शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांनी विधानसभेसाठी दहा उमेदवारांची केली घोषणा; दुसऱ्या यादीत कोणाची नावे?
2
अनपेक्षित निकालाचे विश्लेषण करत आहोत, हरयाणातील पराभवावर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
3
हरयाणातील गोहानाच्या जिलेबीची 'तारीफ' राहुल गांधींना महागात पडली! काय म्हणाला दुकानदार?
4
वकिलांकडून भाजपच्या आमदाराला पोलिसांसमोरच मारहाण; अर्बन बँक निवडणुकीतला प्रकार
5
मुंबईतील हिंदी बहुल १२ मतदारसंघात परप्रांतीय उमेदवाराला प्राधान्य द्या; मविआला पत्र
6
"काँग्रेसच जिंकणार असं दाखवलं जात होतं...", हरयाणा निवडणुकीवर द ग्रेट खलीची प्रतिक्रिया
7
बापरे! होणारा नवरा सतत करायचा कॉल; मुलीने ब्लॉक करताच 'त्याने' केलं असं काही...
8
गुरु-शुक्र समसप्तक योग: ७ राशींना दसरा शुभ, मालामाल व्हाल; दिवाळीला धनलक्ष्मी प्रसन्न होईल!
9
5 लाखातून उभे केले 7000 कोटींचे साम्राज्य! Phanindra Sama चे स्टार्टअप काय?
10
भारतासाठी 'करो वा मरो'चा सामना; 'कॅप्टन' हरमनप्रीत आज खेळणार? स्मृती मंधानाने दिली अपडेट
11
जम्मू-काश्मीरमध्ये मुफ्तींच्या पक्षाचं अस्तित्व धोक्यात! गेल्या निवडणुकीपर्यंत होता सर्वात मोठा पक्ष, पण आता...
12
सुप्रिया सुळेंच्या कारमधून चेहरा लपवून जाणारा 'तो' नेता अजित पवार गटाचा?; नाव समोर
13
बाहेरुन स्पा सेंटर पण...! जिल्हाधिकाऱ्यांनी अचानक छापा टाकला; मुलांसह ५ मुली ताब्यात, Video Viral
14
SIP मध्ये मिळतात असे ७ फीचर्स जे दुसऱ्या स्कीम्समध्ये मिळत नाहीत, गुंतवणूकीपूर्वी जाणून घ्या
15
हरयाणा निकालानंतर मविआत भूकंप?; संजय राऊत- नाना पटोले यांच्यात शाब्दिक 'वॉर'
16
काँग्रेस दिल्लीत एकटी पडणार, आप 'हात' सोडणार; विधानसभा निवडणुकीबद्दल मोठं विधान
17
Kolkata Doctor Case : फक्त २९ मिनिटं... आरोपीच्या जीन्स, शूजवर ट्रेनी डॉक्टरचं रक्त; CBI च्या आरोपपत्रात मोठा खुलासा
18
कॉलर पडकली अन् थप्पड लगावली, पोलिसांसमोरच भाजपा आमदाराला मारहाण, कारण काय?
19
PAK vs ENG : एकच नंबर! जो रुट इंग्लंडचा नवा 'हिरो', कसोटी क्रिकेटमध्ये केली ऐतिहासिक कामगिरी
20
हरयाणात मोठा विजय मिळवूनही भाजपला कसा बसला धक्का? विधानसभा अध्यक्षांसह १० पैकी ८ मंत्र्यांचा पराभव

वाहनांवर मोबाईलचा सर्रास वापर

By admin | Published: May 19, 2014 7:18 PM

चालत्या वाहनावर मोबाईल वापरावर बंदी; पण अकोला जिल्ह्यातील ग्रामीण भागात या नियमांचे सर्रास उल्लघंन .

गांधीग्राम (अकोला): चालत्या वाहनावर मोबाईल वापरावर बंदी असली तरी ग्रामीण भागात सर्रास या नियमांचे उल्लघंन होत आहे. पोलिसांसमक्ष मोबाईलचा दुचाकीवर वापर होत असताना एकही कारवाई पोलिसांकडून होत नसल्याने मोबाईल वापर करण्यार्‍यांची हिंमत वाढली आहे. सध्या बहुतेकांकडे दुचाकी आणि मोबाईल या गोष्टी अनिवार्य झाल्या आहेत. परंतु दुचाकीस्वारांचे एका हाताने गाडीचा हँडल आणि एका हाताने मोबाईलवर बोलत गर्दीतही भरधाव गाडी चालवण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. वाहतूक पोलिस विभागाचे मात्र याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. दुचाकी चालवताना मोबाईलवर बोलणे धोक्याचे आहे. दुचाकी चालवताना मोबाईल वाजल्यास थांबून बोल असे घरच्यांकडून वारंवार सांगितल्या जाते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करीत वाहने चालविताना मोबाईलवर बोलणे वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. हा प्रकार शहरासह ग्रामीण भागातही वाढत आहे. आकोट-अकोला या वर्दळीच्या मार्गावरील गांधीग्राम, देवरी फाटा या ठिकाणी वाहनांची मोठी गर्दी असते. या मार्गाने काळीपिवळी, बस, ट्रक, दुचाकी आदी वाहने सुसाट धावतात. अशावेळी दक्षतेने वाहन चालवावे लागते. परंतु मोबाईलचा वाहनावर वापर होत असल्याने अनेक लहान-मोठे अपघात या मार्गावर घडत आहेत. जीवाला आणि दंडात्मक कारवाईलाही न घाबरणार्‍यांमध्ये तरुणाई आघाडीवर आहे. पण आपण दुसर्‍याच्या जीवाशी खेळत आहो, हे मात्र ते विचारात घेत नाहीत. एका हातामध्ये मोबाईल कानाला लावून हसत खेळत संवाद सुरू असतात. त्यामुळे केव्हाही तोल जाण्याची शक्यता असते. अशावेळी रस्ता गर्दीचा आहे, पाठीमागून कोणते वाहने येत आहे, याचाही अंदाज दुचाकीस्वार घेत नाही. खरे तर वाहन चालविताना मोबाईलवरून बोलणे म्हणजे गुन्हाच आहे. मात्र असा गुन्हा सर्रासपणे केला जात आहे. पोलिसांनी या प्रकरणी कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी होत आहे.