शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

धान्याच्या लाभासाठी ‘डीबीटी’ची तयारी; धान्याची किंमत होणार खात्यात जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 18:40 IST

अकोला : शासनाने विविध योजनांच्या लाभासाठी थेट हस्तांतरण योजना सुरू केल्यानंतर आता सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून धान्याचा लाभ घेणाऱ्यांना धान्य न देता त्यांना देय असलेल्या धान्याची किंमत लाभार्थींच्या खात्यात जमा करण्याचा उपक्रम सुरू केला आहे.

ठळक मुद्देपहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम यशस्वी झाल्यास राज्यभरात तो राबविला जाणार आहे.लाभार्थींना देय धान्याची किंमत थेट खात्यावर जमा करण्यासाठी प्रक्रियेत कोणते आवश्यक बदल करावे लागतील, याचाही अभ्यास त्यातून केला जाणार आहे.

अकोला : शासनाने विविध योजनांच्या लाभासाठी थेट हस्तांतरण योजना सुरू केल्यानंतर आता सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून धान्याचा लाभ घेणाऱ्यांना धान्य न देता त्यांना देय असलेल्या धान्याची किंमत लाभार्थींच्या खात्यात जमा करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम यशस्वी झाल्यास राज्यभरात तो राबविला जाणार आहे.सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून रॉकेल, अन्नधान्यावर दिले जाणारे अनुदान लाभार्थींपर्यंत पोहोचावे, यासाठी शासनाने थेट लाभ हस्तांतरण उपक्रम राबविण्याला २१ आॅगस्ट २०१८ रोजी मंजुरी दिली आहे. त्या निर्णयानुसार हा उपक्रम पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्त्वावर सुरू होणार आहे. प्रयोगाच्या यश-अपयशानंतर त्याची अंमलबजावणी राज्यभरात करण्याचा निर्णय घेतला जाईल. सोबतच लाभार्थींना देय धान्याची किंमत थेट खात्यावर जमा करण्यासाठी प्रक्रियेत कोणते आवश्यक बदल करावे लागतील, याचाही अभ्यास त्यातून केला जाणार आहे.थेट लाभ हस्तांतरण योजनेचा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यासाठी पहिल्या टप्प्यात मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्रातील व परिमंडळातील दुकानांची निवड करण्यात आली आहे. त्या क्षेत्रातील दुकानांमध्ये शिधापत्रिकाधारकांना थेट धान्य घेणे किंवा धान्याचा लाभ रोख स्वरूपात घेण्यासाठीचे पर्याय दिले जाणार आहेत. आधार संलग्नित बँक खात्यावर रक्कम जमा केली जाईल. लाभार्थींच्या पसंतीनुसार दोन्ही पद्धतीने लाभ घेण्याची मुभा देण्यात आली. हा उपक्रम यशस्वी झाल्यानंतर राज्यातील इतर जिल्ह्यामध्येही तो राबविला जाणार आहे. त्यामुळे सार्वजनिक वितरण प्रणालीत येत्या काळात आमूलाग्र बदल होण्याचे संकेत आहेत.- अशी मिळेल लाभार्थींना रक्कम!लाभार्थींना धान्याची रोख रक्कम हवी असल्यास अंत्योदय गटासाठी १७ किलो तांदूळ - ४५३.२२ रुपये, १८ किलो गहू - ३५४.४२ रुपये मिळून ८०७.६४ रुपये खात्यावर जमा केले जाणार आहेत. प्राधान्य कुटुंबातील प्रतिलाभार्थीसाठी दोन किलो तांदूळ, तीन किलो गव्हासाठी ११२.३९ रुपये मिळणार आहेत, तर दुकानदारांना अंत्योदयसाठी ५२.५०, प्राधान्य गटासाठी ७.५० एवढे कमिशन दिले जाणार आहे.

 

टॅग्स :Akolaअकोला