शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

पणजच्या केळी उत्पादकांना मिळणार पीक विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:25 IST

अकोला : जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील पणज मंडलातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना मागीलवर्षीचा विमा कमी प्रमाणात मिळाला होता. पीक विम्यापासून वंचित ...

अकोला : जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील पणज मंडलातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना मागीलवर्षीचा विमा कमी प्रमाणात मिळाला होता. पीक विम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तत्काळ रक्कम अदा करावी, यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांनी पुणे येथील कृषी आयुक्त कार्यालयासमोर मंगळवारी ठिय्या आंदोलन सुरू केले. या आंदोलनाला यश आले असून, कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी तातडीने आदेश काढून भारतीय कृषी विमा कंपनीने ६५ लाख रुपयांचा विमा पणज मंडळातील शेतकऱ्यांना द्यावा, असे लेखी आदेश काढले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी पीक विम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ रक्कम अदा करावी, विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना चालूवर्षी २५ टक्के आगाऊ नुकसानभरपाई मिळावी, पीक विमा कंपन्यांनी २०१५ ते २०२१ यादरम्यान केलेल्या कारभाराची तसेच पत्रव्यवहाराची माहिती देणारी श्वेतपत्रिका काढावी, पीकविमा योजनेची वेबसाईट मराठीत काढावी, मागील पाच वर्षांमधील पीकविमा कंपन्यांचे ऑडिट करावे यांसह विविध मागण्या करीत पुण्यातील कृषी आयुक्तालयासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी प्रचंड घोषणाबाजी करून कार्यालय दणाणून सोडण्यात आले. कार्यकर्ते आक्रमक होत असल्याचे पाहून कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी रविकांत तुपकर यांना चर्चेसाठी बोलाविले. तब्बल तीन तास सर्व प्रश्नांवर खलबते झाली. आयुक्तांनी अनेक मुद्यांवर संमती दर्शविली आणि मागण्या तत्त्वत: मान्य केल्या. तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविला जाईल, असे धीरजकुमार यांनी सांगितले. यावेळी मुख्य सांख्यिकी अधिकारी उदय देशमुख उपस्थित होते.

या आंदोलनात 'स्वाभिमानी'चे विदर्भ प्रमुख दामूअण्णा इंगोले, प्रकाशतात्या बालवडकर, अमर कदम, विनातक सरनाईक, विकास देशमुख, अनिल रोकडे, प्रदीप ठाकूर, सचिन पांडुळे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

(फोटो)

-----------------

विमा कंपनीच्या तत्कालीन जिल्हा प्रतिनिधीवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश

भारतीय कृषी विमा कंपनीच्या तत्कालीन अकोला जिल्हा प्रतिनिधीवर अकोट पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे आदेश कृषी आयुक्तांनी दिले आहेत. विम्यामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.