शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चाैकशी करा; वडिलांची मागणी, दुपारी घेतली कारागृहात भेट
2
१६५ लीटरचा फ्रीज, जमिनीवर रक्ताचे डाग, मृतदेहाचे तुकडे; बंगळुरूत पोलीस हादरले
3
युद्ध पेटलं! लेबनानमध्ये ४९२ लोकांचा मृत्यू; हिजबुल्लाहवर इस्त्रायलचा पलटवार
4
बदलापूरनंतर युपीमध्येही गुन्हेगाराचा एन्काऊंटर; ट्रेनमधून कॉन्स्टेबलला फेकणारा गुन्हेगार ठार
5
अग्रलेख : श्रीलंका डाव्या वळणावर! भारताला राहावे लागणार अधिक सावध
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: व्यापार - व्यवसायात वृद्धी होऊन मोठा फायदा होईल; धनलाभाची शक्यता
7
घोसाळकर हत्येप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा; न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई
8
सिनेटमध्ये कोण बसणार? युवासेना -अभाविपमध्ये थेट लढत, उत्सुकता शिगेला
9
मुंबई, ठाण्याचा राज ठाकरेंकडून आढावा; संभाव्य उमेदवारांबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा
10
उद्धव ठाकरे, राऊतांना काेर्टाचा दणका
11
‘एसटी’च्या ३९ जमिनी ६० वर्षांच्या लीजवर देणार; ३० वर्षांसाठी प्रतिसाद न मिळाल्याने निर्णय
12
सिडकोची गोड बातमी : दसऱ्याआधी निवडा तुमच्या आवडीचे घर
13
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
14
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
15
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
16
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
17
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
18
प्रकल्पग्रस्तांनी बांधलेली ‘ती’ घरे होणार नियमित; नवी मुंबई, पनवेल, उरणमध्ये सर्वेक्षण
19
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
20
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप

जरांगे पाटलांनी लोकसभा निवडणुकीत उतरलं पाहिजे; प्रकाश आंबेडकरांचं आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 1:22 PM

मनोज जरांगे पाटलांनी कुणालाही राजकीय पाठिंबा न देता येणाऱ्या निवडणुकीत राजकीय भूमिका घ्यावी, असं आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

Prakash Ambedkar (Marathi News) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी आता राजकीय मैदानात उतरलं पाहिजे, असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. "जरांगे पाटलांचा गरीब मराठ्यांच्या रस्त्यावरचा आवाज येणाऱ्या निवडणुकीत लोकसभेतही गेला पाहिजे. कायदेशीर लढा उभा करायचा असेल तर जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत भूमिका घेतली पाहिजे," असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.

"गेल्या ३५ वर्षांपासून गरीब मराठ्यांचा लढा हा सुरू आहे. मात्र श्रीमंत मराठे हा लढा उभा राहू देत नव्हते. परंतु जरांगे पाटलांच्या निमित्ताने त्याला स्वरूप आणि आकार मिळाला. जरांगे पाटलांनी कुणालाही राजकीय पाठिंबा न देता येणाऱ्या निवडणुकीत राजकीय भूमिका घ्यावी. जरांगे पाटलांच्या पाठीशी गरीब मराठ्यांनी पूर्ण ताकदीने उभं राहिलं पाहिजे. मुंबई येथे जे आंदोलन होणार आहे तिथे मोठ्या संख्येने उपस्थित राहिले पाहिजे," अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आहे.

सरकारवर हल्लाबोल करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "राज्य सरकारच्या वतीने मराठा आरक्षणाबाबत आमदार बच्चू कडू यांच्याकडून जरांगे पाटलांसोबत सुरू असलेली बोलणी अयशस्वी झाल्याची आमची माहिती आहे. जरांगे पाटील यांच्या माध्यमातून गरीब मराठ्यांचं नेतृत्व उभं राहिले आहे. त्यामुळे श्रीमंत मराठे हादरले आहेत. शासनावरही दबाव टाकला जात असल्याची परिस्थिती आहे. मात्र सरकारकडून जरांगे पाटील यांना खेळवत ठेवलं जात आहे. लोकसभा निवडणुका आल्याने सरकारचा हात दगडाखाली आहे," असं ते म्हणाले. 

"ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षण हे वेगळं असावं ही आमची भूमिका आहे. मराठ्यांसाठी आरक्षणाचं वेगळं ताट निर्माण केलं पाहिजे," अशी भूमिकाही प्रकाश आंबेडकर यांनी मांडली आहे.

दरम्यान, निवडणुकीच्या मैदानात उतरण्याच्या प्रकाश आंबेडकरांच्या आवाहनाला आता मनोज जरांगे पाटील कशा प्रकारे प्रतिसाद देतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणOBC Reservationओबीसी आरक्षण