शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
4
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
5
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
6
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
7
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
8
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
9
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
10
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
11
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
12
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
13
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
14
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
15
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
16
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
17
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
18
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
19
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
20
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

विषबाधा : ‘त्या’ पदार्थांचे नमुने तपासणीसाठी पाठवले नागपूरला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 13:09 IST

विषबाधा झालेल्या ग्रामस्थांच्या प्रकृतीत सुधारणा असून, त्यांनी सेवन केलेल्या जेवणाचे नमुने तपासणीसाठी नागपूर येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आले आहे.

अकोला : भीमटेकडे येथे महाप्रसादाच्या जेवणातून १११ ग्रामस्थांना विषबाधा झाल्याची घटना रविवारी घडली. विषबाधा झालेल्या ग्रामस्थांच्या प्रकृतीत सुधारणा असून, त्यांनी सेवन केलेल्या जेवणाचे नमुने तपासणीसाठी नागपूर येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आले आहे. हा अहवाल आल्यानंतरच विषबाधेचे नेमके कारण समोर येणार आहे.अकोट तालुक्यातील हिंगणी भीमटेकडी येथे रविवार, १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासोहब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात जेवण केल्यानंतर १११ ग्रामस्थांना विषबाधा झाल्याची घटना घडली होती. येथील रुग्णांना तत्काळ उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. योग्य वेळी उपचार झाल्याने त्या ग्रामस्थांचे प्राण वाचले. त्यांच्या प्रकृतित सुधारणा झाली असून, लवकरच त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली; परंतु ही विषबाधा नेमकी कशामुळे झाली, याचे कारण जाणून घेण्यासाठी जेवणात समाविष्ट प्रत्येक खाद्य पदार्थाचे नमुने घेण्यात आले आहेत. शिवाय, हे खाद्य पदार्थ निर्मितीसाठी वापरण्यात आलेल्या साहित्यांचे नमुने, तसेच रुग्णांच्या उलटीचे नमुनेदेखील घेण्यात आले आहेत. संकलीत नमुने पुढील तपासणीसाठी नागपूर येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आले आहेत. या नमुन्यांच्या तपासणी अहवालानंतरच विषबाधेचे नेमके कारण समोर येणार असल्याने, डॉक्टरांसोबत सर्वांनाच त्याची प्रतीक्षा आहे.सर्वच रुग्णांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा आली असून, वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना रुग्णालयातून सुटी दिली जाईल. विषबाधेचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी खाद्यपदार्थांसह रुग्णांच्या उलटीचे नमुने नागपूर येथे पाठविण्यात आले आहेत. तपासणीचे अहवाल आल्यानंतरच वास्तव समोर येईल.- डॉ. श्याम सिरसाम, विभाग प्रमुख, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय