शहरं
Join us  
Trending Stories
1
CM शिंदेंनी शिवसेनेचा पहिला उमेदवार केला जाहीर, जयस्वालांना 'या' मतदारसंघातून तिकीट
2
Shubham Lonkar: अकोल्याचा शुभम वर्षभरापासून लॉरेन्स टोळीच्या संपर्कात
3
भुजबळ-जरांगे समर्थक आमने-सामने; महामार्गावरील वाहतूक रोखली, येवल्यात तणाव!
4
Ind vs Aus Women: भारताच्या आशा मावळल्या! ऑस्ट्रेलियाने 9 धावांनी केला पराभव
5
पुण्यात काँग्रेसमध्ये तिकिटासाठी गर्दी! २१ विधानसभा मतदारसंघासाठी झाल्या मुलाखती
6
छातीत कळ आली अन्...; नांदेडमध्ये 'लाडकी बहीण' कार्यक्रमाला आलेल्या महिलेचा मृत्यू
7
मोठी बातमी! बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात पुण्यातून एकाला अटक, आरोपी कोण?
8
Baba Siddique : 'ती' पोस्ट करणारा अकोल्याचा शुभम लोणकर भावासह फरार, पोलिसांकडून शोध
9
बाबा सिद्दिकींच्या हत्येमागे 'रिअल इस्टेट' कनेक्शन?; केआरकेच्या पोस्टमुळे नवी चर्चा
10
Baba Siddique यांना खरंच वाय दर्जाची सुरक्षा होती का? अखेर उत्तर मिळालं
11
बाबा सिद्दिकी हत्याकांडातील चौथ्या आरोपीची ओळख पटली; पोलीस जसीन अख्तरच्या मागावर
12
नाशिकमध्ये अग्निवीरांचा मृत्यू; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदी-राजनाथ सिंहांना तीन सवाल
13
'महाराष्ट्र राजकीय परिवर्तनासाठी सज्ज', विधानसभा निवडणुकीबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
14
१६ ऑक्टोबरला नवीन पल्सर लाँच होणार? पहिल्या सीएनजी बाईकला टक्कर देणार!
15
चांदीने १ लाखाचा टप्पा केला पार; जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर?
16
बाबा सिद्दिकी हत्या : एका आरोपीला पोलीस कोठडी, तर दुसऱ्याला..., न्यायालयाचा आदेश काय?
17
बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी केली फेसबुक पोस्ट; पोलिस घरी पोहोचले, त्याआधीच शुभम झाला गायब
18
Baba Siddique : "२०१९ ला जेलमध्ये गेला, जामीन कसा मिळाला माहीत नाही; ११ वर्षांपूर्वीच घरातून हाकलून दिलं"
19
"उद्धव ठाकरे, सारखं वाघनखं काढतंय; एकनाथ शिंदे, ते एक पुष्पा वेगळंच"; राज ठाकरे बरसले
20
"मी तुमचा चित्रपट बनवेन - एक था MLA", दाऊद इब्राहिमनं एकदा बाबा सिद्दिकींना दिली होती धमकी

शंकराचार्यांच्या परिशीलनाला अधिष्ठानाची गरज - स्वानंद पुंड

By admin | Published: May 03, 2017 1:12 AM

अकोला: आद्य शंकराचार्य यांच्या देशाच्या एकात्मतेसाठी अखंडपणे कार्य करणाऱ्या विचारांच्या परिशीलनासाठी भारतीय अधिष्ठानाची गरज असल्याचे मत प्रा.डॉ. स्वानंद पुंड यांनी केले.

अकोला: आद्य शंकराचार्य यांच्या देशाच्या एकात्मतेसाठी अखंडपणे कार्य करणाऱ्या विचारांच्या परिशीलनासाठी भारतीय अधिष्ठानाची गरज असून, यामुळेच खऱ्या अर्थाने त्यांच्या सृजनशील व राष्ट्रीय एकात्मतेच्या कार्याची ओळख होऊ शकत असल्याचे मत वणी येथील विद्यावाचस्पती प्रा.डॉ. स्वानंद पुंड यांनी केले.आद्य शंकराचार्य प्रतिष्ठान अकोल्याच्या वतीने आद्य शंकराचार्य यांच्या जयंतीवर रविवारी प्रमिलाताई ओक हॉल येथे आयोजित व्याख्यान कार्यक्रमात पुंड हे शंकराचार्यांच्या जीवन कार्यावर बोलत होते. राणी सती धामचे अध्यक्ष जगदीशप्रसाद बाछुका यांच्या अध्यक्षतेत संपन्न या व्याख्यान कार्यक्रमात ज्येष्ठ समाजसेवी तात्यासाहेब वायचाळ, काकासाहेब जोशी उपस्थित होते.प्रा.डॉ. पुंड पुढे म्हणाले, शंकराचार्यांच्या संदर्भात आज काहीही वक्तव्य केले जाते. आद्य शंकराचार्य हे अगदी आठ वर्षाच्या वयात चार वेदाचे भाष्यकार झालेत. त्यांनी आपल्या अल्पजीवनात धर्माच्या अधिष्ठानासाठी भारताच्या चार दिशेत चार शक्तिपीठे स्थापन केलीत. अगदी उत्तरेच्या पीठावर दक्षिणेच्या व्यक्तीला बसवून राष्ट्रीय एकात्मतेचा जगाला परिचय करून दिला. त्यांच्या या शैव व वैष्णव पंथीय विचारांना जोडण्याच्या प्रक्रियेमुळेच भारतात खऱ््या अर्थाने धर्म जागृत होऊन नांदू लागला असल्याचे त्यांनी सांगून धर्माची व्याख्या प्रतिपादित केली. त्यांनी समाजाला जागृत करण्यासाठी अद्वितीय कार्य केले. चार स्थापित शक्तिपीठावर चार महाकुंभाची निर्मिती केली. आज या स्थानावर कुंभमेळ्यात कोट्यवधी व्यक्ती जमा होऊन धर्मचिंतन करीत असल्याचे व्याख्यानात सांगितले. यावेळी पुंड व बाछुका यांचा सत्कार करण्यात आला. अथितीचें स्वागत काका जोशी, नंदू त्रिवाड, अमोल पाटील, गिरीश बावणे यांनी केले. प्रास्ताविक प्रा. महेश मोडक यांनी तर आभार काकासाहेब जोशी यांनी मानले.