शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! नागपूर जिल्ह्यात कुटुंबाची सामूहिक आत्महत्या; पती-पत्नीसह दोन मुलांनी घेतला गळफास
2
कधीकाळी जिगरी दोस्त होते इराण-इस्रायल; जानी दुश्मन कसे बनले? सद्दामच्या इराकवर केलेला हल्ला
3
१९७१ आम्ही विसरलो नाही, आधी माफी मागा; बांगलादेशने पाकिस्तानला करून दिली आठवण
4
ख्रिस गेलचा PM मोदींना 'नमस्कार'! भारतीयांना ती शैली भावली; 'युनिव्हर्सल बॉस'ची लक्षवेधी पोस्ट 
5
Sarva Pitru Amavasya 2024: 'या' ठिकाणी करता येते जिवंतपणी श्राद्ध; मात्र हा तोडगा कोणासाठी? वाचा!
6
"रोहित पवार, रोहित पाटील, टोपेंसह ५० उमेदवारांना पाडणार", लक्ष्मण हाकेंची यादी तयार!
7
अजित पवारांनी तटकरे, पटेलांसह घेतली अमित शाहांची भेट, कोणत्या मुद्द्यावर चर्चा?
8
Raj Thackeray : "कितीही बेताल वक्तव्य केली तरी..."; गांधी जयंतीनिमित्त राज ठाकरेंनी वाचाळवीरांना फटकारलं
9
कमाल! WhatsApp ची मोठी घोषणा, Video कॉलचा आनंद द्विगुणित; बदलणार चॅटिंगचा एक्सपीरियन्स
10
T20 WC 2024 : भारताचा विजयरथ! न्यूझीलंड, आफ्रिकेविरुद्ध 'भारी' सराव; गुरुवारपासून स्पर्धेचा थरार
11
फक्त 6 तास अ्न मोसाद इराणचे 100000 हून अधिक सीक्रेट न्यूक्लिअर डॉक्यूमेन्ट घेऊन 'भूर्र'; माजी राष्ट्रपतींचा दावा
12
गोविंदा गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, पोलिसांनी व्यक्त केला संशय
13
मुलगी झाली हो..! खुशबू तावडे आणि संग्राम साळवी दुसऱ्यांदा झाले आई-बाबा
14
गुरु-शनी गोचर: ८ राशींचा सुवर्णकाळ, धनलक्ष्मी भरभरुन देईल; नवदुर्गा कृपा करेल, दसरा शुभ होईल!
15
इराण-इस्रायल या दोन्ही दैशांपैकी भारताचा सर्वात जवळचा मित्र कोण?; जाणून घ्या
16
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय तरी काय? आता Babar Azam चा कर्णधारपदाचा राजीनामा!
17
गोविंदाला कधी मिळणार डिस्चार्ज? अभिनेत्याच्या तब्येतीविषयी पत्नी सुनिता आहुजा यांनी दिली माहिती
18
"शिवसेनेमुळे माझा पराभव झाला", समरजित सिंह घाटगेंचं मोठं विधान
19
धक्कादायक माहिती! 'त्या' दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरने सुनील तटकरे करणार होते प्रवास
20
Irani Cup 2024 : अजिंक्य रहाणेचे शतक थोडक्यात हुकले! पण सर्फराजने गड गाठलाच; ऋतुराजचा संघ अडचणीत

शेतकऱ्यांसाठी पुढील चार-पाच दिवस चिंतेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 4:17 AM

सध्या जिल्ह्यातील विविध भागात शेतात ज्वारी, गहू, हरभरा, कांदा, तीळ, संत्रा, फळभाज्या अशी पीक आहेत. ज्वारी, गहू, हरभरा काढणीला ...

सध्या जिल्ह्यातील विविध भागात शेतात ज्वारी, गहू, हरभरा, कांदा, तीळ, संत्रा, फळभाज्या अशी पीक आहेत. ज्वारी, गहू, हरभरा काढणीला आले आहेत. तीन दिवसांपासून अवकाळी पाऊस, वादळवाऱ्यामुळे या पिकांचे नुकसान होत आहे. बार्शीटाकळी, पातूर, बाळापूर, मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यात सध्या ढगाळ वातावरण आहे. शेतकऱ्यांमध्ये या वातावरणामुळे काळजी निर्माण झाली आहे. पुढील चार-पाच दिवस अवकाळीचे वातावरण कायम राहणार असून हवामान खात्याने गारपीट, पावसाचा इशारा दिला आहे. उपग्रह छायाचित्रानुसार अकोला, वाशिम, बुलडाणा इत्यादी जिल्ह्यासोबत, मध्य प्रदेशच्या राज्य सीमावर्ती तालुक्यात संध्याकाळ ते रात्री उशिरापर्यंत वादळी, अवकाळी पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने वर्तविले आहे. शेतकऱ्यांनी गहू, हरभरासह इतर पिकांची कापणी करून घेण्याचे कृषी विभागाने आवाहन केले आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे प्राथमिक सर्वेक्षणाचे काम सुरू आहे.

--कोट--

हवेतील वाढलेली आर्द्रता रात्री उशिरापर्यंत अशा वादळी पावसाच्या प्रणालीकरिता मदतगार ठरतं आहे. पुढील आठवडाभर कमी-जास्त प्रमाणात पाऊस राहण्याची शक्यता आहे.

संजय अप्तुरकर, हवामान अभ्यासक