शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात हिंदू नेत्याची अपहरण करून निर्घृण हत्या, भारताने केला तीव्र निषेध
2
सावध व्हा,  आलाय नवीन स्कॅम! तुम्ही तीर्थयात्रेचे पॅकेज ऑनलाइन बुक केले आहे का?
3
लग्न झालं, वधूच्या डोक्यावरचा पदर उचलला, पाहतो तर काय, आत होती नवरीची विधवा आई, तरुणाची फसवणूक 
4
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? आम्हाला काहीच फरक पडणार नाही : शिंदेसेना
5
आजचे राशीभविष्य - २० एप्रिल २०२५, सर्व दृष्टींनी लाभदायी दिवस, सामाजिक क्षेत्रात सक्रीय राहाल
6
मालेगाव बॉम्बस्फोट खटला; निकाल लागणार ८ मे रोजी, अनेक अडथळे पार करत १७ वर्षांनंतर सुनावणी पूर्ण
7
जमीन मोजणी हरकतीवर आता केवळ दोनच अपील, मोजणी नकाशे अपलोड झाल्यानंतरच अंतिम निकाल
8
जेलमधून बाहेर येताच त्याने युवतीला पुन्हा पळवून नेले, तलवारी-रॉडने घरावर केला हल्ला
9
राजची साद अन् उद्धवचा प्रतिसाद; मराठीच्या धुरळ्यात ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा
10
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण: हॉस्पिटलच्या व्यवहारातून बेदखल केल्याने होता तणाव
11
मित्राला वाचविताना दोन सख्ख्या भावांनी गमावला जीव; वेळास समुद्रकिनाऱ्यावर तिघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू
12
अवघ्या १७ दिवसांत ८३१ टन हापूस निर्यात; अमेरिकेला सर्वाधिक आंबा रवाना, युरोपाचीही पसंती
13
अवयवदात्याची स्वॅप रजिस्ट्री तयार करा, केंद्राच्या ‘नोटो’कडून सर्व राज्यांना सूचना
14
पावणेपाच लाखांचा घोटाळा; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीत बनावट कागदपत्रे, रुग्णनोंदी आढळल्या
15
अँटालिया स्फोटके प्रकरण: पोलिस अधिकारी काझीच्या दोषमुक्ततेस कोर्टाचा नकार, गुन्हेगारी कटाचा आरोप
16
कॅनडात बस स्टॉपवर भारतीय तरुणीची गोळीबारात हत्या; हल्लेखोरांना दुसऱ्यावर चालवायची होती गोळी
17
"ऑफर देणारे, अटी ठेवणारेही तेच, त्यामुळे मी..."; राज-उद्धव एकत्र येण्यावर CM फडणवीसांनी व्यक्त केला आनंद
18
"जाऊ दे यार, कामाचं बोला"; राज-उद्धव एकत्र येण्याच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे चिडले
19
मला स्टार्क वैगेरे व्हायचं नाही; ऑस्ट्रेलियन स्टारशी तुलना केल्यावर आवेश खाननं असा दिला रिप्लाय
20
शेकापच्या संतोष पाटलांच्या दोन्ही मुलांचा वेळास बीचवर एकाच वेळी मृत्यू; बहिणीचा मुलगाही सुमद्रात बुडाला

मराठी भाषा गौरव दिन  : शिधापत्रिकेवर कुसुमाग्रजांची कविता; कार्डधारक मात्र अनभिज्ञच

By atul.jaiswal | Updated: February 27, 2022 12:38 IST

Marathi Bhasha Din : कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी हा मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो.

- अतुल जयस्वाल

अकोला : मराठी भाषेला सन्मान मिळवून देण्यासाठी आयुष्यभर झटलेले ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक, कवी, नाटककार विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या स्वातंत्र्य देवीची विनवणी या कवितेच्या काही ओळी केशरी शिधापत्रिकेवर अंकित करण्यात आल्या आहेत. ज्यांचा जन्मदिन मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो, त्या कवी कुसुमाग्रजांची कविता शिधापत्रिकेवर आहे, हे मात्र अनेकांना माहीतच नसल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणात समोर आले.

मराठी ही महाराष्ट्राची अधिकृत भाषा असून, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. मराठी भाषेत अनेक कथा, कांदबऱ्या, निबंध, लघुकथा, नाटक, कवितांचे लेखन करून मराठी भाषेला समृद्ध करण्यात हातभार लावणाऱ्या कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी हा मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. कुसुमाग्रजांनी स्वातंत्र्याला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या औचित्यावर स्वातंत्र्य देवीची विनवणी ही अजरामर कविता लिहिली. ही कविता शिधापत्रिकांच्या मलपृष्ठावर छापण्यामागे असलेला शासनाचा उद्देश लोकांच्या अनभिज्ञतेमुळे सफल होताना दिसत नाही. कोणत्या ना कोणत्या कारणासाठी अनेकदा शिधापत्रिका हाताळली जात असली, तरी मागच्या पृष्ठावर काय आहे, हे माहीत नसणे, ही एक शोकांतिकाच म्हणावी. कुसुमाग्रजांनी कवितेत वर्णन केलेल्या परिस्थितीत आजही फारसा बदल झालेला नसल्याने या विनवणीची आजही खूप गरज आहे.

 

रेशनकार्डच्या शेवटच्या पृष्ठापर्यंत जाण्याची कधी गरजच वाटली नाही. या पानावर काय आहे, हे देखील कधी पहावे वाटले नाही. कुसुमाग्रजांची अजरामर कविता लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे.

- माणिकराव इंगळे, अकोला

 

दररोज रेशनकार्ड हाताळतो, परंतु, मागच्या पृष्ठावर काय लिहिलेले आहे, हे कधी जाणून घेतले नाही. या पानावर कुसुमाग्रजांची कविता आहे, हे आज पहिल्यांदाच माहीत झाले.

 

- रमेश सरदार, भौरद

रेशनकार्ड वापर केवळ रेशन दुकानात आणि इतर शासकीय कामाच्या वेळी होतो. हे कार्ड हाताळताना पहिले पृष्ठ पाहिले जाते. मागच्या पानावर काय आहे हे आजपर्यंत पाहिलेच नाही.

- दादाराव सिरस्कार, उगवा

रेशनकार्डावर कवी कुसुमाग्रजांची कविता आहे, हे मला माहीत होते. मला आजही आठवते, सातवीत असताना ती कविता मी वाचत असे.

- शालूबाई सिरसाट, अकोला

कुसुमाग्रजांनी स्वातंत्र्याच्या ५० व्या वर्धापनदिनी लिहिलेली ही कविता मला चांगल्या प्रकारे माहीत आहे. ही कविता रेशनकार्डाच्या शेवटच्या पृष्ठावर आहे, याचीही मला जाणीव आहे.

- शेषराव सिरसाट, आगर

टॅग्स :Marathi Bhasha Dinमराठी भाषा दिनKusumagrajकुसुमाग्रजAkolaअकोला