शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

पालखी कावड महोत्सवाचा प्रस्ताव गृह मंत्रालयाकडे पाठविणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:25 IST

अकोला : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालखी कावड महोत्सव साजरा करण्यासंदर्भात अकोला शहरातील शिवभक्त मंडळांच्यावतीने मंगळवारी जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात ...

अकोला : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालखी कावड महोत्सव साजरा करण्यासंदर्भात अकोला शहरातील शिवभक्त मंडळांच्यावतीने मंगळवारी जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला असून, हा प्रस्ताव तातडीने मार्गदर्शक सूचनांसाठी गृह मंत्रालयाकडे पाठविण्यात येणार असल्याचे शिवभक्त मंडळ प्रतिनिधींच्या बैठकीत जिल्हा प्रशासनामार्फत स्पष्ट करण्यात आले. श्रावण महिन्यातील शेवटच्या श्रावण सोमवारी अकोला शहरात पालखी कावड महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालखी कावड महोत्सव साजरा करण्यासंदर्भात पालकमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी १४ ऑगस्ट रोजी जिल्हा प्रशासनासह पालखी व कावड मंडळांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली होती. त्यामध्ये पालकमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार पालखी कावड महोत्सव साजरा करण्यासंदर्भात शिवभक्त मंडळांच्या प्रतिनिधींची बैठक मंगळवार, १७ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, अकोल्याचे उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार तसेच पोलीस विभागातील अधिकाऱ्यांसह कावड पालखी सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष राजेश भारती व शिवभक्त मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.

शिवभक्त मंडळांच्या

प्रतिनिधींनी मांडल्या सूचना!

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करून पालखी कावड महोत्सव कसा साजरा करता येइल, यासंदर्भात शिवभक्त मंडळांच्या प्रतिनिधींनी या बैठकीत प्रशासनासमोर सूचना मांडल्या. नियमांचे पालन करून पालखी कावड महोत्सव साजरा करण्याबाबत सूचनांचा प्रस्ताव जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांना सादर करण्यात आला. हा प्रस्ताव गृह मंत्रालयाकडे तातडीने पाठविण्यात येणार असून, त्यावर मार्गदर्शन मागविण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनामार्फत बैठकीत सांगण्यात आले.

तूर्त गेल्या वर्षीप्रमाणेच महाेत्सव

साजरा करण्यावर प्रशासन कायम !

पालखी कावड महोत्सव साजरा करण्याबाबत वरिष्ठ पातळीवरून येणाऱ्या सूचना मंडळांना तात्काळ कळविण्यात येणार आहेत. तूर्त, जिल्हा प्रशासन शिवभक्त मंडळांना कोणत्याही बाबतीत आश्वस्त करणार नाही. तथापि हा महोत्सव गेल्या वर्षी ज्या पद्धतीने साजरा झाला, त्या पद्धतीने साजरा व्हावा, यावर प्रशासन कायम आहे, असे प्रशासनामार्फत जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी यावेळी स्पष्ट केले.

................फोटो...................