शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
5
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
6
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
7
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
8
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
9
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
10
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
11
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
12
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
13
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
14
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
15
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
16
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
19
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
20
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

ऐ मौत तूने मुझे जमींदार कर दिया!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 10:30 IST

डॉ. महेबुब राही यांच्या ‘चाँदणी तखय्युल की’ या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी राहत इंदौरी बार्शीटाकळी येथे आले होते

अकोला : दो गज सहीमगर यह मेरी मिल्कियत तो हैऐ मौत तूनेमुझे जमींदार कर दिया....अशा एकापेक्षा एक सरस शेर असलेल्या अनेक गझल सादर करून मैफिली जिंकणारे जिंदादिली शायर डॉ. राहत इंदौरी यांचा पश्चिम वºहाडातील निवडक शायरांसोबत चांगलाच ऋणानुबंध होता. ४ फेब्रुवारी २०१२ रोजी प्रमिलाताई ओक हॉल येथे सायंकाळी झालेल्या कवी संमेलनात राहत इंदौरी यांनी रंगत आणली होती.अकोल्याच्या बार्शीटाकळी येथील डॉ. मेहबुब राही हे त्यांचे एक स्नेही. डॉ. राही यांनी त्यांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा दिला.डॉ. महेबुब राही यांच्या ‘चाँदणी तखय्युल की’ या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी राहत इंदौरी बार्शीटाकळी येथे आले होते. डॉ. राही म्हणाले की, राहत इंदौरी हे भारतातील मोठे शायर. देश-विदेशात त्यांचे कार्यक्रम होतात. त्यामुळे त्यांचे मानधनही जास्तच असे. त्यांना कार्यक्रमाचे आमंत्रण दिले अन् मानधनाचा विषय आल्यावर त्यांनी कुठल्याही रकमेचा आग्रह न धरता केवळ माझ्यावरील प्रेमापोटी ते बार्शीटाकळीत आले.एवढा मोठा शायर; पण त्यांच्या वागण्या-बोलण्यात कुठेही मोठेपणाचा लवलेश नव्हता. शेर सादर करण्याची त्यांची वेगळी शैली हे त्यांचे खास वैशिष्ट्य, शेरची पहिली ओळ ते उंचावर नेत अन् दुसऱ्या ओळीमध्ये वेगळी कलाटणी घेऊन त्यांनी शब्द फेकले की मैफील एका वेगळ्या उंचीवर जात असे. देशातील अनेक प्रश्नांवरही त्यांची भूमिका रोखठोक असे.आजच्या घडीला मुनव्वर राणा अन् राहत इंदौरी या दोन शायरांनी संपूर्ण देशाात कमावलेली लोकप्रियता ही त्यांच्या लेखणीची ताकद आहे. राहत इंदौरी यांनी जातीवादावर प्रहार करणारेही लिखाण केले. त्यांचा एक शेर खूपच प्रसिद्ध आहेहमारा खुन भी सामील हैइसीकी मिट्टी में,किसी के बाप का हिंदोस्ता थोडी है.....अशी प्रखर भूमिका ते घेतमैं जब मर जाऊं तो मेरी अलग पहचान लिख देना,लहू से मेरी पैशानी पे हिन्दुस्तान लिख देना...असे म्हणणारा शायर आपल्या साहित्याने अजरामर राहील, अशा शब्दात डॉ. राही यांनी ‘लोकमत’कडे भावना व्यक्त केल्या.

राहत इंदौरी यांच्या समवेत १९७५ मध्ये मला कविता सादर करण्याचा योग आला अन् त्यानंतर अनेकवेळा कवी संमेलनात सोबतच सहभागी झालो. राहत इंदौरी हे ‘अदब’ आणि ‘तहजीब’चे कवी होते. त्याचा आत्मविश्वास त्यांना एका उच्च स्थानावर घेऊन गेला, त्यांच्या कविता उर्दू-हिंदी गझलच्या जगावर नेहमीच वर्चस्व कायम ठेवतील.-घनश्याम अग्रवाल, ज्येष्ठ कवी

इंदौरी यांना कलाश्रयाच्या मैफलीत ऐकण्याची संधी मिळाली. ती संध्याकाळ अजूनही डोळ्यासमोर तरंगते. त्यांच्या कवितेतुन राजकीय प्रासंगिकता, तसेच त्यांच्या शायरीमध्ये सर्वसामान्यांच्या भावना जुळवून घेण्याची क्षमता आहे, हे त्यांचे वैशिष्ट्य होते.-डॉ. रामप्रकाश वर्मा,साहित्यिक, अकोला

राहत इंदौरी यांची स्टाईल खूप वेगळी होती. कलाश्रय माध्यमातून त्यांना अकोल्यात बोलवण्याची संधी मिळाली. कवि संमेलनाची ती संध्याकाळ अकोल्याच्या साहित्यप्रेमींसाठी अजूनही संस्मरणीय आहे. मंचावर बरेच कवी होते पण राहतजी यांची शायरी सादर करण्याची शैली सर्वांचे मन जिंकणारी ठरली. त्यांच्या जाण्याने हिंदी-उर्दू साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.-डॉ. राजीव बियाणी, ज्येष्ठ पत्रकार

 

टॅग्स :Akolaअकोलाcultureसांस्कृतिक