शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

जिल्हा परिषदेच्या सभेत मंजूर १२ ठरावांची अंमलबजावणी करण्यास मनाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2021 4:20 AM

अकोला: जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत २३ जून रोजी मंजूर करण्यात आलेल्या विविध ठरावांविरोधात विरोधी गटाच्या सदस्यांनी दाखल केलेल्या अपिलावर ...

अकोला: जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत २३ जून रोजी मंजूर करण्यात आलेल्या विविध ठरावांविरोधात विरोधी गटाच्या सदस्यांनी दाखल केलेल्या अपिलावर निर्णय देत, मंजूर करण्यात आलेल्या ठरावांपैकी १२ ठरावांची अंमलबजावणी करण्यास मनाई करण्यात येत असल्याचा आदेश अमरावती विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी २ सप्टेंबर रोजी दिला.

जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांची आचारसंहिता लागू असताना, गत २३ जून रोजी घेण्यात आलेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत विविध ठराव मंजूर करण्यात आले. त्यामुळे आचारसंहितेचा भंग झाल्याची तक्रार करीत जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आलेल्या ठरावांविरोधात जिल्हा परिषदेतील विरोधी पक्ष असलेल्या शिवसेना सदस्यांच्या वतीने गटनेता गोपाल दातकर, डाॅ. प्रशांत अढाऊ यांनी विभागीय आयुक्तांकडे अपील दाखल केले होते. या अपिलावरील निर्णय पारित करीत सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आलेल्या ठरावांपैकी इतिवृत्त कायम करण्यासह तीन ठराव वगळता १२ ठराव विधीसंमत नसल्याने या ठरावांची अंमलबजावणी करण्यास मनाई करण्यात येत असल्याचा आदेश अमरावती विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी २ सप्टेंबर रोजी पारित केला. तसेच हे ठराव जिल्हा परिषदेच्या येत्या सर्वसाधारण सभेत विषयपत्रिकेवर घेऊन त्यावर निर्णय घेण्याचे निर्देशही विभागीय आयुक्तांनी जिल्हा परिषद प्रशासनाला देण्यात आले.

अंमलबजावणी करण्यास मनाई

केलेले असे आहेत १२ ठराव!

जिल्हा परिषद सेस फंडातून समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मागासवर्गीय लाभार्थींना दुधाळ जनावरे पुरविण्याच्या योजनेला प्रशासकीय मंजुरी प्रदान करणे, पारस येथील नळ योजना विशेष दुरुस्ती कामाची निविदा स्वीकृती, दगडपारवा प्रकल्पावरून प्रस्तावित बार्शीटाकळी तालुक्यातील कान्हेरी सरप व १२ गावांच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर देखभाल दुरुस्तीसाठी ही योजना जिल्हा परिषदेच्या ताब्यात घेणे, लाखपुरी व १७ गावांच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर ही योजना जिल्हा परिषदेच्या ताब्यात घेणे, कवठा बॅरेज येथून प्रस्तावित बाळापूर तालुक्यातील व्याळा व १२ गावांच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झाल्यावर देखभाल दुरुस्तीसाठी ही योजना जिल्हा परिषदेच्या ताब्यात घेणे, तसेच राजंदा व ९ गावांची प्रस्तावित प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, अकोट व तेल्हारा तालुक्यातील प्रस्तावित ८१ गावांच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या ताब्यात घेणे, झरंडी व वसाली नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामास प्रशासकीय मंजूु देणे यासह मंजूर विविध १२ ठरावांची अंमलबजावणी करण्यास मनाई करण्यात येत असल्याचा आदेश विभागीय आयुक्तांनी दिला.