शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

पर्यावरण रक्षणासाठी चिमुकल्यांनी बनविल्या कागदी पिशव्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 16:09 IST

घातक प्लास्टिकला हद्दपार करण्यासाठी आणि नागरिकांनी प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी चिमुकल्या मुलांनी पुढाकार घेतला आहे.

अकोला: जमिनीत अथवा पाण्यात असले तरी प्लास्टिक नष्ट होत नाही. प्लास्टिक जाळले तर हवेत प्रदूषण होते. प्लास्टिकमध्ये विविध घातक रसायने असतात. मानवाच्या कातडीला ते धोकादायक ठरू शकते. जमीन तसेच पाण्यातही ते हानिकारक ठरते. अशा घातक प्लास्टिकला हद्दपार करण्यासाठी आणि नागरिकांनी प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी चिमुकल्या मुलांनी पुढाकार घेतला आहे. परीक्षा आटोपल्यानंतर मुलांना सुट्ट्या लागल्या आहेत. या सुट्टीचा सदुपयोग करण्यासाठी राऊतवाडीतील चिमुकल्या मुलांनी पर्यावरण रक्षणाच्या दृष्टिकोनातून कागदी पिशव्या व पाकिटे बनविण्याचा उपक्रम सुरू केला आहे.प्लास्टिक पिशव्या पर्यावरणासाठीच नाही तर मनुष्य, प्राण्यांसाठीसुद्धा घातक आहेत. प्लास्टिक जाळले तर हवेत प्रदूषण होते. प्लास्टिकमध्ये विविध घातक रसायने असतात. मानवाच्या कातडीला ते धोकादायक ठरू शकते. जमीन तसेच पाण्यातही ते हानिकारक ठरते. पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ अन्वये शासनाने ४० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकवर (वापर आणि विक्री) बंदी घातली आहे; परंतु बंदीचा कुणावरच परिणाम होत नाही. भाजीवाला, फळवाला, किराणा दुकान, खाद्य वस्तू विक्री दुकान, औषधे आदी सर्वच ठिकाणी पातळ व कमी जाडीच्या प्लास्टिकच्या पिशव्यांचा सर्रास वापर करण्यात येत आहे. अशा घातक प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळण्यासाठी चिमुकले मंडळी पुढे सरसावली आहेत. राऊतवाडीतील श्यामली वानखेडे, ओजस राऊत, पार्थ वानखडे, आर्या वानखेडे, अनू राऊत, रेणुका राऊत, वीर वानखडे या चिमुकल्यांच्या परीक्षा आटोपल्यानंतर, त्यांच्या शाळेला सुट्टी लागली आहे. या सुट्टीचा सदुपयोग व्हावा आणि समाजात जनजागृतीसुद्धा व्हावी, यासाठी या चिमुकल्यांनी कागदी पिशव्या तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. प्लास्टिक पर्यावरण आणि मनुष्यासाठी घातक असल्यामुळे प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळून कागदी व कापडी पिशव्यांचा वापर करण्याचा संदेशच या चिमुकल्यांनी दिला आहे. दररोज ४0 ते ५0 कागदी पिशव्या तयार करून ही चिमुकली मंडळी परिसरातील नागरिकांना उपलब्ध करून देत आहेत. या चिमुकल्यांनी सुरू केलेला कागदी पिशव्या निर्मितीचा उद्योग परिसरात कौतुकाचा विषय ठरत आहे. कोवळ्या मनाच्या मुलांना जे कळतं ते आम्हा मोठ्यांना का कळत नाही? 

 

टॅग्स :AkolaअकोलाStudentविद्यार्थीenvironmentवातावरण