शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची कॅनडाविरोधात मोठी कारवाई! 6 उच्चायुक्तांची हकालपट्टी, 5 दिवसांत सोडावा लागणार देश
2
"...ज्यावरून मी त्याला कायम चिडवायचो"; अतुल परचुरेंच्या निधनाने राज ठाकरे झाले भावूक
3
Mumbai Video: बापाने हात जोडले, मुलाला वाचण्यासाठी आई अंगावर पडली; पण ते मरेपर्यंत मारत राहिले
4
Atul Parchure Passed Away: 'वल्ली' अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरे यांचं निधन, काही वर्षांपूर्वीच कर्करोगावर केलेली मात
5
मोठी बातमी: राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी सरकारकडून ७ नावांवर शिक्कामोर्तब; कोणाकोणाला मिळाली संधी?
6
नववीपासूनची मैत्री...अतुल परचुरेंच्या निधनानंतर जयवंत वाडकर भावूक; शेअर केला शेवटचा फोटो
7
चतुरस्त्र अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरेंच्या निधनानंतर CM एकनाथ शिंदेंसह राजकीय विश्वातून आदरांजली
8
"....तोपर्यंत हे म्हातारं काही थांबत नाही"; शरद पवारांचा निर्धार काय?
9
Pune Crime: पुण्यात तरुणीवर अत्याचार करणाऱ्या दुसऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; यूपीतून अटक!
10
कृष्णा महाराज शास्त्री भगवानगडाचे उत्तराधिकारी होणार; कधी बसणार गादीवर? जाणून घ्या...
11
उद्धव ठाकरेंवर अँजिऑप्लास्टी नाही, केवळ नियमित तपासणी; आदित्य ठाकरेंची माहिती
12
हरयाणा निकालातून घेतला धडा; महाराष्ट्रातील नेत्यांना काँग्रेस हायकमांडचे ३ आदेश
13
'४८ पैकी ३१ जागा जिंकल्यावर यांना लाडकी बहीण आठवली'; शरद पवारांचा महायुती सरकारला खोचक टोला
14
ठाकरेंना धक्का, टोपेंचं वाढलं टेन्शनl; 'शिवबंधन' तोंडत हिकमत उढाण शिंदेंच्या शिवसेनेत!
15
Acidity ने हैराण झालायत? वारंवार पोटात जळजळतं? 'हे' ५ उपाय करा, नक्की वाटेल 'रिलॅक्स'!
16
वक्फ विधेयकावरुन पुन्हा गोंधळ; विरोधी खासदारांनी जेपीसीच्या बैठकीवर बहिष्कार टाकला
17
शिंदे-फडणवीस-अजित पवारांची उद्या महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद; जागावाटपाच्या फॉर्म्युल्याची घोषणा होणार? 
18
अजित पवारांना धक्का! रामराजेंचे विश्वासू आमदार दीपक चव्हाणांच्या हाती 'तुतारी'
19
आम्ही झेल सोडून चेंडूला विश्रांती देतो; माजी भारतीय खेळाडूचे पाकिस्तानवर शाब्दिक हल्ले, कारण...
20
Bigg Boss 18: गुणरत्न सदावर्ते बिग बॉसच्या घरातून बाहेर, नक्की कारण काय? जाणून घ्या...

खानापूर परिसरात विजेचा लपंडाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 4:32 AM

खानापूर : येथे गेल्या काही दिवसांपासून वीजपुरवठा दिवसा खंडित होत असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. तसेच कृषी पंपाचा वीजपुरवठा ...

खानापूर : येथे गेल्या काही दिवसांपासून वीजपुरवठा दिवसा खंडित होत असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. तसेच कृषी पंपाचा वीजपुरवठा अनियमित असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. त्यामुळे महावितरण लक्ष देऊन वीजपुरवठा सुरुळीत करण्याची मागणी होत आहे.

रेशीम शेतीचे प्रमाण घटले!

तेल्हारा : गतवर्षी तालुक्यातील शेतकऱ्यांनी रेशीम शेतीसाठी नोंदणी केली होती. मात्र, प्रतिकूल हवामानामुळे धोका न पत्करता केवळ गतवर्षीपेक्षा अर्ध्या शेतकऱ्यांनीच रेशीम शेतीसाठी तुती लागवड केली. यावरून रेशीम शेतीचे प्रमाण घटत चालले आहे.

समुपदेशन केंद्र सुरू करा!

पिंजर : ग्रामीण भागात अवैध दारूविक्रीचे प्रमाण वाढले आहे. अनेक तरुण व लहान मुले आहारी जात आहेत. त्यामुळे व्यसनमुक्ती व समुपदेशन केंद्र सुरू करण्याची मागणी महिलांनी केली आहे. परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून अवैध दारूविक्री वाढली आहे. पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे तरुण मुले व्यसनाधीन होत आहेत.

आरोग्य विभागात कर्मचाऱ्यांची पदे रिक्त!

वाडेगाव : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य कर्मचारी अहोरात्र झटत आहेत. परंतू, आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने कर्तव्य बजावताना कर्मचाऱ्यांची दमछाक होत आहे. आरोग्यसेविका यांची पदे रिक्त आहेत.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी

हातरुण : परतीच्या पावसाने सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीबाबत तत्काळ सर्व्हे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतर्फे करण्यात आली आहे. कापूस, सोयाबीन, तूर पिकांचे नुकसान झाले.

रस्त्याच्या दुतर्फा वृक्षतोड

बार्शिटाकळी : परिसरात अवैध वृक्षतोड होत आहे. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. रस्त्याच्या लगत असलेले व शेतातील वृक्ष तोडण्यात येत आहेत. त्यावर वनविभागाने नियंत्रण मिळविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे.