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ
17
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
18
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात
19
“...तर शरद पवारांच्या इशाऱ्यावर मनोज जरांगे मराठा आंदोलन करत होते स्पष्ट”: प्रकाश आंबेडकर
20
देशातील टॉप १० श्रीमंत देवस्थानांच्या यादीत राम मंदिर; किती कोटींचे दान मिळाले? आकडा पाहाच

मुख्य रस्त्यांनी घेतला माेकळा श्वास; अतिक्रमण करणाऱ्यांना हुसकावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2021 4:19 AM

शहरातील प्रमुख बाजारपेठ असाे वा मुख्य रस्ते तसेच गल्लीबाेळात अतिक्रमणाच्या समस्येने डाेके वर काढल्याची परिस्थिती आहे. रस्त्यालगत हातगाडी किंवा ...

शहरातील प्रमुख बाजारपेठ असाे वा मुख्य रस्ते तसेच गल्लीबाेळात अतिक्रमणाच्या समस्येने डाेके वर काढल्याची परिस्थिती आहे. रस्त्यालगत हातगाडी किंवा जमिनीवर विविध साहित्य विक्रीचा बाजार मांडला जात असल्याने रस्त्यातून वाट काढताना अकाेलेकरांच्या नाकीनऊ आले आहेत. गांधी राेड, टिळक राेड, खुले नाट्यगृह ते सांगलीवाला प्रतिष्ठान, जैन मंदिर परिसर, काला चबुतरा, इंदाैर गल्ली, जयहिंद चाैक, जठारपेठ चाैक, तुकाराम चाैक, काैलखेड चाैकातून धड पायी चालणेदेखील मुश्कील झाल्याचे चित्र आहे. या समस्येवर प्रभावी ताेडगा काढण्यात महापालिका प्रशासन सपशेल अपयशी ठरल्याचे समाेर आले आहे. सणासुदीच्या दिवसांत अकाेलेकरांना काहीअंशी दिलासा मिळावा, या उद्देशातून जिल्हाधिकारी तथा मनपाच्या प्रभारी आयुक्त निमा अराेरा यांनी पाेलीस प्रशासन तसेच शहर वाहतूक शाखेच्यावतीने संयुक्त अतिक्रमण हटाव माेहीम राबविण्याचे निर्देश दिले असता, गुरुवारी या माेहिमेला सुरुवात करण्यात आली.

हाॅकर्स झाेन केले निश्चित

सिटी काेतवाली ते थेट धिंग्रा चाैक, खुले नाट्यगृह ते सांगलीवाला, गांधी चाैकातील चाैपाटी आदी ठिकाणी हातगाडीवर विविध व्यवसाय करणाऱ्या लघु व्यावसायिक, फेरीवाल्यांसाठी खुले नाट्यगृहाचे आवार, भाटे क्लब मैदानात हाॅकर्स झाेन निश्चित केले आहेत. जठारपेठ चाैकातील लघु व्यावसायिकांसाठी मनपा शाळा क्रमांक ५च्या आवारात हाॅकर्स झाेन निश्चित केला आहे. याठिकाणी व्यवसाय न केल्यास साहित्य जप्त केले जाणार आहे.

जठारपेठ चाैकातील भाजीविक्रेत्यांना अभय

जठारपेठ चाैकात भाजीविक्रेत्यांच्या हेकेखाेरपणामुळे अतिक्रमणाची व वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. भाजपचे नगरसेवक व काही पदाधिकाऱ्यांनी अतिक्रमण करणाऱ्यांना अभय दिल्याने रहिवाशांमध्ये नाराजीचा सूर आहे.

साहित्याची केली ताेडफाेड

गांधी चाैक, इंदाैर गल्ली, कालाचबुतरा तसेच चाैपाटीवर अतिक्रमण उभारणाऱ्यांच्या हातगाड्यांची ताेडफाेड करण्यात आली. नाल्यांवर पक्के अतिक्रमण करीत त्यावर उभारलेले टिनाचे शेड, ओटे जमीनदाेस्त करण्यात आले. यावेळी गांधी राेडवरील आझाद काॅम्पलेक्सलगत काही व्यावसायिकांनी कारवाईला अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला असता ताे मनपाने हाणून पाडला.

आयुक्त म्हणाल्या हाेत्या...

निमा अराेरा यांनी ४ फेब्रुवारी राेजी मनपाच्या आयुक्तपदाची सुत्रे स्वीकारल्यानंतर प्रामुख्याने अतिक्रमण, माेकाट जनावरांची समस्या निकाली काढण्याचे स्पष्ट केले हाेते. शहरात फाेफावलेले अतिक्रमण आजही कायम असल्याचे चित्र आहे.