शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

बाजार समित्या सुरू ठेवा!- पणन संचालकांचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 10:25 IST

राज्यातील बंद असलेल्या बाजार समित्या सुरू करण्याचा आदेश पणन संचालकांनी काढला आहे.

अकोला : कोरोनाच्या पृष्ठभूमीवर राज्यात सर्वत्र दक्षता घेऊन बाजार समित्यांचे कामकाज सुरू आहे; परंतु काही बाजार समित्या उपाययोजना न करता थातूरमातूर कारणे देऊन बंद ठेवण्यात आल्या आहेत. शेतकरी अडचणीत असल्याने आवश्यक त्या उपाययोजना करून राज्यातील बंद असलेल्या बाजार समित्या सुरू करण्याचा आदेश पणन संचालकांनी काढला आहे.कोरोनाच्या या संकटात पुरवठा साखळी विस्कळीत झालेली असताना, शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी बाजार समित्या सुरू ठेवणे, बाजार समित्यांची कायदेशीर आणि नैतिक जबाबदारी आहे. असे असताना काही ठिकाणी ठोस कारणाशिवाय कामकाज बंद ठेवण्यात आले आहे. ही बाब अत्यंत गंभीर आणि कर्तव्यात कसूर दर्शविणारी आहे. याची जाणीव बाजार समित्यांच्या सर्व घटकांनी घेणे गरजेचे आहे. कोरोनाचे संकट पुढील बरेच दिवस लांबू शकते. यामुळे दीर्घकाळ बाजार समित्या बंद ठेवल्यास शेतकरी आणि ग्राहक हे घटक अडचणीत येण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थितीवरही विपरीत परिणाम होणार आहे. म्हणूनच शेतमालाचे व्यवहार व वाहतूक सुरू ठेवण्याबाबत केंद्र आणि राज्य शासनाने निर्देश दिले आहेत. याबाबत बाजार समित्या संचालक मंडळ व समितीवरील शासनाचे प्रतिनिधी, सहायक व उपनिबंधक यांना स्थानिक प्रशासनाशी सातत्याने संपर्क ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे बाजार समित्यांनी काही ठोस कारणाशिवाय असहकार्य करीत असल्यास तातडीने पर्यायी व्यवस्था करू न कामकाज सुरू करणे अपेक्षित आहे. तथापि, जेथे आपल्या व्यवस्थापन कायद्यांतर्गत लेखी आदेश प्राप्त असेल, तेथे जिल्हा उपनिबंधक व जिल्हाधिकारी यांच्या सल्ल्याने उचित कारवाई करण्यात यावी, असेही पणन संचालक सुनील पवार यांनी म्हटले आहे.

- शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घ्या!पावसाळा तोंडावर आला असून, शेतकºयांच्या अडचणी लक्षात घेऊन शेतकºयांचे प्रतिनिधित्व करणाºया बाजार समित्यांचे संचालक मंडळ व प्रशासक सर्व घटकासह कोरोना प्रतिबंधक आवश्यक उपाययोजना करू न नियमित कामकाज सुरू ठेवावे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola APMCअकोला कृषी उत्पन्न बाजार समिती