शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

परदेशात गाडी चालविण्याच्या परवान्याचेही होऊ शकते नूतनीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:23 IST

अकाेला : परदेशात वाहन चालविण्यासाठी वाहन परवाना असणे गरजेचे असते. विदेशात तर हे नियम अत्यंत कडक आहेत. मात्र, मुदत ...

अकाेला : परदेशात वाहन चालविण्यासाठी वाहन परवाना असणे गरजेचे असते. विदेशात तर हे नियम अत्यंत कडक आहेत. मात्र, मुदत संपलेले परवान्यांचे नूतनीकरण आरटीओ कार्यालयातही होते. अकाेला आरटीओ कार्यालयात दरवर्षी परवान्यांची नूतनीकरणाची संख्या कमी असून, गेल्या पावणेदोन वर्षांत फक्त ३५ जणांनी परवान्यांचे नूतनीकरण केले आहे. दरम्यान, नूतनीकरणासाठी मात्र नवा परवाना काढण्याएवढीच प्रक्रिया करावी लागत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. उपप्रादेशिक परिवहन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, परदेशात वाहने चालविण्याचे परवाने काढण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती आहे. स्थानिक वाहन परवाना काढण्यासाठी ज्याप्रमाणे ऑनलाइन अर्ज करावा लागतो, त्याप्रमाणे परदेशी वाहन परवान्यांच्या नूतनीकरणासाठी ऑनलाइन अर्ज करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ऑनलाइन अर्ज केल्यानंतर नागरिकांना आरटीओ कार्यालयातर्फे तारीख दिली जाते. त्या तारखेला आरटीओ कार्यालयात जाऊन त्या नागरिकांनी मूळ पासपोर्ट, व्हिसा आणि वाहन परवाना दाखविणे गरजेचे आहे. तसेच मूळ वाहन परवान्यावरील पत्ता व पासपोर्टचा पत्ता हा एकच असणे आवश्यक आहे. यावेळी आरटीओ विभागातर्फे संबंधित नागरिकांच्या कागदपत्रांची पडताळणी करून नूतनीकरण केले जात आहे. नूतनीकरणासाठी १००० रुपयांचे शुल्क आकारण्यात येत आहे.

असा काढावा आंतरराष्ट्रीय परवाना

- परदेशात वाहन चालविण्याचा परवाना काढण्यासाठी आरटीओ नियमानुसार ऑनलाइन अर्ज करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

- ऑनलाइन अर्ज केल्यानंतर, शुल्कदेखील ऑनलाइनच भरणे गरजेचे आहे. त्यानंतर शुल्क भरल्याची प्रिंट काढून आरटीओ कार्यालयात सादर करावी लागते. आरटीओ कार्यालयाकडे पासपोर्ट, व्हिसा आणि वाहन परवाना दाखवावा लागतो. मात्र, ही कागदपत्रे दाखविण्यासाठी मूळ कागदपत्रे घेऊन जाणे गरजेचे आहे.

- यानंतर आरटीओ कार्यालयाकडून या मूळ कागदपत्रांची पडताळणी करण्यात येते. त्यानंतर संबंधित नागरिकाला एका वर्षाच्या मुदतीसाठी परवाना देण्यात येत आहे.

- एका वर्षाचा परवाना संपल्यानंतर, पुन्हा नव्याने अर्ज करून हा परवाना काढावा लागतो.

कोण काढू शकतो हा परवाना

- ज्या नागरिकांकडे परदेशात राहण्याचा व्हिसा व पासपोर्ट आहे, अशा नागरिकांना आंतरराष्ट्रीय वाहन परवाना दिला जातो.

- वाहन परवाना देताना आरटीओ प्रशासनातर्फे संबंधित नागरिकाचे मूळ लायसन्स पाहूनच पुढील प्रक्रिया केली जाते.

- मूळ वाहन परवान्यावरील पत्ता व पासपोर्टवरील पत्ता हा एकच असणे गरजेचे आहे. कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, एका दिवसात हा वाहन परवाना दिला जातो.

आरटीओ कार्यालयातर्फे परदेशात गाडी चालविण्यासाठी परवान्याच्या नूतनीकरणासाठी नवा परवाना काढण्याच्या नियमाप्रमाणे ऑनलाइन अर्ज करावा लागतो. संबंधित नागरिकांकडे अगोदरचे लायसन्स असल्यामुळे पुन्हा त्यांची कुठलीही परीक्षा घेतली जात नाही. तसेच इतर सर्वसाधारण लायसन्सप्रमाणे नियमानुसार शुल्क आकारले जाते.

ज्ञानेश्वर हिरडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, अकाेला

कोरोनाकाळात संख्या घटली

२०१८ - २३

२०१९ - २२

२०२० - ०७

२०२१- ०६