शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
2
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
3
धक्कादायक! नांदेडमध्ये पाण्यातून दोनशेहून अधिक जणांना विषबाधा, ६ जण गंभीर
4
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
5
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
6
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
7
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा
8
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
9
महायुतीमधील वाद विकोपाला गेले तर बसेल फटका; मीरा-भाईंदर, ऐरोली, बेलापूर, ठाणे मतदारसंघात अंतर्गत धुसफूस
10
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
11
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
12
ऋता आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करा; व्हायरल व्हिडीओवरून परांजपे यांची मागणी
13
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
14
ठाणे, वसईत २० लाखांत घर; म्हाडाच्या कोकण मंडळाचा ‘धमाका’
15
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
16
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
17
उद्योगपती मंदाना यांची १७० कोटींची मालमत्ता जप्त; बँक ऑफ बडोदाची फसवणूक केल्याचा ठपका
18
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
19
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
20
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका

मोर्णा, निगरुणातून होणार जिल्ह्यात सिंचन!

By admin | Published: November 14, 2014 12:52 AM

सिंचन विभागाने केले तीन हजार हेक्टरचे नियोजन.

अकोला : जिल्ह्यातील ५0 टक्कय़ांच्या आत जलसाठा असणार्‍या धरणांतून यावर्षी सिंचनासाठी पाणी सोडले जाणार नसले तरी मोर्णा व निगरुणा या दोन मध्यम सिंचन प्रकल्पांतील पाण्यावर रब्बीतील ओलिताचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे. त्यामुळे या धरणाच्या क्षेत्रात येणार्‍या शेतकर्‍यांना यावर्षी दिलासा मिळाला आहे. गतवर्षी जिल्ह्यात १ लाख ४१ हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बी हंगामातील पिकांची पेरणी करण्यात आली होती आणि पावसाचा ओलावा अधिक असल्याने रब्बी पिके चांगली होती; परंतु यावर्षी परिस्थिती उलट आहे. यंदा कृषी विभागाने तेवढेच नियोजन केले असले तरी प्रत्यक्षात काटेपूर्णा या मोठय़ा धरणातून यावर्षी सिंचनाला पाणी सोडण्यात येणार नाही. या धरणात आजमितीस ३१ टक्के जलसाठा शिल्लक असून, ते पिण्याकरिता आरक्षित केले आहे. जिल्ह्यातील रब्बी हंगामात सर्वाधिक हरभरा, तर पूर्व विदर्भात जवस या पिकाची पेरणी करतात. करडी, मोहरी व गहू या पिकांचा पेराही केला जातो. गहू पिकाला पाण्याची गरज असल्याने संरक्षित सिंचनाची ज्यांच्याकडे सोय आहे, ते शेतकर्‍यांनी गहू पेरणी केली आहे. तथापि, उपलब्ध संरक्षित पाणी संपूर्ण हंगामात पुरेल, याची शाश्‍वती नसल्याने गहू पिकाचे क्षेत्रही यावर्षी घटले आहे. पण, मोर्णा व निगरुणा या मध्यम प्रकल्पात अनुक्रमे ५७.९४ व ९८.४७ टक्के जलसाठा असल्याने या धरणांतून सिंचनाला पाणी देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला. सिंचन विभागामार्फत या धरणांमधून यावर्षी ओलीतासाठी पाणी सोडले जाणार आहे. यासाठी सिंचन विभागाने जिल्ह्यात जवळपास तीन हजार हेक्टर क्षेत्र सिचिंत करण्याचे नियोजन केले आहे.