शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांचे पुन्हा अंतर्गत मूल्यमापन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 15:09 IST

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या पुनर्विचार सभेनंतर हा निर्णय घेण्यात आला.

अकोला : शैक्षणिक सत्र २०१९-२० पासून राज्यात इयत्ता नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन सत्रनिहाय करण्यात येणार आहे. विषयानुसार २० गुणांचे हे मूल्यमापन असणार आहे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या पुनर्विचार सभेनंतर हा निर्णय घेण्यात आला.महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व प्रशिक्षण परिषदेतर्फे शैक्षणिक वर्ष २०१७-१८ पासून इयत्ता नववीसाठी व शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून इयत्ता दहावीसाठी पुनर्रचित अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली होती; परंतु या सत्रात इयत्ता दहावीच्या निकालानंतर दोन्ही इयत्तांच्या पुनर्रचित अभ्यासक्रमाच्या मूल्यमापन योजनेचा पुनर्विचार करण्यात आला. शिक्षण आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित करण्यात आली होती. या समितीच्या अहवालानंतर शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार, लेखी मूल्यमापनासोबतच विद्यार्थ्यांच्या विविध क्षमतांचे मापन करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे सातत्यपूर्ण मूल्यमापनासाठी पुन्हा एकदा अंतर्गत मूल्यमापनाला सुरुवात करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना विषयानुसार विविध प्रकल्प देऊन त्यांचे मूल्यमापन करण्यात येणार आहे. हे मूल्यमापन प्रत्येक विषयाला २० गुणांसाठी असणार आहे.उत्तीर्ण होण्यासाठी ३५ टक्के गुणविद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठी लेखी व अंतर्गत मूल्यमापन मिळून किमान ३५ टक्के गुण अनिवार्य असणार आहेत. अंतर्गत मूल्यमापनामध्ये तोंडी परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा व बहुपर्यायी प्रश्न परीक्षा व उपक्रमांचा समावेश राहणार आहे.अंतर्गत मूल्यमापनाचे एकूण ७० गुणइयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाची परीक्षा एकूण ७० गुणांची राहणार आहे. यामध्ये सर्वच विषयांसाठी २० गुणांची परीक्षा राहणार आहे.इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन पुन्हा सुरू करण्यात आले आहे. हे मूल्यमापन पूर्वीप्रमाणेच करण्यात येणार आहे.- प्रकाश मुकुंद, शिक्षणाधिकारी, माध्यमिक, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाEducation Sectorशिक्षण क्षेत्र