शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

‘ओबीसी संवाद’ बैठकीत आरक्षाच्या मुद्दयावर मंथन !

By संतोष येलकर | Published: November 18, 2023 6:11 PM

शिवबा, ज्योतिबा, बाबासाहेबांच्या विचारांची सत्ता प्रस्थापित करू; प्रकाश आंबेडकर यांचे प्रतिपादन.

अकोला : शहरातील जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथे शुक्रवारी आयोजित ‘ओबीसी संवाद’ बैठकीत ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर मंथन करण्यात आले असून, आम्ही शिवबा, ज्योतिबा आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची सत्ता प्रस्थापित करू, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांनी या बैठकीत केले.

छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रयतेचे स्वराज निर्माण केले. ज्यामध्ये शेतकऱ्यांना, स्त्रियांना व वंचितांना स्वाभिमानाचे जीवन मिळाले होते. वर्तमानातील प्रस्थापित राजकारण्यांना शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांची सत्ता घालवून स्वतःची व भांडवलदारी सत्ता निर्माण करायची आहे, असा आरोप करीत आम्ही या धोरणाचा जोरदार विरोध करणार असून, लढा उभारून आम्ही शिवबा ज्योतिबा आणि बाबासाहेबांच्या विचारांची सत्ता प्रस्थापित करू, असे ॲड. आंबेडकर यांनी सांगितले. ओबीसींचे आरक्षण कायम ठेवून मराठा समाजाला आरक्षण देण्याची आमची भूमिका असल्याचेही आंबेडकर यांनी यावेळी स्पष्ट केले. याप्रसंगी प्रा. अंजली आंबेडकर व युवा नेते सुजात आंबेडकर यांनीही विचार मांडले.

बैठकीचे प्रास्ताविक प्रदीप वानखडे यांनी केले, तर सूत्रसंचालन जिल्हा परिषद सत्तापक्षाचे गटनेता ज्ञानेश्वर सुलताने व आभार प्रदर्शन जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे यांनी केले. या बैठकीला ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

टॅग्स :AkolaअकोलाPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी