शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

दुपारी सार्वजनिक इमारती, सभागृह उघडे ठेवा! - शासनाचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 13:41 IST

जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक इमारती, सामाजिक सभागृह तसेच मंदिरे सर्वसामान्यांसाठी उघडे ठेवण्याचे निर्देशच राज्याचे अवर सचिव श्रीरंग घोलप यांनी जारी केले आहेत.

ठळक मुद्दे दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या तापमानाची थेट शासनाने दखल घेतली आहे. सार्वजनिक इमारती, सामाजिक सभागृह, धार्मिक स्थळे दुपारच्या वेळी उघडी ठेवण्याचे निर्देश राज्याचे अवर सचिव श्रीरंग घोलप यांनी जारी केले आहेत. उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिकांना दुपारच्या कालावधीत अशा इमारती, धार्मिक स्थळांमध्ये काही काळ विश्रांती घेता येणार आहे.

अकोला: एप्रिल महिन्याच्या पंधरवड्यातच उन्हाच्या तीव्रतेमुळे तापमानात वाढ झाली आहे. मागील दहा दिवसांपासून उष्णतेच्या लाटेमुळे विदर्भासह राज्यातील तापमानाचा पारा कमालीचा चढला आहे. उष्णतेची लाट आणखी कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे उन्हापासून बचाव करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक इमारती, सामाजिक सभागृह तसेच मंदिरे सर्वसामान्यांसाठी उघडे ठेवण्याचे निर्देशच राज्याचे अवर सचिव श्रीरंग घोलप यांनी जारी केले आहेत.विदर्भामध्ये उन्हाळ्यात मे महिन्यात सर्वाधिक तापमान राहते, असा मागील अनेक वर्षांचा अनुभव यंदा एप्रिल महिन्यात निर्माण झालेल्या उष्णतेने खोडून काढला आहे. एप्रिल महिन्याच्या पंधरवड्यातच विदर्भातील चंद्रपूर, अकोला जिल्ह्यातील तापमानाने उच्चांक गाठला. १७ एप्रिलपासून तापमानाने थेट ४४ अंशांपर्यंत मजल गाठली. उष्णतेच्या लाटेमुळे राज्यातील जनता होरपळून निघत असतानाच त्या तुलनेत विदर्भात सर्वाधिक तापमानाची नोंद होत आहे. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या तापमानाची थेट शासनाने दखल घेतली आहे. दुपारच्या वेळी घराबाहेर निघणे टाळण्याचा सल्ला आरोग्य विभागाकडून दिला जात आहे. खबरदारीची उपाययोजना म्हणून नागरिकांसाठी जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक इमारती, सामाजिक सभागृह, धार्मिक स्थळे दुपारच्या वेळी उघडी ठेवण्याचे निर्देश राज्याचे अवर सचिव श्रीरंग घोलप यांनी जारी केले आहेत. उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिकांना दुपारच्या कालावधीत अशा इमारती, धार्मिक स्थळांमध्ये काही काळ विश्रांती घेता येणार आहे. या ठिकाणी पाण्याची व्यवस्था, प्राथमिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे, विद्युत पुरवठा सुरळीत ठेवणे आदी कामासाठी नोडल अधिकारी म्हणून तहसीलदारांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.जिल्हाधिकाºयांवर जबाबदारी!यंदा उष्णतेच्या लाटेमुळे तापमानात वाढ झाली असून, दीर्घक ाळापर्यंत उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. त्यानुषंगाने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने खबरदारीचा उपाय म्हणून शासनाच्या माध्यमातून राज्यातील सर्व जिल्हाधिकाºयांना जिल्हा पातळीवर उपाययोजना करण्याचा आदेश जारी केला आहे. यामध्ये जिल्हाधिकाºयांनी स्थानिक स्वराज्य संस्थांना निर्देश देणे क्रमप्राप्त आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाGovernmentसरकार