शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

जीआरच निघाला नाही; ५० हजारांची मदत मिळणार की नाही?

By atul.jaiswal | Updated: September 29, 2021 12:04 IST

Akola News : अद्याप कोणताही शासन निर्णय निघालेला नसून, कोणत्याही प्रकारचे दिशानिर्देश राज्य सरकारकडून जिल्हा प्रशासनाला अद्याप प्राप्त झालेले नाहीत.

ठळक मुद्दे कोरोना मृतांचे कुटुंबीय करताहेत विचारणा प्रशासन म्हणते अजून निर्देशच नाहीत

अकोला : कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबीयांना राज्य सरकारांकडून ५० हजार रुपयांची मदत दिली जाईल, अशी माहिती केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिली आहे. ही मदत राज्य सरकारांच्या आपत्ती निवारण निधीतून दिली जाणार असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. माध्यमांमध्ये याबाबतचे वृत्त झळकल्यानंतर कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना मदतीची आस लागली आहे. तथापि, याबाबत अद्याप कोणताही शासन निर्णय निघालेला नसून, कोणत्याही प्रकारचे दिशानिर्देश राज्य सरकारकडून जिल्हा प्रशासनाला अद्याप प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे ही मदत कधी मिळणार, हे अजूनही अनिश्चितच आहे.

कोरोनामृतांच्या कुटुंबीयांना ५० हजार रुपये अर्थसाहाय्य देण्याची शिफारस राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केली होती. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने बुधवार, २२ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले. राज्य सरकारांकडून आपत्ती निवारण निधीतून ही मदत देण्यात येईल, असे निश्चित करतानाच यासाठी जिल्हा पातळीवर समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. आलेल्या अर्जांवर संबंधित यंत्रणेला ३० दिवसांत निर्णय घ्यावा लागणार असल्याचेही यामध्ये म्हटले आहे.

निकषांबाबत प्रशासन अनभिज्ञ

कोरोना मृतांच्या कुटुंबीयांना अर्थसाहाय्य देण्याचे निश्चित झाले असले, तरी याबाबत अद्याप कोणत्याही मार्गदर्शक सूचना किंवा शासन निर्णय आलेला नाही. त्यामुळे या मदतीसाठी पात्रतेचे निकष काय आहेत, याबाबत जिल्हा प्रशासन अनभिज्ञ आहे.

 

कोठे करायचा संपर्क?

माध्यमांमध्ये वृत्त झळकल्यानंतर कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांकडून ही मदत कधी, कशी प्राप्त होणार याबाबत विचारणा केली जात आहे. यासाठीचे निकष काय यासंदर्भातही विचारणा होत आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला असता, याबाबत अद्याप कोणत्याही सूचना प्राप्त झाल्या नसल्याचे सांगण्यात आले.

जिल्ह्यातील कोरोना बळी

११३७

 

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना ५० हजार रुपयांची मदत देण्याबाबतचे प्रतिज्ञापत्र केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केले आहे. तथापि, यासंदर्भात आम्हाला अजून कोणतेही निर्देश नाहीत किंवा तसा जीआरही निघालेला नाही. जिल्ह्यातील मृतांची यादी आमच्याकडे आहे. दिशानिर्देश प्राप्त झाल्यावर त्या दिशेने कार्यवाही करता येईल.

- संजय खडसे, निवासी उपजिल्हाधिकारी, अकोला

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला