शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

उघड दार देवा आता...व्यवसाय सुरु; मंदिरे मात्र बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 11:32 IST

Temples are closed : जिल्ह्याचे आराध्यदैवत असलेल्या राजराजेश्वर मंदिराच्या गेटजवळच भाविक नतमस्तक होऊन दर्शन घेत आहेत.

अकोला : कोरोनामुळे दुसऱ्यांदा मंदिरे बंद ठेवण्यात आली आहे. आता निर्बंध शिथिल होत असून, सर्वच व्यवसाय सुरू झाले आहे; मात्र जिल्ह्यातील मंदिरे अद्यापही बंद आहे. त्यामुळे जिल्ह्याचे आराध्यदैवत असलेल्या राजराजेश्वर मंदिराच्या गेटजवळच भाविक नतमस्तक होऊन दर्शन घेत आहेत. राज्यात ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्गाचा वृद्धीदर कमी आहे, अशा जिल्ह्यांत निर्बंध शिथिल करण्यात येत आहे. त्यानुसार संसर्गाचा वृद्धीदर कमी असलेल्या जिल्ह्यात अकोल्याचा समावेश असल्याने जिल्ह्यात ‘अनलॉक’ करण्यात आले आहे. टप्प्याटप्प्याने सर्वच व्यवसायांना मुभा देण्यात आली आहे. वेळेचे बंधनही कमी करण्यात आले आहे. असे असले तरी अद्याप भक्तांचे श्रद्धास्थान असलेली मंदिरे बंद आहेत. मंदिरांमध्येही गर्दी टाळण्यासाठी त्या संदर्भात स्वतंत्र आदेश काढलेले नाहीत. त्यामुळे जिल्ह्याचे आराध्यदैवत असलेल्या राजराजेश्वराचे दर्शन करण्यासाठी भाविक येतात; परंतु मंदिर बंद असल्याने गेटजवळ नतमस्तक होऊन परत जातात. यामुळे मंदिर परिसरात असलेल्या व्यावसायिकांनाही फटका बसत आहे. त्यांचा व्यवसाय ठप्प झाला आहे.

 

किती दिवस कळसाचेच दर्शन?

कोरोनामुळे होणारी गर्दी पाहता सर्व मंदिरे बंद आहे. निर्बंध शिथिल झाल्याने भगवंताच्या दर्शनाची आस लागली आहे. त्यामुळे दर्शनासाठी गेल्यानंतर मंदिराजवळ जाऊनही केवळ कळसाचेच दर्शन करून परतावे लागते.

- मंगेश ताठे, भाविक

 

भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मंदिरांची दरवाजे केव्हा उघडणार अशी आस लागली आहे. कोरोनाची लाट ओसरत असल्याने देवस्थाने उघडण्यात यावी, आणखी किती दिवस दूर दर्शन करावे लागणार आहे.

- अजय राऊत, भाविक

 

आर्थिक गणित कोलमडले !

शहरातील सर्व मंदिर बंद आहे. यासोबत लग्न सोहळे, कार्यक्रमही बंद असल्याने फुलाला मागणी नाही. आता निर्बंध शिथिल झाले आहे. त्यामुळे थोड्या प्रमाणात व्यवसाय होत आहे; परंतु मंदिरे बंद असल्याने सर्व व्यवसाय बुडाला.

- मुकेश विटकर, फूलविक्रेता

मंदिरात भाविक आल्यावर व्यवसायास चालना मिळते. दुकानात सर्व पूजा साहित्य असल्याने मंदिर उघडे राहणे आवश्यक आहे. मंदिर बंद असल्याने व्यवसाय केवळ १५ टक्क्यांवर आला आहे. अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

- मोहन अंबारखाने, पूजा साहित्य विक्रेता

मंदिरात गेल्याने आत्मबळ मिळते !

निर्बंध हटल्यानंतर भाविक मंदिरात दर्शनासाठी जात आहे. मंदिर बंद असल्याने त्यांना दूर दर्शन करून परतावे लागते. भाविकांची श्रद्धा पाहता लवकरात लवकर मंदिर खुलणे गरजेचे आहे. कोरोनाचे नियम पाळून सर्व उघडत असताना मंदिर सुद्धा उघडायला हवी, मनुष्याला मंदिरात गेल्याने आत्मबळ प्राप्त होते.

- पंडित रविकुमार शर्मा, पुजारी

टॅग्स :Rajrajeshwar Templeराजराजेश्र्वर मंदिरAkolaअकोलाCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक